कोरेनाच्या संकटामुळे भयग्रस्त झालेल्या माणसांनी शहरे सोडून गावाकडे स्थलांतर सुरू केले आहे. हे चित्र खूपच केविलवाणे आणि भयप्रद आहे. माणसांमाणसांमधील शारीरिक अंतर वाढविणे ही सध्याची अपरिहार्यता असली तरी मनामनांतही अंतरच नव्हे, तर दरी माजेल असे चित्र कुठेकुठे उमटू पहात आहे. ही दरी वेळीच बुजवायला हवी. आसऱ्याच्या ओढीने वणवण करणारी माणसेच आहेत आणि केवळ अनाकलनीय परिस्थितीमुळे त्यांच्यावर ही वेळ ओढवली आहे. त्यामुळे, कोणताही दोष नसताना केवळ संकटापासून स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या या केलिलवाण्या स्थितीत त्यांना आधार देण्याची गरज आहे.
राजकीय नेत्यांनी कोणत्या प्रसंगी काय बोलावे, संभ्रमात भर पडेल असे बालणे टाळण्याचे भान ठेवावे, ही समज जागी करण्याची गरज आहे. अशा वेळी, वाजपेयी आठवतात!
***
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस कामकाजाचे करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे तमाम कर्मचारीवर्ग कमालीचा खुश झालाही असेल, पण सर्वसामान्य माणसावर मात्र धास्तावण्याचीच वेळ येणार आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार-रविवार पूर्ण सुट्टीचा असतो, त्यामुळे अन्य रविवार वगळता आठवड्यातील इतर दिवस पूर्ण कामकाजाचे असतात अशी जनतेची एक अंधश्रद्धा असल्याने कामकाजाच्या दिवशी सरकारी कार्यालयांत खेटे घालणाऱ्यांना सरकारी कामाच्या गतिमानतेची पूरण कल्पना अगोदरपासूनच आहे.
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!
२०१६ सालच्या सरकारी अध्यादेशात महाराष्ट्रातील किल्ले भाडेतत्त्वावर देणे, तिथे लग्न समारंभास परवानगी देणे याबद्दल उल्लेख आहे. आज तीन वर्षांनी भाजप सरकारने २५ किल्ल्यांवर सदर योजना राबविण्यासाठी निवड केली आहे अशी बातमी indian express आणि इतर वृत्तपत्रात आलेली आहे.
भारत-पाकिस्तान स्वातंत्र्याची ७३ वर्षे
ऐकून इम्रानच्या वल्गना
हिंदुस्तानी झाले सॅड
बघून कर्तृत्व मोदीजींचे
पाकिस्तानी झाले मॅड!!
पाकिस्तान राहिलाय पीड़ित
बाळगून हिंदुस्थान द्वेषाचे फॅड,
७० वर्षे जनतेला बनवीत उल्लू
नेते मिळाले एकदम बॅड!!
अतिरेकी सापडो जगात कुठेही
निघतो फक्त पाकिस्तानी लॉन्च पॅडवरुन
अंतराळात उपग्रह जगातील कुणाचाही
झेपावतो फक्त हिंदुस्तानी लॉन्च पॅडवरुन!!
एकाला विकास आणि दुसऱ्याला ठेंगा
जमिनीतले पाणी संत्रा वाल्यांनी उपसले
कापूसवाले आभाळाला डोळे लावून बसले !
धरणातले पाणी ऊस द्राक्ष पिऊन गेले
पिण्याच्या पाण्याचे टँकर आत्ताच येऊन गेले !
बळी राजा देतो रोज स्वतःचाच बळी
इथे मात्र नोटा छापते उसाची मळी !
ऊस द्राक्ष केळी वाला कारीतनं फिरतो
कापूसवाला भाऊ का कर्ज मागत फिरतो?
कापूस देऊन शेतकरी पैशाची वाट बघत बसतो
ऊस द्राक्ष केळीवाला एसीत रोख मोजत असतो !
शेतीसाठी कर्ज देण्या बँका फितूर झाल्या
कारसाठी कर्ज देण्या मात्र आतुर झाल्या !
Nightmarch: Among India’s Revolutionary Guerrillas
by Alpa Shah
माओवादी म्हटले की गडचिरोली ते झारखंड या पट्ट्यात आदिवासी भागात होणारे हिंसक हल्ले बहुतेकांच्या डोळ्यासमोर येतील. उग्रवादी, दहशतवादी ही विशेषणे यांना लावली जातात. आजकाल अर्बन नक्षल ही संज्ञादेखील पॉप्युलर झाली आहे.
मात्र नक्षलींचे कार्य का टिकून आहे, कसे चालते, त्यांचे साधनसामुग्री तसेच मनुष्यबळाच्या रासदीचे मार्ग कोणते आणि मुख्य म्हणजे ही चळवळ का टिकून आहे याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल असेल.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्याने मराठी क्रमांक शिकवताना ते दहा दोन(१२) , दहा आठ(१८), तीस दोन(३२) असे शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना क्रमांकातील जोडाक्षरे जमत नाहीत म्हणुन हे सोपे केले आहे असे त्यांचे म्हणने आहे.
हा निर्णय घेताना भाषातज्ञांना, पालकांना व शिक्षकांना विश्वासात घेतले होते का? त्यांचे मत विचारले होते का?
काही सर्वेक्षण केले होते का? त्याचा सँपल साईझ किती?
या प्रयोगाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार त्याची जबाबदारी कुणाची?