संक्रांत आली
दिवाळ निघालं
दसरा काढला
शिमगा केला
लगेच समोर दत्त म्हणून हजर
या आणि अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत----
पण ही सारी विडंबनात्मक म्हणी आहेत.
संक्रांत, दिवाळी, दसरा ही सणासुदीची दिवस अशी विडंबनात्मक म्हणीच्या स्वरूपात का वापरली जाऊ लागली????
कुणी सांगू शकाल का?
कारण आता लवकरच संक्रांत येत आहे त्यामुळे हा प्रश्न सहजच पंख पसरू लागलाय------
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये
नमस्कार. नुकतंच जालना येथे 'योग संमेलन' झालं. चैतन्य योग केंद्र जालना व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे आयोजित ह्या योग संमेलनामध्ये 'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' प्रकाशित करण्यात आला. गेल्या मे महिन्यामध्ये परभणी- जालना- औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यात ५९५ किमी सायकल प्रवासातून विविध योग साधकांसोबत झालेल्या भेटी, त्यांचे अनुभव, ठिकठिकाणची योग केंद्रे/ योग साधक ह्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक ह्यांचे तपशील असलेला हा विशेषांक आहे. योगामुळे आयुष्यात काय फरक पडला, हे २७ साधक- साधिकांच्या अनुभवातून आपल्याला कळतं.
योगाचा योग जुळवून आणावा !