पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

Submitted by admin on 22 April, 2013 - 23:08

या अगोदरचे धागे
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्ला हो अकबर !

उद्यापासुन रोजा ठेवायचा आहे. रात्री हसिपिटलात नैट ड्युटी असणार. तेंव्हा रात्रीच स्वयपाक करुन डब्यातुन नेणार ... दही भात व एक भाजी / उसळ असा सकाळचा बेत .

उसळ कांदा लसुण घालुन केल्यास टिकते का ? हसिपिटलात फ्रीज आहे. पण मी बहुदा वापरणार नाही. कारण तो चौथ्या मजल्यावर आहे.

किंवा पीठ लावलेली पालेभाजी टिकेल का ?

मग नैट संपली की लगेच दुसर्‍या हद्पिटलात मॉर्निंग करुन दुपारी चारला घरी.

मगसंध्याकाई आधी सरबत घेउन उपवास सोडणे. मग खजूर , फळे . मग थोड्या वेळाने पोळी भाजी वगैरे खाउन पुन्हा डबा घेउन नैट ड्युटी.

पहाटेसाठी भाजी टिकायला कोणती व काय करु ?

शक्यतो कोरड्या भाज्या, पीठ/भाजणी पेरून केलेल्या भाज्या, कोरड्या उसळी (चवळई, मटकी, वाटाणा, मूग), परतून केलेल्या भाज्या टिकतातच एक दिवस.
सोबत एखादी चटणी/जॅम; हवी असतील तर काकडी, गाजर इ सलाद न्यायचं (काकडी, गाजर फक्त धूवुन तसंच न्यायचं नो काप, चिराचिरी बिन्नेस). कँटीन २४ बाय ७ असेल अन दही वगैरे असेल मिळत तर प्रश्नच नाही.

असा डबा खायला फार कोरडा कोरडा ही होत नाही अन ते तेल गळणं, रस्से लवंडणं असले प्रकारही होत नाहीत.

तुम्ही मुंबईत असाल, अन तुमच्या कामाच्या ठिकाणी एसी असेल तर फारच छान. अश्यावेळेस डबे फक्त बॅगमधून काढून टेबलवर ठेवावेत.

इन्सुलेटेड लंच बॅग्स मधे एक आइस पॅक घालून मग भाजीचा डबा घातल्यास १०-१२ तास तरी अन्न नीट टिकेल. इथले लोक कोल्ड कट्स ( मीट स्लाइसेस ) चीझ, सॅलडस इत्यादी नेहमी आणत असतात . आउटडोअर काम करणारे लोक पण असे लंच बॅग्स + आइस पॅक वापरतात.

कांदा - लसूण - आलं - मिरची - कोथिंबीर - टोमॅटो; हे सगळं किंवा यातलं काहीही घातलं तरी भाजी/उसळ परतून कोरड्या केलेल्या असतील तर एक रात्रभर सहज टिकतील.

योकु आणि मेधा +१
दहीभात नेण्यापेक्षा दूधभाताला विरजण लावून न्या म्हणजे खाताना आंबट्ट होणार नाही. आइसपॅकपेक्षा (सिंगल सर्व्ह कार्टन्स मिळत असतील तर) एखादा ज्यूस किंवा नारळपाण्याचा पॅकच फ्रीझ करून नेऊ शकता. (विरजण लागायला हवं असेल तर तो भाताजवळ पॅक करू नका. Happy )

रमादान करीम!

कांदा लसूण वापरू नका त्याऐवजी कांदालसूण मसाला असेल तर वापरा. मसालेदार उसळींपेक्षा सुंदल म्हणून एक तमिळ प्रकार असतो तो करून बघा. रात्रीची वेळ असल्याने भाजी अथवा उसळ बिघड्ण्याची शक्यता तशी कमी आहे. दहीभातासाठी दही कमी आणि दूधग्जास्त वापरा म्हणजे आंबट होणार नाही. काकडी गाजर अथवा इतर भरपूर फळे सुकामेवा सहरीला खाऊन घ्या.

उपवास सोडताना खजूर खाऊन मग बाकीचे खायचे प्यायचे असते ना?

उंट कुठुन आणू ?

अमेरिकेत उंटावरचे शहाणे रहतात . त्याना इचारायला लागेल.

न्हायतर गझल गुरुना इचारावे लागेल. गझलेतील रदीफ म्हणजे उंटावरची स्त्री !

रात्री किती वाजता स्वयंपाक करणार आणि किती वाजता डबा खायची वेळ येणार?

मुंबईत सध्या पाऊस असल्याने हवा चांगली आहे. ओलं खोबरं न घालता केलेल्या भाज्या १२ तास नक्कीच चांगल्या राहत आहेत. सकाळी सात वाजता फोडणीला टाकलेली भाजी डबे भरून वाटीभर उरलेली फ्रिजमध्ये ठेवण्यास विसरले तरी रात्री आठ वाजता खायला चांगली राहते आहे.

काउ, ओलं खोबरं/बटाटा घातलेल्या भाज्या टाळा. सद्ध्या बरेच तास अन्नं फ्रिजबाहेरही चांगलं राहतंय. रात्री बनवलेलं सकाळी तर खाता येईलच. खरोखर रोजे राखणार असाल (भंकस नसेल तर Wink ) तर अ‍ॅसिडिटी होवू नये म्हणून तेलकट तळकट भाज्या टाळा. तुमच्या प्रोफेशनमुळे जागरणं अपरिहार्य आहेत. अख्खा महिना उपवास असतील तर आहाराचा व्यवस्थित प्लॅन तयार करा.

हॉटेल मद्धे मिळतात तसे स्ट्फ केलेले मश्रुम्स कसे करयाचे घरी ?
त्यात नक्की कसलं स्ट्फिंग असतं
अगदी चीज वगैरे नको पण जरा कमी कॅलरीवालं पण चवदार स्ट्फिंग सुचवा प्लीज

पहाटेपर्यंत भाज्या टिकतील वा नाही याची शंका असल्यास भाज्या किंवा उसळींचे सारण भरलेले पराठे व दही / ताक /लस्सी नेऊ शकता. किंवा भाज्यांचे लोणचे, कोरड्या चटण्या वगैरे. मऊ मूगडाळ खिचडीही आदल्या रात्री केली असली तरी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगली टिकते (व जास्त छान लागते.)

काऊ, कांदा नीट परतला नाही तर पदार्थ गरम हवेत खराब होतो. वर नंदिनीने सुचवल्याप्रमाणे कांदा लसूण मसाला वापरलात तर नाही खराब व्हायचा.

चिंच किंवा व्हीनीगर घातलेले आणि व्यवस्थित गरम केलेले पदार्थ, खराब होत नाहीत सहसा.

भाज्या, पाणी न घालता नुसत्या तेलावर कोरड्या परतल्या तरी टिकतात पण खाताना सोबत ताक / दही घ्यावे नाहीतर फार कोरड्या वाटतात.

बटाट्याची विविध प्रकारे भाजी मी नेहमी करते पण उडप्याच्या हॉटेलात मसाल्या डोश्यात जी भाजी असते ती जमत नाही. त्यात कांदा उभा चिरलेला असतो, बटाटा थोडा पातळ असतो तर थोडा घट्ट पण असतो. तेल भरपुर आहे असेही वाटत नाही. मी तशी भाजी करायचा प्रयत्न केला असता बटाटा कोरडा तरी राहतो किंवा मग पुर्ण विरघ़ळून तरी जातो. इथे खुप लोकांनी डोश्याबरोबर ब्.भाजी दिलीय पण ती दिसायला तरी मला उडप्याकडच्यासारखी वाटत नाही. Sad

साधना, फोडणीत उभा चिरलेला कांदा, राई, चणाडाळ, उडिद डाळ. हि. मि. कढीपत्ता, घालून डाळींचा रंग लालसर झाला की त्यात थोडी हळद घालायची त्यात २ टे. स्पून पाणी घालून थोड उकळू देऊन मग त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, चवीनुसार मीठ घाला आणि ढवळून घ्या. पाणी आटत आल की त्यात ओल खोबर आणि कोथिंबीर घाला.

साधना सेम प्रोब्लेम मलाही होता . मी कांदा परतून शिजला कि लगेच बटाटे घालायचे. पण आता त्यात थोड पाणी घालून कांद्याचा कडकपणा कमी होईपर्यंत थांबते. १-२ चिमुट साखर पण घालते .

देवीका, आरती आणि मंजुडी तिघींचेही आभार.. आज सकाळी मंजुडीच्या रेसिपीने केली भाजी. आता उररेल्या दोन रेसिप्या पण करुन पाहते. ही भाजी मला नुसतीच खायला पण आवडते. खुप चविष्ट.

एक भाजी मसाला मिळायचा पुण्यात पण आता ते उत्पादन बंद झालं. माझ्याकडे जे शेवटचं पॅकेट होतं त्यावर घटक लिहिले आहेत ते असे -

तीळ, खोबरे, खसखस, दाणे, गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला, धने जिरे पावडर

वरील सगळे घटक - गुळ - सोडून भाजायचे आणि मिक्सरमधून काढायचे का ?

प्राजक्ता, मसाले करताना काही घटक पदार्थ अगोदर तेलात खमंग भाजतात. नुसते भाजले तर तसा स्वाद येईलच असे नाही. प्रयोग म्हणून तू दोन्ही प्रकारे करून बघू शकतेस! Happy

तीळ, खोबरे, खसखस, दाणे, गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला, धने जिरे पावडर>>

प्राजक्ता, यापैकी फक्त तीळ, खोबरे, खसखस, दाणे भाजावे (कोरडेच) लागतील, बाकी गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला, धने जिरे पावडर भाजायची गरज नाही.
हा मसाला भरली वांगी, तोंडलीचा रस्सा, कारल्याची पंचामृती भाजी यांसारख्या भाज्यांना आम्ही घालतो. चिंचगुळाची चव मस्त खुलते या मसाल्याबरोबर.

मंजूडी +१
साधरण प्रमाण खोबर्‍याच्या निम्मे तीळ आणि तेवढेच शेंगदाणे. एक वाटी खोबरे असेल तर एक चमचा खसखस. स्गळे कोरडे भाजून मिक्सरमधुन काढायचे. १ वाटी गोडा मसाल्याला १/३ वाटी धणे जीरे पावडर. आता खोबरे तीळ मिश्रण आणि गोडामसाला मिश्रण हे आवडीप्रमाणे १:१.५ किंवा १:२ प्रमाणात एकत्र करायचे. तिखट , मीठ , गूळ शिजवताना घालायचे वरुन.

कोणी सांगेल का दुधात बुडवून खायच्या शेवया कुठे मिळतात? उकडीच्या करतात त्या नव्हे (शिरवळ्या म्हणतात त्या) .ह्या शेवयांवर गरम पाणी घालून नंतर दुधात बुड्वून खातात म्हणे.माझ्या मैत्रिणीसाठी हव्या आहेत.

ड्रॅगन कंपनीच्या असतात. कुठल्याही चांगल्या वाण्याच्या दुकानात मिळतात.
ह्याच्या फोडणीच्या शेवया, दही शेवया किवा वर लिहेल्याप्रमाणे दूध शेवया तिन्ही छान लागतात.

Pages