क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाईट वॉचमन म्हणून कोणाला पाठवायचे असे तुम्हाला वाटते? >> पंत ला Lol खुश आता का बर्ग Happy >> नावॉ सारखे जाबबदारीचे काम पंत ला? अरेरे ईशांत परवडला त्यापेक्षा.

पंतबद्दल आता मला बोलणे अयोग्य वाटते कारण तो संघात आहे. >> Lol ह्या न्यायाने संघातल्या बाकीच्या दहा जणांबद्दल पण बोलणे अयोग्य होईल ना. Proud अगदी शास्त्री बद्दल सुद्धा. Wink

ह्या क्षणी तरी इंग्लंडमधे कार्‍थिक ऐवजी तो जास्त चांगली किपिंग करतोय. बॅटीम्ग दोघेही गंडलेले आहेत पण माझ्या मते किपिंग साठी किपिंग हा पहिला criteria हवा. (साहाला पाठीम्बा देण्याचे कारण तेच). भरथ चांगला पर्याय होउ शकेल का हे माहित नाही. पुढे कळेल. > अरे पण बॅटिंग साठीच पंत ला आत घ्या म्हणत होतास ना तू एवढे दिवस? आता म्हणतो किपिंग बघा... एवढे बाईज देऊन सुद्धा.. Uhoh पंत ने खराब बॅटिंग आणि कीपिंग केली ह्याचे ऊत्तर कार्तिक ने पण केली हे कसे काय?
भरथ चांगला पर्याय होउ शकेल का हे माहित नाही. >> धन्य!

हणुमा विहारीचा record impressive आहे. टेस्ट मधे यायला जे काहीकरायला हवे असे इथे सगळॅ म्हणत आले आहेत ते सगळे बॉक्सेस तो टीक करतोय. >> मग हनुमा विहारीबद्दल का बोलतो आहेस... पंत बद्दल न बोलण्याचे लॉजिक त्याला लागू नाही का? की फक्त तू रिकमेंड केल्यांपैकी जो चांगला खेळेल फक्त त्याच्याबद्दलच बोलायचे Proud खेळला तो बाब्या खपला तो कार्टा... ये ना चॉलबे Proud

आज मीचे भेटलो का बाबा तुला ? मी कधी पंत ला फक्त बॅटींग साठी घ्या म्हटले ? मी नेहमी हेच म्हटलय कि किपर आधी किपर म्हणून हवा (साहा च हवा असा कंठशोष मी नि फे फे इथे करत होतो धोनी झगडत असताना). बॅटींग बोनस येते. "पंतबद्दल आता मला बोलणे अयोग्य वाटते कारण तो संघात आहे." ह्याचे एव्हढे साधे स्पष्टीकरण आहे पण तुला ते कळून घ्यायचे नसेल तर सॉरी माझा पास बाबा.

भरथ चांगला पर्यात होउ शकतो का हे मला माहित नाही कारण मी त्याला कधी आधी follow केले नाही फक्त त्याच्याबद्दल (फे फे ने वर त्याचे नाव लिहिले ते बघितल्यावर) वाचले आहे हे मी नमूद करतो. तुला त्यातून काय अर्थ काढायचा असेल ते तू बघ.

फक्त तू रिकमेंड केल्यांपैकी जो चांगला खेळेल फक्त त्याच्याबद्दलच बोलायचे >> मी तुला कधी बंदी केली बोलण्याबद्दल ? तू बोलू शकतोस पण मी बोलायलाच हवे ही जबरदस्ती का बाबा ते नाही कळले ? माझ्या अल्पमती प्रमाणे टेस्ट साठी साहा available असेल तर नेहमीच पहिली choice असली पाहिजे. तो नसेल तर पंत कारण तो तरूण आहे, त्याचे किपींग बाकीच्या उपलब्ध पर्यांयांपेक्षा चांगले आहे. (कमीत कमी त्यांच्यापेक्षा वाईट नाही). तो लेफ्टि आहे. बॅटीग क्लिक झाली तर बोनस मिळू शकतो. (हे मी नाही Gilchrist म्हणालाय, तुला शंका असल्यास त्याला विचारु शकतोस). होतकरू आहे. हे सगळे बघता त्याला ग्रूम करने सयुक्तिक वाटते. (ह्यात मी भरथ ला धरत नाही कारण मला डीटेल्स माहित नाही). ग्रूम Domestic cricket मधे करणे झाले असते तर आवडले असते पण सध्या आपण त्याला फारशी value देत नाही नि on the job training हा मंत्र दिसतोय. If I have to punt some keeper beyond Saha then I would prefer Pant हा साधा विचार आहे. २-३ सामने बॅटींग केली नाही म्हणून कीपरला त्या न्यायाने बसवणे पटत नाही. दिलेल्या byes धरूनही (वर हिम्या ने त्याचेही सयुक्तिक कारण दिले आहे) कार्थिक पेक्षा उजवे (no pun intended) यष्टीरक्षण केले आहे त्यामूळे 'फक्त मी त्याचे नाव सुचवले होते' ह्या अजब न्यायाने त्याच्याबद्दल बोलणे माझ्या डोक्यावरून जातेय रे.

उद्या कुकला आदरांजली म्हणून कोणी तरी उद्या त्याच्यासारखा उभा राहील अशी आशा धरूया. >>> Lol ते शेफ चा ड्रेस घातलेले त्याचे फॅन्स मस्त होते.

खरे म्हणजे या १४७ धावांच्या जोरावर कूकने आणखी १०- १५ टेस्ट्स खेळायला हवे होते . अजून त्याच्यात खूप क्रिकेट शिल्लक आहे या नावाखाली. (अजून उसाच्या पाचटात खूप रस आहे !) निदान आपल्याकडे तरी झाले अस्ते बोवा तसे. पण इतर देशात क्रिकेटम्ध्य फार पैसा नसल्याने लोकांना रिटायर व्हायला फार विचार करावा लागत नसावा.....

मुरली विजय साहेबांना IPL नाही तर वाढतं वय नडतं आहे. आता तो पस्तिशीचा आहे. गेल्या दीड वर्षांत (१ फेब्रुवारी २०१७ ते आत्तापर्यंत) तो १२ टेस्ट्स खेळला. (एकूण संख्येच्या १/५) त्यात त्याची सरासरी करीअर सरासरीपेक्षा ४ ने खाली आहे. (३९ --> ३५) ह्या कालावधीत त्याची चार शतकं हैदराबाद (बांग्लादेश), नागपूर (श्रीलंका), दिल्ली (श्रीलंका), बंगलुरु (अफगाणिस्तान) ही आहेत. ह्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात ८२ वगळता मोठी धावसंख्या नाही. दुसर्‍या डावात (जेव्हा आपण दुसरा डाव खेळलो) तर त्याच्या धावसंख्या - ७, २, ८, ९, १३, ९, २५, ६, ० - अश्या आहेत. एका चांगल्या खेळाडूबरोबर एज हॅज कॉट अप. मन बळकट करून गेममध्ये वयानुसार गरजेपुरते बदल करून चांगला खेळणार असेल तर अजून २-३ वर्षे खेळेल ३७-३८ पर्यंत. (तशी क्षमता आहे त्याच्यात.) अन्यथा बाय म्हणायला फार वेळ लागणार नाही.

अख्ख्या सिरिज भर ऋन्मेषची एकही कमेंट नाही हे बघून जरा कसनुसं होतं आहे....

आपण आज लंच पर्यंत तरी टिकणार का? लावा बेट....

आपण आज लंच पर्यंत तरी टिकणार का? लावा बेट....>>>

हिम्स, जेवणाचा आस्वाद घेऊन खेळतील बघ.. चहापाना पर्यंत कसाबसा नेऊ शकतील. चहापानानंतरची रिस्क नाही घेत! Wink
ह्या सामन्यात टी टाईम नंतर धपाधप आऊट झालेले दोन्ही संघातले..

राहुल १००

ऑस्ट्रेलियाला जाणार ( आणि ) परत विकेट फेकणार

जर नायरला ३०० करूनही बसवलं होतं तर याला पण बसवायला हवं

सगळे ऑड्स भारताविरूद्ध आहेत. पण तरिही राहूल, रहाणे आणी आता पंत ह्या तिघांनी चांगली फाईट दिलीये. हेच बघण्यासाठी टेस्ट क्रिकेट बघायला आवडतं. ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर धवन चा अ‍ॅटीट्यूड, टेक्निक, टेंपरामेंट फारच उघडं पडलं ह्या सिरीज मधे.

"Highest 6th wkt stand for India in the 4th inns, going past 136 b/w Tendulkar & Mongia v Pak, Chennai, 1999", says Bharath Seervi.

अजून १८६ धावा बाकी. ३७ ओव्हर्स बाकी.

भा, मुरली विजय ची सुरूवातीची त्याची टेस्ट प्लेअर इमेज अजूनही डोक्यात आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदा तेंडुलकर बरोबर ३०० ची भागीदारी, स्वतःचे शतक वगैरे. आत्ता स्टॅट्स पाहिले तर घरच्या मैदानावर अजूनही बराच भक्कम दिसतोय तो. गेल्या दहा टेस्ट मधे/साधारण मागच्या दोन वर्षांत पाच शतके आणि एकदा ८२. प्रॉब्लेम बाहेर च्या मैदानांवरचा आहे. अर्थात तुलना करायला इतरांचे स्टॅट्स बघितले नाहीत.

पण आयपीएल हा मुख्य प्रॉब्लेम नाही हे खरे असावे. माझ्या डोक्यात तो मधली काही वर्षे आयपीएल मधेच दिसला आणि त्यामुळे त्याचा खेळ बिघडला असे वाटले.

आत्ता स्टॅट्स पाहिले तर घरच्या मैदानावर अजूनही बराच भक्कम दिसतोय तो. गेल्या दहा टेस्ट मधे/साधारण मागच्या दोन वर्षांत पाच शतके >>> ती कोणासमोर आहेत ते मी लिहिले आहे. प्रॉब्लेम किंचित हळू झालेल्या शरीराचा आणि त्यामुळे झालेल्या टेंटेटिव्ह मनाचा आहे, जे बाहेरच्या पिचवर जास्त ब्रुटली एक्सपोझ होते. नाहीतर तसा तो माँक आहेच. पण दुसर्‍या इनिंगमध्ये हाइयेस्ट एकदाही २५च्या वर नाही, घरीही नाही.

मुरली विजय ची सुरूवातीची त्याची टेस्ट प्लेअर इमेज अजूनही डोक्यात आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदा तेंडुलकर बरोबर ३०० ची भागीदारी, स्वतःचे शतक वगैरे. >>> ते तर आहेच. तो चांगला खेळाडू होताच आणि आहेही. त्याचा डेब्यु २००८मध्ये होता तेव्हा तो २५चा होता, पण त्याला अ‍ॅक्चुअल लाँग रन लगेच मिळाली नाही, त्यामुळे २७च्या आसपास असलेली बॅट्समनची पीक इयर्स त्याला तितकी मिल्क करायला मिळाली नाहीत.

पंत फुल स्विंग मधे धुतोय.. शतक झाले.. आता टी-२० करा शेवटच्या सत्रात आणि मॅच जिंका..

राहुल पण धोपटू शकतो.. आता फक्त नवीन बॉल घेतल्यावर काही कोलॅप्स व्हायला नको...

मॅच चा निकाल काहीही लागो. पंत नी कार्थिक - पटेल जोडीचा निकाल लावला हे खरंही आहे आणी बरंही आहे. किती वर्षं, त्याच जुन्या खोडांना कवटाळून बसणार होतो आपण? ते सुद्धा, त्यांच्या जबरदस्त परफॉर्मन्स पेक्षा, दुसरा काही उपाय नसल्यामुळे. way to go Pant!

३३ षटके १६६ धावा.. की ५ बळी की अनिर्णित???
आपापले अंदाज येऊ द्या..

ओव्हलवरच गावस्कर २२१ करून ४३८ चे लक्ष आटोक्यात आणलेले तेंव्हा 9 धावा कमी पडल्या व अनिर्णित राहिला सामना अनिवार्य षटके संपलेली..

प्रत्येक सामन्याचं भाकीत मागच्या आंकडेवारीवरून न करतां त्या सामन्यात मागच्या आंकडेवारीला हुलकावणी देण्याची कुवत आहे असं समजून सामना पहायला बसणं अधिकच आनंदायक असतं. या सामन्याने तसा आनंद देण्याचं ठरवलंय !
Well played ! Keep up.

I am glad to accept that I did not see it coming.
राहूल आणि पंत.. अतिशय कौतुकास्पद प्रयत्न.
निकाल काहीही लागो... पण पाचव्या टेस्टच्या पाचव्या दिवशी पाच विकेट्स स्वस्तात पडलेल्या असतांना आणि कोणालाही अपेक्षा नसतांना डोंगराएवढे लक्ष पार करून जिंकण्याची आशा निर्माण करणे हीच खूप मोठी अचिवमेंट आहे.
नक्कीच काही काळ लक्षात राहिल ही खेळी.

पंत आणि जाडेजाने शांतपणे खेळून काढायला पाहिजे आता.. जिंकण्याची शक्यता नाहीच, निदान ड्रॉ तरी फिक्स करा

पोस्ट टी सेशन आपला लौकिक ह्या सामन्यात कायम.. सर्व ५ दिवस..

५-३२५ ते १०-३४५. २० धावात संपला शेपटाचा प्रतिकार..

राहुल, पंत आणि काहीसा रहाणे ह्यांनी रंगत आणली शेवटच्या दिवशी.

३७ धावसंख्या करून कितीजण बाद झाले ही पाहायला हवे..

Pages