विडंबन-बघ माझी आठवण येते का?
(कवी सौमित्र यांची जाहीर माफी मागून)
बघ तुला काही सुचतंय का?
शांत मनाने जरा विचार करून पहा
बघ तुला काही सुचतंय का?
हात लांबव, उचल ती टेबलावरची लेखणी
आलेला विचार लिहून टाक
बघ तुला काही सुचतंय का?
मनात आलेलं विचारांचं काहूर थोडं सावरून घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच सावरलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभा रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ तुला काही सुचतंय का?
मग चालू लाग, प्रवासाला निघालेल्या रवीचा निरोप घे
चालत रहा वाट संपेपर्यंत, ती संपणार नाहीच, परत घरी ये
गोंधळून जाऊ नकोस, शांत चित्ताने एका ठिकाणी बस