धर्म

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

Submitted by जागोमोहनप्यारे on 26 September, 2011 - 10:18

अमावास्या , नारळ आणि मनोविकार

अमावास्येला नारळ का फोडतात ? यामागचे धार्मिक कारण काय आहे?

तसेच या दिवशी लिंबु आणि मिरची गाडीला, घराला बांधायचीही प्रथा आहे.

अमावास्येला कोणतेही काम सुरु करु नये असे म्हणतात.. ते का? काही लोक ( उदा. दत्तपंथीय शंकर महाराज) अमावास्येला शुभ मानतात आणि नवे काम करावे असेही मानतात. असे का?

अमावास्या ( आणि पौर्णिमा) या दिवशी मानसिक विकार उफाळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, असेही काही लोक मानतात, ते खरे आहे का?

( सर्व जिवंत आणि मृत व्यक्तीना सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छा.)

तांब्या पितळेची भांडी आपण का वापरत होतो ?

Submitted by विवेक नाईक on 25 September, 2011 - 06:33

सर्वसाधारण पणे पुजेत तांब्याची भांडी वापरतात. ह्याला काही कारण आहे का ?

ह्या ले खा ला कारण वाचना त आलेला NATURE मधला लेख.

२००४-२००५ साली NATUREची एक टीम पिण्याच्या पाण्याच्या विकसनशील देशा च्या समस्या ह्या विषयाषवर संशोधन करण्या करता भारतात आली. त्यांनां भारतातील खेडेगावातील पाण्याची स्त्रोते विशाणु व
जिवाणुनी दुषीत आढळली. अर्थातच त्यांचा ईथे यायचा हेतु सफल झाला. त्याना हेच दाखवायचे होते कि भारता सारख्या देशात साधे पिण्याचे पाणी धड मिळत नाही. पण ईथे असा एक मुद्दा उपस्थित झाला होता ज्यास बगल
देता येणे शक्य नव्हते.

रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे

Submitted by जागोमोहनप्यारे on 24 September, 2011 - 06:44

रामायण घरात वाचावे, महाभारत देवळात वाचावे ( घरात वाचू नये) असे म्हणतात ते खरे आहे का?

आरण्यकही घरात वाचू नये असे म्हणतात.

महाभारत घरात वाचायचे नसते हे खरे असेल तर मग गीताही घरात वाचता येणार नाही ना? Happy

दृष्ट कशी काढावी?

Submitted by जागोमोहनप्यारे on 23 September, 2011 - 05:54

दृष्ट कशी काढावी?

लहान मुलांची किंवा मोठ्यांचीही कधी कधी दृष्ट काढली जाते, बाहेरची बाधा झाली असेल, कुणाची नजर लागली असेल तर असा प्रकार करतात. ( म्हणजे नेमके काय? )

संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलट्सुलट ओवाळतात. ज्वारीची भाकरी त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही काही ठिकाणी ( आमच्या घरी Happy ) वापरतात. सनातनवाल्यांच्या पुस्तकात नारळाने द्रूष्ट काढावी असे दिले आहे असे वाटते.

दृष्ट काढल्यानंतर ते पदार्थ तीन रस्ते एकत्र येतात तिथे तिठ्यावर नेऊन टाकायचे असतात. नारळ असल्यास तिथे आपटून फोडायचा असतो. तिथे जाताना कुणाशी रस्त्यात बोलायचे नसते.

आर्यअष्टांगिक मार्ग

Submitted by rkjumle on 9 September, 2011 - 12:32

अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे.
धम्मपदाच्या एकशेसाठाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की,
‘अत्ताहि अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया।
अत्तनाव सुद्न्तेन नाथं लभति दुल्लभं॥’
याचा अर्थ आपणच आपला मालक आहे. कोणी आपला मालक असू शकत नाही. स्वत:चे निग्रह करणारा दुर्लभ स्वामीत्व प्राप्त करीत असतो.

विषय: 

गणपती विसर्जन आणि प्रदूषण

Submitted by जागोमोहनप्यारे on 6 September, 2011 - 07:13

गणपती विसर्जन आणि प्रदूषण

आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.

हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.

१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?

गणपतीची मूर्ती

Submitted by अंजली on 15 August, 2011 - 10:38

अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.

मुंबईमधली भजनीमंडळं

Submitted by शर्मिला फडके on 23 July, 2011 - 12:35

मला मुंबईमधल्या भजनीमंडळांबद्दल माहिती हवी आहे. भजनीमंडळांची परंपरा मुंबईमधे किती वर्षांपासून आहे, जुनी भजनीमंडळं कोणती, त्यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी, वैशिष्ट्य, एकुण किती भजनीमंडळं मुंबईत आहेत, लोकल ट्रेन्समधली भजनीमंडळं, त्यांचा काही एकत्रित ग्रूप-संस्था आहे का याविषयीही माहिती हवी आहे. कृपया कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी इथे जरुर सांगावी.

अति

Submitted by डी.आर्.खैरे on 15 July, 2011 - 12:21

*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

Submitted by जागोमोहनप्यारे on 20 June, 2011 - 12:45

लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?

1. लिंबू आणि मिरची

2. काळी बाहुली

3. पायताण उर्फ चप्पल

4. इतर, कोळसा इ.

यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?

nimbu.jpg

Pages

Subscribe to RSS - धर्म