एखादं सुंदर चित्र पहावं, ते आवडावं, पण थोडं जवळ जाऊन, निरखून पाहताना अवचित त्यातलं वेगळंच काहीतरी सामोरं यावं आणि मग त्यामुळे त्या संपूर्ण चित्राचा अर्थच आपल्यापुरता बदलून जावा असं होतं आयुष्यात कधीकधी.
’ मोर’ या पुस्तकातले जवळजवळ सगळेच ललितलेख या सूत्रात बांधलेले आहेत असं मला वाटतं. अनिल अवचटांची ख्याती आहे ती विषयाच्या खोलात जाऊन, तो समजून घेऊन मग त्याबद्दल लिहिण्याची. पण या लेखनाचं स्वरूप तसं नाही. यात व्यक्तींच्या, नात्यांच्या, स्थळकाळांच्या, अवचित, निर्हेतुकपणे समोर आलेल्या बाजू आहेत.
अनिल अवचट यांचे मला आवडलेले पुस्तक - स्वतःविषयी
कधीकधी फारसं सजवलेलं नसलं तरी त्याच्या प्राकृतिक स्वरूपातही आवडतं असं आपलं एखाद्या शिल्पाबाबत होतं, नाही का? डॉक्टर अनिल अवचटांचं 'स्वतःविषयी' हे आत्मकथनपर पुस्तक वाचल्यावर मलाही असंच वाटलं.. नव्हे, हे पुस्तक All time favorite यादीत असल्याने, असं नेहमीच वाटतं.
'स्वतःविषयी 'वाचण्यापूर्वी अवचटांचं अमेरिका पुस्तक वाचलं होतं आणि आवडलं होतं. मग कुतूहल म्हणून हे पुस्तक वाचायला घेतलं. आधी ओतूर हे नाव भाजीवाल्याकडून ऐकलं होतं. छान मळे वगैरे आहेत इ.
चंचल आहे हो पोर. एकात धड मन रमेल तर शप्पथ. तशी हुशार आहे पण सगळी हुशारी अशी एकाच कामात लावेल तर ना चीज होईल. हे एक टोक आणि आमच्या ठकीला ना सगळ्यात इंटरेस्ट आहे. सगळ करुन पहायच असतं हे कौतुक भरलं दुसरं टोक यामधे आमचा पेंडूलम झुलत रहाण्यातच लहानपण गेलं. मोठं होताना यालाच Jack of All & Master of none म्हणतात हे समजलं पण या वाक्यात कौतुक भरलय कि उपहास हे आजतागायत कळलं नाहीये. कदाचित दोन्ही असावं असा अंदाज आहे. तर ते असो यावरुन हे कळलं असेलच कि आस्मादिकांना एकापेक्षा जास्त छंद आहेत.
खरंतर या छंदाची ओळख लोकल प्रवासातून झालेली . लोकलने प्रवास करत असताना अनेक विक्रेते १० रुपये मैं कलरिंग बुक्स म्हणून ओरडत विकायला येत , आजही येतात.त्यात टॉम जेरी सारख्या कार्टूनची , बॅटमन ,आर्यनमॅन सारख्या सुपर हिरोजची , फळा ,फुलांचा चित्रांचा समावेश असतो . ह्या रंगकामाच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश लहान मुलाना रंगकाम , चित्रकामची ओळख करून देणे इतका असतो . त्यामुळे त्यात कुठच्या चित्राला कुठला रंग द्यायचा हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं.
मंडळी दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना सेवा व जीवनावश्यक वस्तू विकत घेताना उत्पन्नाचा मोठा वाटा खर्च करावा लागतो.
मला सुचलेला साधा उपाय असा आहे.
समजा मुंबई शहर आहे तर संपुर्ण शहरातील लोकांनी आठवड्यातील एका दिवशी दुध विकत घ्यायचं नाही की दुधाचे पदार्थ देखिल विकत घ्यायचे नाही.
एखाद्या दिवशी पाच किलोमीटर चालावं लागले तरीही रिक्षा बस करायची नाही. लांब अंतरावर जाणाऱ्यांनी रेल्वे, बसचा वापर करावा.
अ? ...अननसाचा!
आ?... आईचा!
इ? .. इमारतीचा!
अर्रर्र...चुकलं चुकलं चुकलं.
अ माशाचा
आ सिंहाचा
आणि इ कोंबडीचा!
आँ ? आता हे काय नवीनच?
हीच तर मजा आहे अक्षरचित्रांची!
अक्षरचित्रं म्हणजे अक्षरांपासून बनलेली चित्रं. अ या अक्षरापासून मासा तयार करता येतो आणि 'आ'.पासून चक्क सिंह!

आहे की नाही गंमत?
आता खाली दिलेली चित्रंच पहा. मा, य, बो या प्रत्येक अक्षरापासून तयार केलेलं एकेक चित्र आहे त्यात.
मराठी साहित्यात डॉ. अनिल अवचट यांच्या लेखनाला एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी स्वत:ला विविध सामाजिक कार्यांमध्ये झोकून दिलं आणि हे कार्य करत असताना आलेले अनुभव ते सातत्याने शब्दबद्ध करत राहिले. प्रांजळपणा, तळमळ, सतत नवनवीन लेखनविषयांचा शोध घेण्याचा आणि त्या विषयांच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा उत्साह, क्लिष्ट विषयावर लिहितानाही त्यात आणलेली रोचकता अशी त्यांच्या लेखनाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या नावांच्या यादीकडे नजर टाकली तरी त्यातलं वैविध्य डोळ्यात भरेल.
रोजच्या कामांच्या रहाटगाडग्यातून थोडासा विरंगुळा मिळवून देतो, तो छंद. ज्यातून मिळणार्या निखळ आनंदासमोर त्यासाठी घेतलेले कष्ट क्षुल्लक वाटतात, तो छंद! असा छंद जोपासताना आपला वेळ तर आनंदात जातोच, शिवाय आपल्या ज्ञानात, कौशल्यात भर पडत जाते. आपल्यासारख्याच इतर छांदिष्टांशी ओळखी होतात, मैत्र जुळतं, एकूणच या सगळ्यातून आपलं व्यक्तिमत्त्व समृद्ध होत जातं.
आपल्यापैकी खूप जणांना असा एखादा तरी छंद नक्कीच असतो. कुणी सुट्टी मिळताच डोंगर-किल्ले चढायला जातात, तर कुणी तासन्तास नेटाने बसून विणकाम, भरतकाम करतात. कुणाला नाणी जमवायला आवडतं, तर कुणाला परसबाग फुलवायला!
स्वच्छ भारत अभियान
ओला कचरा सुका कचरा
सर्वांना समजावु या
तनामनाने राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
प्लॅस्टिक थर्माकोलचा
वापर आपण थांबवू या
घराघरात राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
स्वच्छतेचे महत्त्व किती
सर्वांना शिकवू या
शाळेशाळेत राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
डेंग्यु मलेरिया रोगराई
पळवून लावू या
गावागावात राबवू या
स्वच्छ भारत अभियान !
कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली ९ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.