ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!
दोन-चार दिवसांपूर्वीच हे लिहिणार होतो पण इथे मायबोलीवर असे चर्चेचे विषय कुठे मांडायचे ते शोधूनही न सापडल्याने इथेच टाकतोय.
बहुधा चालत असावे, कारण विषय निवडताना त्यात क्रिडा, क्रिकेट अश्या कॅटेगरीही सापडल्या.
पण जर इथे चालत नसेल तर कुठे हे कोणीतरी मला प्रतिसादात सांगा.
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
यंदा १३ ऑक्टोंबर पासुन सुरु होणार्या चॅम्पिअन टी२० स्पर्धेसाठी धागा......
.
टी२० क्रिकेट खेळणार्या देशांमधे विविध क्लब स्पर्धेमधल्या विजेते व उपविजेते संघ या स्पर्धेत एकमेकांविरुध्द भिडतात
यंदा भारता तर्फे :-
आयपीएल विजेता :- कोलकता क्नाईट रायडर, उपविजेते:- चेन्नई सुपर किंग्स,
सेमीफायनलिस्ट :- दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गतविजेते मुंबई इंडीयन्स
साउथ आफ्रिका तर्फे :- टायटन्स, आणि हायव्हेल्ड लॉयन्स
ऑस्ट्रेलिया तर्फे :- पर्थ स्कॉर्चर्स, आणि सिडनी सिक्सर्स
न्युझीलंड तर्फे :- ऑकलंड एसेस
ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.

.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.
(निवेदनः या लेखाचा हेतू सचिन तेंडूलकर विरूद्ध इतर हा नाही आहे. सचिन तेंडूलकरचं कर्तुत्त्व मोठं आहेच. या लेखाचा हेतू क्रिकेट या खेळाला इतकं अवाजवी महत्त्व का मिळालं असावं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यात लपलेलं पैशाचं राजकारण उघड करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर प्रेमींनी तेंडूलकर विरूद्ध हा लेख असा पवित्रा घेऊ नये.)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -
"लॉर्ड्स" शब्द उच्चारले की अनेक प्रतिमा डोळ्यासमोर उभ्या राहतात. शाळेत असताना ब्रिटिशांबद्दल ऐकलेल्या गोष्टी (ते साम्राज्यावर सूर्य न मावळणे वगैरे), तेव्हाचा बलाढ्य इंग्लिश संघ, परंपरा पाळण्याची त्यांची सवय यामुळे पूर्वी या सर्वाचा एक दरारा वाटायचा. त्यामुळे जेव्हा १९८३ मधे कपिल च्या संघाने तेथे वर्ल्ड कप जिंकला तेव्हा त्या समारंभाकडे व तेथील लोकांकडे बघताना एखाद्या हुशार विद्यार्थाला शाबासकी देणारे शिक्षक लोक असा आविर्भावच जाणवत होता. नंतर हळुहळू ते कमी झाले. भारताने ते दडपण झुगारून दिले - राजकीयदृष्ट्या आणि क्रिकेटमधे सुद्धा.
क्रिकेटचा खेळ जसा अनेक रोमहर्षक घटना आणि प्रसंगांनी भरलेला आहे, तसाच तो अनेक विनोदी आणि दु:खद घटनांचाही साक्षीदार आहे. मानवाच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद घटना म्हणजे अर्थातच मृत्यू. क्रिकेटच नव्हे, तर अनेक क्षेत्रातील व्यावसायिकांना आपल्याला आपले काम करतानाच किंवा कार्यप्रवण असतानाच मृत्यू यावा अशी इच्छा असते. अर्थातच बिछान्याला खिळून राहणे कुणालाच पसंत नसतं, पण याचाच अर्थ असा की आपले हात पाय व्यवस्थित चालत असतानाच मृत्यू आला तर तो अधिक स्वीकारार्ह असतो, मग तो कामाच्या ठिकाणी आला तर तो एक वेगळाच योग.