जेरी ने खूप वेळा सांगून पाहिले पण मेरी कसली ऐकतेय .
टॉम पासून सतत सावध रहावं लागतं आणि तिला हि सांभाळावं लागत .
तिच्या गावात सवय नाहीना ट्रॅप ची कितीवेळा सांगितले कि अग
चीज दिसलं कि लगेच खायला जाऊ नकोस , अनु मावशी चीज बाहेर चुकून कधीच विसरणार नाही .
रात्र झाली मेरी आणि जेरी अनु मावशी झोपल्यावर हळूच बाहेर निघाले. किचन मध्ये पडलेले बिस्किट्सचे तुकडे आनंदाने खाऊन टेरेसवर जाणार इतक्यात मेरीने ट्रॅप मध्ये लावलेला चीज चा तुकडा बघितला .
जेरीने थांबवायच्या आधीच पळत जाऊन ट्रॅप मध्ये शिरली आणि अडकली.
कविता :
माझ्या उरात दडले, होते सवाल काही…
काटे मनात आणि, ओठी गुलाब काही!
विझले जरी निखारे, राखेत प्राक्तनाच्या…
जाती फुलून ठिणग्या, माझ्या दिलात काही!
पाण्यात वेढलेला, परी राहीलो तृषार्त…
प्राशून आसवांना, सरली तहान काही!
संगीत आणि कंठस्वर : पशुपत
काव्य : सुधीर फाटक
तो एक वाटाड्या होता. प्रवाशाला पुढचा रस्ता दाखवणं कामच होतं त्याचं. पुर्वी सठीसहामाशी हाताला काम मिळायचं, येतच कोण होतं मरायला इतक्या आडगावी.
आत्तापर्यंत ९९ जणांना त्याने वाट दाखवायचं काम केलं होतं. नियमाप्रमाणे शतक झाले की तो करार मुक्त होणार होता.
सद्गतीच्या वाटेवर नेणे हे कामच होते त्याचे. गोंधळलेल्या, घाबरलेल्या वाटसरूला या सुंदर शाश्वत वाटेची ओळख करुन द्यायला त्याला मनापासून आवडायचे. या वाटेवरचा तो एक वाटाड्याच तर होता. आणि आज तर मुक्तीचा दिवस होता. आज शतक पुर्ण होण्याचे संकेत त्याला कधीचे मिळाले होते.
दारच्या बागेतली फुलं/पानं वापरून केलेला प्रयत्न.
२०२२ जुलैची एक सायंकाळ -
खंडाळ्याच्या घाटात मेघ मल्हारच्या नादात सरी झेलत अनिकेची विकांताची धम्माल सुरू होती. लाँग राईड वर एकट्यानेच जायला आवडायचं त्याला. मस्त धुवांधार पाऊस, पल्सर आणि एक निसर्गवेडा.
२०२२ जुलैची ती रात्र -
चिंताग्रस्त होऊन सर्वजण डॉक्टरांची प्रतीक्षा करत ओटीच्या बाहेर उभे. ऑपरेशन संपले आणि अनिकेत कोमात गेल्याचे कळल्यावर आई बाबा शून्यात हरवून बसलेले.
दोन दिवसांपूर्वी तो ममा-डॅडासोबत डोंगरामागच्या कुरणात खेळायला आला होता. त्याला इथेच थांब, असे सांगून ममा-डॅडा कुठेतरी गेले होते. दोन दिवसांपासून तो त्यांची वाट बघत होता. आताशा त्याला घराची खूप आठवण येऊ लागली होती. त्याचे छोटेसे घर, मऊ उशी, खेळणी, कपडे आठवत, त्याने आकाशाकडे बघत आवाज काढला. त्याला सपाटून भूकही लागलेली होती. पोटात खड्डा पडला होता.
रात्री काहीजण त्याच्यापुढे अन्न टाकून गेले होते.
"यक्, मी नाही शिळे खात!"
तेव्हढ्यात त्याला ओळखीचा वास आला.
उंच डोंगरावर काहीतरी हलताना दिसत होते. ममा-डॅडा आले असतील का? त्याने आनंदाने चारही पायांवर उडी मारली.
हैबती अन सुभान्या जीवलग दोस्त पण दोघांनाही एक वाईट सवय होती. प्रत्येक गोष्टीत नकारात्मक विचार करायचे. गायीला कालवड झाली तर वासरू का नाही झालं म्हणून गळा काढणार. वासरू झालं तर अजून एक बैल काय करायचाय म्हणून टिपं गाळणार. भविष्य फारच अंधारमय आहे याच दिशेनं त्यांचे विचार जायचे. याबाबतीत दोघेही एकमेकांना पूरक होते.
यंदा उन्हाळा जरा लांबलाच. शेतकरी हवालदिल झाले. पण उशीरानं का होईना पावसानं कृपा केली. सुरेख संततधार लागली.
स्वाहा
आक्रोशानं अवघा आसमंत झाकोळलेला. एक्या बाजूस ती..थिजल्या नजरेने सारं पाहत असलेली.. किती आठवत होतं. असाच आकांत पूर्वीही झालेला. तिचा सहचर होता तो..त्याच्याबरोबर निश्चयपूर्वक पावलं टाकणारी ती.. मात्र तिचा निर्धार ढ्ळला, तो सासर्याच्या आर्त विनवणीनं ! दूषणं सोसतच तिनं मळलेली वाट सोडलेली. सुभेदार आणि बाईजींच्या भक्कम पाठिंब्यानं !
आज पुन्हा मळलेल्या वाटेने चालणारी एवढी पावलं. काही तर अवघ्या सात- आठ वर्षांच्या चिमुरड्यांची ! का? इंदूरच्या सुभेदारांघरची रीत म्हणून ? मग आता आपणच पुढे व्हायला हवं ! सुभेदारांसारखं ..
हा रहायचा जंगलात, म्हणजे मु. पो. जंगलं! ते अस्तित्वात असेल तर. नाही तर मग नामशेष न होता जी काही धडपड करत टिकाव लागेल तिकडे. तो रहायचा कुठेही! घरात, रस्त्यावर, वळचणीला जागा मिळेल तिकडे. ह्याचा देह मोठा आणि आहारही मोठा, तो अगदीच खिजगणतीतला. काय शिळंपाकं मिळेल ते खाऊन थंडी वार्यात कसाही जगणारा अगदी खैरकूट. राज्याकडे असला की कोण मान ह्याला. तो टोपी ते चोळी काहीही पळवून समस्तांस 'जेरी'स आणणारा. ह्याची चाल कायम नाकासमोर. तो.. हु केअर्स!