" मेनका " मार्च २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झालेली मी लिहिलेली कथा निष्ठा
निष्ठा
निष्ठा
शान्ता शेळके माझ्या सर्वाधिक आवडत्या कवयित्री. त्यांचं नाव, चेहरा आणि त्यांच्या रचना यांची एकत्रित ओळख ठसठशीतपणे केव्हा झाली ते आठवायचा प्रयत्न करतोय. माझं दहावी १९८३ चं. १९८२ मध्ये घरी टीव्ही आलेला, पण त्याने तोवर घड्याळातल्या सगळ्या घरांवर हक्क सांगितला नव्हता. कवी-लेखक दिसायचे ते पाठ्यपुस्तकात तेही नववीपासूनच्या - म्हणजे कुमारभारती आणि मग युवकभारती ; क्वचित वर्तमानपत्रात. पृथ्वीचे प्रेमगीत लिहिणारे कुसुमाग्रज आणि त्यांचं भव्य कपाळ, केवळ माझा सह्यकडा सोबतच्या वसंत बापटांचा चौकडीचा शर्ट हे लक्षात होते. बालकवींनी मात्र आधीपासूनच मनात जागा पटकावून तिथे नावही लावलं होतं.
दि २५ फेब्रुवारी २२ रोजी माझे अनुवादित पुस्तक , # टाटा स्टोअरीज प्रकाशित झाले...
मूळ इंग्रजी पुस्तक श्री हरीश भट यांनी लिहिले असून ते बेस्ट सेलर आहे.
साकेत प्रकाशन व टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा झाला.
राष्ट्र्निर्मितीत टाटांचा १५० वर्षाहून अधिक कालावधीचा वारसा आहे. या दीर्घ कालखंडाच्या क्षितिजावर अनेक सुंदर आणि विसमयकारक कथा आहेत. या कथा आपल्याला प्रेरणा देतात, उत्तेजित करतात आणि एवढेच नव्हे तर आपल्या आयुष्यात अर्थपूर्ण कार्य करण्यात आपणास सक्रीय बनवतात.
गाडीने वेग पकडला आणि एकामागुन एक उपनगरं मागे पडत गेले. थंडगार बोचरा वारा अंगाला झोंबायला लागला तेव्हा आतापर्यंत खिदळणारे आम्ही सारेच गप्प झालो.. मागे पडलेलं घर, कावऱ्याबावऱ्या रडवेल्या चेहऱ्याने निरोप देणारे दोन्ही बच्चु, डोळ्यातलं पाणी लपवत कातरत्या आवाजात 'सांभाळुन रहा' सांगणारी अर्धांगिनी डोळ्यासमोर तरळुन गेली.. मागे एकदाही वळुन न पहाता निघालो होतो मी. माहित होतं की, तिघांचेही डोळे आपल्या पाठीवर खिळलेत, वाट बघताहेत की एकदातरी निरोपाचा हात दाखवेल. पण मी कटाक्षाने मोह टाळला.. वळुन पाहिलं तर पायात मणामणाच्या बेड्या पडतील म्हणुन..
नमस्कार,
मराठीत भरपूर भयकथा लेखन झालं आहे. पण त्यावर काही अपवाद वगळता अजूनही चित्रपटनिर्मिती झाली नाही.
मायबोलीवर असणाऱ्या भयकथा वाचकांकडून अशा काही कथांची माहिती मिळू शकेल का ज्यावर अत्यंत चांगला भयपट बनू शकतो?
धन्यवाद!
प्रतिशोध..! भाग-३ (अंतिम भाग)...!
_________________________________________
https://www.maayboli.com/node/81018
जेव्हा मला जाग आली, तेव्हा मी आतल्या खोलीत गादीवर होते. कुणीतरी माझ्या नाकाला कांदा धरलेला. मी हळूहळू डोळे उघडले. रडण्याचा, आक्रोशाचा अस्पष्ट आवाज माझ्या कानावर येऊ लागला.
मी पार्वती मावशींच्या आधाराने ओसरीत आले. घरात माणसांची गर्दी जमलेली...!!
प्रतिशोध ..!! ( भाग-२)
______________________________________
https://www.maayboli.com/node/81002#new
तिच्याकडे पाहताच माझ्या लक्षात आलं होतं की, वैशूचं आज नक्कीच काहीतरी बिनसलंय्, पण तिला काही विचारायचे धाडस मला होत नव्हते.
" काय झालं वैशू..?? अशी भरदुपारी परत आलीस..??" आत्याने काळजीने विचारले.
" तुला दारात आल्या - आल्या नको त्या चौकश्या करायची काय गरज आहे गं..??" सरळ उत्तर न देता वैशू आपल्या आईवरचं भडकली.
हारुकी मुराकामी हा सांप्रतकाळातला एक जिनीयस लेखक. त्याचा वाचकवर्ग जगभर पसरलेला. म्हणजे
उदाहरणार्थ मुराकामीच्या एखाद्या कादंबरीत टोक्योमधल्या कुठल्यातरी खरोखरच्या ब्रिजचं, लायब्ररीचं किंवा अशाच कुठल्याशा स्थळाचं वर्णन असतं. आणि ते एवढं प्रत्ययकारी असतं की त्याचे वाचक नेटवर त्या स्थळासंबंधी व्हिडिओ किंवा फोटोज् शोधत राहतात..!
प्रतिशोध..!! ( भाग-१)
__________________________________________
आजही तो दिवस मला सूर्यप्रकाशाएवढा लख्ख आठवतोय्. आठ वर्षाचे होते मी त्यावेळी...!!
खरं तर बालपणीच्या बऱ्याचश्या आठवणी ह्या आपल्याला आप्तजनांनी कौतुकाने सांगितलेल्या असतात , काही आठवणी ह्या अंधुक आठवतात; तर काही आपल्याला आठवतही नसतात; पण काही अश्या आठवणी असतात ज्या काळजात अगदी घट्ट रुतून बसतात, नकोश्या वाटत असूनही..!!.
एखादा लाकडाचा ओंडका नदीत बुडवावा आणि त्याने पुन्हा - पुन्हा वर तरंगत यावे; अगदी तसंच त्या आठवणी मनाच्या गहिऱ्या तळातून वर येत राहतात..!
पाणवठा ....
मी खुपच लहान होतो. घराच्या मागील भागात एक मोकळी जागा आणि त्याच्यापुढे एक पाणवठा होता. हा पाणवठा किती जुना, कसा अस्तित्वात आला याबद्दल कुणालाही पुरेशी माहिती नाही.