आणि तोही दिवस आठवतो...
कितीतरी युगं पुढे नेऊन ठेवलस त्या दिवशी तू मला...
यमुनेकाठची अशीच एक सुंदर सकाळ होती ती. पाणी भरता भरता, एका क्षणी तू थबकलीस, पुन्हा घट यमुनेत रिकामा केलास; अन पुन्हा भरू लागलीस. जरी मी पावा वाजवत असलो तरी लक्ष तुझ्याकडेच होतं माझं. तू पुन्हा घट रिकामा केलास अन पुन्हा भरू लागलीस...???
( खरे तर या लेख मालिकेच्या पहिल्या भागातच काही लिहायला हवे होते. पण माझ्याच मनात ते फार स्पष्ट झाले नव्हते. आता थोडे होतेय. म्हणून लिहायचा प्रयत्न करतेय.
आणि तो ही दिवस, छे तो ब्राह्ममूहूर्त आठवतो मला...
संध्याकाळ होत आलेली. आपण यमुनातीरी बसलेलो. अचानक तू म्हणाली होतीस, "तुझी बासरी दिवसभर माझ्या आसपास वाजत असते."
अन मग थबकून म्हणालीस, "पण सगळे कुठे दिवसाला सामोरे जाऊ शकतात रे ?"
अन उदास होऊन यमुनेच्या पाण्यात पाय हलवत बसून राहिलीस किती तरी वेळ.
अन मग दिवस कलला, रात्र यमुनेच्या पाण्यासारखी गडद होत गेली. तू तिथेच बसून राहिलीस. मग मी कसा हलणार होतो? सारीकडे शांत शांत होत गेले. आता मी ही पावा बाजूला ठेवला
अन तोही दिवस आठवतो
किती चित्र विचित्र घटनांचा दिवस!
दुर्योधनाने आयोजलेला द्युताचा समारोह.
कधी नव्हे ते युधिष्ठिराच्या हातून घडलेला अपराध, द्युताच्या मोहाने केलेला घात. पांडवांचे राज्य, संपत्ती इतकेच नव्हे तर स्वतः पांडव, त्यांची आई कुंती आणि पत्नी द्रौपदी त्याने पणाला लावली. पणाला लावले सारे अन हरला तो.
तो हरला की जगातील चांगुलपणाचा पराभव होता तो? कलियुगाची सुरुवात तर नव्हती ती ?
सभागृहात महामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, अनेक देशोदेशीचे रथी महारथी उपस्थित होते. पण एकालाही द्रौपदीची दया आली नाही, एकही जण दुर्योधनाच्या विरुद्ध तिला मदत करू शकले नाहीत.
मला अजून आठवतो तो दिवस. नुकतेच कालिया मर्दन झाले होते. त्यामुळे मी खूष होतो. आम्ही सगळेच बालगोपाल; इतकेच नव्हे तर मैय्या, नंदबाबा आणि सगळेच गोकुळ आनंदात अन काळजीमुक्त होते.
त्या दिवशी सकाळीच सुदामा आणि ५-६ जण आले. आणि मैय्याला विचारू लागले, " आम्ही जाऊ का यमुनातीरी, कान्हाला घेऊन ? " अन मैय्यानेही हसत हसत आम्हाला जाऊ दिले होते.
राधा गौळण
आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ||
दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी
पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१||
गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी
वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२||
मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या
आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११
राधा मोरपिसी
रन्गात रन्गली
प्रेमात रन्गली
अनिवार
राधा सावळ्यच्या
अन्गात भिनली
मनात गुन्गली
अनिवार
राधा मुरलीच्या
सुरात शिरली
जाणीव नुरली
अनिवार
राधा निळाईच्या
छन्दात गुन्गली
लीलेत गुन्तली
अनिवार...
पाचूच्या रानात पुन्हा बासरी घुमली
सागरनिळाई ओल्या दिठीत सजली
हरपली राधा मनी मोरपंखी साज
मेघियात दाटू आले कान्हाचे आभास
सोनसळी हूरहूर अंतरी दाटली
हसुनिया पळभर सांज रेंगाळली
निमिषात पानोपानी कान्हा उमलला
आभासछबीत कान्हा राधेस भेटला
वा-यावर लहरली जणू रूणझूण
मेघातून दाटू आले निळे-श्याम क्षण
पाखरांच्या चाहूलीचा करुनी बहाणा
वेध घेई राधा.. म्हणे आला यदुराणा..
प्राण आसावला तरी चाहूल देईना..
निजू पाहे सांज तरी श्रीरंग येईना
यमुनेचे नीर नयनात भरू आले
मोरपीसावरी दोन मोती विसावले
वा-यावर अनामिक घुमली लकेर
मनाचा हिंदोळा गेला दूर नभपार
शहारली राधा, मनी श्रावण अवघा
मला गाण्यातील स्वर आणि तालाच्या आधी, त्यातले शब्द भावतात. शब्दांच्या केलेल्या हरकती , खेळ यां कड़े माझे जास्त लक्ष जाते.
अनूप जलोटा यांचे भजन '' हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो'' याचे उत्तम उदहारण. सुरुवातीचे हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो आणि आता आई ऐकतच नाही अजुन तिला संशय आहे असे लक्षात आल्यावर झालेला बदल हे मैंया मोहि मैंनेही माखन खायो, हा बदल जेंव्हा समजतो तेंव्हा हे शब्दच सुर आणि तालाच्या सुन्दर कव्हर मधला मुद्देमाल आहे हे लक्षात येते.
"कोण आहे गं तिकडे ? दिवसाचे ३ प्रहर उलटून गेले, तरी या महाली आगमन झाले नाही अजून.
विसरली कि काय स्वारी ? आम्हाला कळत का नाही ? या महाली येऊन म्हणायचे, रुक्मीणी, तू आमची पट्टराणी. तूझा मान मोठा, आणि त्या महाली जाऊन म्हणायचे, तू सत्य माझी भामा, सत्यभामा." रुक्मीणीचा नूसता संताप झाला होता. आज स्वारी या महाली येणार होती म्हणून तिने सर्व सिद्धता करुन ठेवली होती.
घृतपूर, मोदक, क्षिरी भोजनासाठी, संगीतजलसे मनोरंजनासाठी, पुष्पशय्या सर्व काही होते. स्वारी आता त्या महाली, जायचेच विसरायला हवी, अशी मनिषा होती तिला.