समग्र वेदवाङ्मयाचा परिचय करुन घेण्याच्या उपक्रमात आपण सर्वप्रथम चारही वेदांची ओळख करून घेतली. वेदांनंतर अर्थातच क्रमाने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा समावेश होतो. यातील ब्राह्मण ग्रंथांचा परिचय करून घेऊयात. (जातीने ब्राह्मण असण्याचा आणि या ग्रंथांच्या नावाचा आपापसात काही संबंध नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.)
हिरण्यवर्णाः शुचयः पावका यासु जातः सविता यास्वग्निः ।
या अग्निं गर्भं दधिरे सुवर्णास्ता न आपः शं स्योना भवन्तु ॥ अथर्ववेद १, ३३।।
सोन्यासारख्याच रंगाने प्रकाशणारे (पावसाचे) पाणी, शुद्धीदायक होवो, ज्यामधून सविता देव आणि अग्निदेव यांचा जन्म होतो. सोन्यासारखी (झालर) असणारे म्हणजे जणु अग्निगर्भ. ते पाणी आपल्या सर्व समस्या दूर करो आणि आपल्याला आनंद आणि शांती प्रदान करो.
पावसाळ्याचे दिवस आहेत तर अथर्ववेदातीलच आप(जल)सूक्तापासूनच लेखाची सुरुवात करु यात. (लेख लिहिला तेव्हा पावसाळा होता!)
अथर्ववेद….
काल माझ्या मैत्रिणीने ठाण्याला नौपड्यात कल्हई वाला कुठे बसतो ह्याची चौकशी केली आणि माझे मन नकळतच त्या दिवसात पोचले.
मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि”१ असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण२, बृहद्देवता३ असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.
मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि”१ असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण२, बृहद्देवता३ असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.
ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.
माय मराठी
मराठी लळे लाविले माय ऐसे
मनाच्या तळी प्रेम धारा विशेषे
स्वये ज्ञानियाचे कृपादान जेथे
तुकाराम बोले विठू डोलविते
वीरा शाहिरीने रणा जागविले
जिथे लावणीने मना मोहविले
विविधा कळा नाटके नौरसीची
गुणा खाणिया व्यापी या जीवनाची
बहु थोर सारस्वता जन्मदात्री
विशेषे गुणे डोलते या धरीत्री
असे रांगडी माय सह्याद्रिकाची
विदर्भा तशी मोकळी मन्मनाची
किती स्वैरता धावता चौदिशांसी
प्रवाही गुणे भूषवी सर्व देशी
मना रंजवी ओवी बहिणा विशेषी
वरी सार ते दाविते जीवनासी
सध्या महाराष्ट्रात जे पुजा चव्हाण हीच्या मरणा वर राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्र युपीच्या रांगेत उभा राहतोय की काय असे वाटण्याजोगे दुर्दैवी आहे. एक जीव गेलाय त्यावर राजकारणी त्यांची पोळी भाजत आहे. ज्या मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध आहे असे बोलले जातेय तो मंत्री बारा दिवस पसार काय होतो नंतर समाजापुढे येउन भाषण काय देतो हे सर्व लाजीरवाणे आहे.
वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!
अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।