सुरकुत्या
भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
बघा जरा काळवेळ मग राग आळवा रे
रखरखलेली दुपार ही; चांदरात नाही
भरार फुलपाखरू कुणाच्या उरात नाही
किडे इथे रेंगती, कुणी माणसात नाही
मनास येते तसे तुम्ही वागता तरीही
कसे म्हणवते - "खरेच काही मनात नाही!"
बघा जरा काळवेळ मग राग आळवा रे
रखरखलेली दुपार ही; चांदरात नाही
कर्जाचे अन कर्जमाफीचे ओघ ठेवले.
दान दिले पण परताव्याचे योग ठेवले.
पाणी आता साधन झाले लढण्यासाठी,
पिण्यास बाकी पेप्सी आणि कोक ठेवले.
दर रविवारी संस्कृतिरक्षण पुरले नाही.
रोज पार्वती अन तुलसीचे "सोप" ठेवले.
व्यर्थ टाहो शंभरांचे कोंडलेले
पाच ठरले थोर येथे जिंकलेले
हा कशाचा एवढा कल्लोळ झाला?
की कुणी आहे स्वतःशी भांडलेले?
काल मजला एक मोठे पत्र आले
मायन्यापाशीच नाते संपलेले!
नेमकी गाडी उशीरा का सुटावी?
इष्कात रंगणार्यांची पंचमी असावी
होळी परी फुलांची त्या संगमी असावी
मानस सरोवराची शोभा असावयाची
निष्पाप पंकजा का या कर्दमी असावी ?
डोळ्यात खोल अश्रू ती साठवून घेते
पुढल्या अवर्षणाची ती बेगमी असावी
संपता स्वप्न मी शिणत नाही अता
दु:ख सांभाळणे गणत नाही अता ||
वेदना जाहली अंतरीची सखी
‘राहिलो एकटा’ म्हणत नाही अता ||
संपले सांगणे तृप्त मौनात मी
मी सुखाला पुरे म्हणत नाही अता ||
हे असे चांदणे बहरले अंतरी
कालचे ऊन रणरणत नाही अता ||
'हो! हो!' म्हणून झाले, 'ना! ना!' म्हणून झाले!
ठरल्यानुसार दैवा जगणे जगून झाले.
मीही तसाच आहे, तीही तशीच आहे...
लांबून एकमेकां हे चाचपून झाले.
करशील काय आता उचलून तू कुर्हाडी,
आतून पूर्ण माझे जर उन्मळून झाले!
मज राहिला अताशा कसलाच शौक नाही.
दु:खातला विदूषक माझे बनून झाले!
माझा मलाच मी का कोठेच सापडेना?
आयुष्य भोवताली सगळे खणून झाले.
काळीज आज बहुधा झाले सुरू कण्हाया...
आत्ताच कालपरवा माझे हसून झाले!
- मयूर
एक एकाकी निशा व्याकूळ आहे
टोचणीचे मस्तकी वारूळ आहे
भोवताली वेदनांचे पूर हृदयी
मध्यभागी वंचनेचा सूळ आहे
ऐकले होते बिछाने पाकळ्यांचे
मंचकी या कोवळे बाभूळ आहे
आठवांचा अंतरी कल्लोळ आहे
शांतता बाहेरची मंजूळ आहे
मनातल्या मनात घाव सोसतो अनेकदा
कसे भले बुरे उठाव पेलतो अनेकदा
पुन्हा पुन्हा स्वतःस मी खणावयास लागता
उजाड प्राक्तनी भराव टाकतो अनेकदा
हयातभर रडतरखडत पाय चालले इथेतिथे
अता बळेच मी चढाव घालतो अनेकदा
कुणास मी स्मरू ? कुणास विस्मरू जराजरा...
पुसट स्मृतीतले अभाव वेचतो अनेकदा
मला तुझ्या मनातले खरे कधी कळेल का?
मनास हा तुझा लगाव जाळतो अनेकदा
अजूनही मलाच मी कितीकिती अनोळखी
जरी उधार जन्मनाव लावतो अनेकदा
- मयूर
(किती किती दिवसांनी गजल लिहितेय. )
माझे मला
ठरवुनी आधीच भेटी, टाळणे माझे मला
साधले जे एकटेपण, साहणे माझे मला
अजुन झाली सांज नाही, एकटे का वाटते?
’या वयाला ठीक हे’, समजावणे माझे मला
प्रश्न साधे नजर माझी रोखते, पलिते जणू
भावनांच्या देवघेवी गिरवलेल्या
ओळखीच्या हास्यरेषा ठरवलेल्या |
थंड अन् फेसाळता प्याला हवासा,
स्निग्ध सायीच्या स्मृतीही हरवलेल्या |
मत्त जे पायातळी रगडून नीती,
मिरवण्या त्यांनी सभा या भरवलेल्या |