नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान

माझ्या आईची शिवणकला.

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

माझ्या आईला शिवणकामाची फारच हौस! सध्या तर तिच्या उत्साहाला अजूनच उधाण आलेलं आहे.

माझ्या आज्जीला (आईची आई) शिवणकामाची आवड. तोच वारसा आईकडे आला. मात्र, तिला मोठ्याचे कपडे वगैरे शिवायला आवडत नाही. तिचे स्पेशलायझेशन लहान बाळाच्या कपड्यामधे आहे. दरवर्षी तिचा चातुर्मासाचा नेम पाच बाळगोपाळाना "ड्रेस देणे" असा असतो. :)सध्या तिने एकूणात ८० दुपटी, २५ झबली आणि अजून बरंच बरं काय काय शिवलय. अजून इकडे तिकडे दुकानात जाऊन बघून यायचं आणी घरी येऊन शिवायचं हे तिचं चालूच आहे.

विषय: 
प्रकार: 

स्कूल चले हम!!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

शाळा चालू झाल्या... नविन रेनकोट, नविन छत्री, नविन दप्तर, नविन पुस्तकं...

नविन पुस्तकाचा तो मनामधे अजून पण दरवळणारा वास.

खूप खूप दिवसानी भेटणार्‍या ते मित्र. त्याच्यासोबत अखंड चालणार्‍या गप्पा..

आणि या सर्वाना सोबत म्हणून आकाशातून कोसळणारा तो पाऊस.

आता तो पाऊस आहे, रेनकोट आहे, पुस्तकं आहेत... नाहीत ते फक्त जवळचे असे मित्र-मैत्रीण.. आणि त्या अखंड गप्पा!!!!!

DSC00066.JPG

विषय: 

नागदर्शने!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

कोकणामधे राहिल्यावर सर्वात जास्त सवय कशाची झाली असेल तर ती जनावराची. महिन्याभरात तरी कुणाकडे जनावर निघालं, मग ते जातिवंत होतं का, त्याला कसं पकडलं वगैरे चटपटीत गॉसिप ऐकलं नाही असं होतंच नाही.

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे त्याचे बाहेर पडायचे दिवस. नेहमीचं दमट हवामान त्याला मिळालं नाही की तो स्वतःच शोधत निघतो, मग कुणाच्या कपाटात, संडासात, मोरीत, बेसिनमधे आलेला दिसला, की समोरच्याची हबेलहंडी उडालीच.

विषय: 
प्रकार: 

भटकंती -- कर्नाटक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गेल्या खूप दिवसापासून "कुठेतरी फिरायला जाऊ या ना!!" अशी भुण भुण कधीपासून आमची चालू होती. त्यात पप्पाना एकुलत्या एका जावयाला कर्नाटकातून तेही स्वतःच्या गावी घेऊन जायचे होतेच होते. आमचा देसायांचा वाडा, गावातले धरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक प्रांत एकदा फिरवून आणायचा होता. अर्थात सतिशला पण फिरायची फारच आवड असल्याने तो तर कधीचाच तयार होता. पण त्याला कर्नाटकामधे सर्वात जास्त उत्सुकता ही तिथल्या वडापची होती. लोकं बसच्या टपावरून प्रवास करतात असे त्याला कुणीतरी सांगितले होते. आईला मंत्रालयमला जाऊन जावयाकडून सुवर्ण रथोत्सव करायचा होता.

एकटी! (जुन्या मायबोलीवरील कथा)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125979.html?1179812335

दरवाजा उघडून आत आले. संध्याकाळचे सात साडेसात वाजले असतील. एक कुबटसा वास मला जाणवला. खरं तर मला आता या वासाची पूर्ण सवय झाली होती. दिवसभर घर बंद. त्यात आल्यावरही दरवाजा खिडक्या सगळे बंद. उद्या सकाळी थोडा वेळ खिडक्या उघड्या ठवायला हव्या. परत एकदा मनाशी विचार केला.

तिथेच असलेल्या खुर्चीवर बॅग ठेवली. आणि कोपर्यात ठेवलेल्या सोनुकडे पाहिलं. सोनु मला बघून खुश होता. तिथल्या तिथे फ़िरायला लागला की समजायचं की स्वारी खुशीत आहे. सोनु, माझा गोल्ड फ़िश आणि या घरातला एकमेव जिवंत प्राणी, माझ्याशिवाय.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

हे असं का घडतं??

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हा मी जुन्या मायबोलीवर लिहिलेला एक लेख आहे. एका तत्कालिक घटनेवर मनात उठलेल्या प्रतिक्रियेवर. त्या वेळेला मनात फार चलबिचल झाली होती. असे कसे घडू शकेल असे प्रश्न होते आता दोन तीन वर्षानंतर ती घटना देखील नीट आठवत नाहिये. रोजच्या अमानुष खून्, बलात्कार आणि अतिरेकी कारवाया. काय काय लक्षात ठेवणार. आणि किती लक्षात ठेवणार??

कदाचित माझे मन मुर्दाड बनत चाललेय.
किंवा कदाचित या घटना आता "नॉर्मल" झाल्या आहेत.

विषय: 
प्रकार: 

शब्देविण संवादु

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कम्युनिकेशन म्हणजे काय? असा पंधरा मार्काचा पहिलाच प्रश्न... मग त्यामधे सेंडर रीसीव्हर मेसेज नॉइज हे सर्व लिहिलं की मार्क मिळायचे... पण एकदा रमा मॅडम क्लासमधे म्हणाल्या, "प्लीज पाठ करून लिहू नका. तुम्हाला काय म्हणायचेय हे मला समजले की तुम्हाला मार्क मिळाले असे समजा."

पण कधीच पंधराच्या पंधरा मार्क मिळाले नाहीत. मला काय म्हणायचेय ते मॅडमना समजले नाही किंवा समजावण्यात माझेच शब्द तोकडे पडेल.. जे काय असेल ते.

प्रकार: 

विठ्ठल तो आला आला!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पंढरपूरवरून तसं माझं कायमचं येणं जाणं. आईचं माहेर बार्शी त्यामुळे कोल्हापूर बार्शी रस्त्याला पंढरपूर लागायचंच. लहानपणी एस्टीतून जाताना आई विठोबाला नमस्कार कर असं सांगायची.

विषय: 
प्रकार: 

निजरूप दाखवा हो!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कधी भेटणार तो मला? कधी संपणार ही वाट?
कित्ती दिवस चालतोय. किती रात्री जागून काढल्या.
त्याच्या येण्याकडे डोळे लावून वाट बघत बसलोय.
डोळे थकून थकून गेले.
अश्रूचीच एक सर.. एक सर झरझरत बरसली.
पण त्याचा पाऊस अजून कसा नाही आला?

विषय: 
प्रकार: 

अपघाती अनुभव!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"आयुष्यात कधी मला काही झालं ना तर डायरेक्ट मरायला आवडेल मला.... उगाच च्यायला हातपाय निकामी झाल्यावर जगण्यात काय अर्थ आहे?" मी हॉस्टेलमधे एकदा तरातरा बोलले होते. "दुसर्‍यावर आपलाभार कधी होता कामा नये.." हे माझं तत्वज्ञान.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - नंदिनी यांचे रंगीबेरंगी पान