वृत्तबद्ध

सांजवेळ ..... (सुमन्दारमाला)

Submitted by स्वामीजी on 5 August, 2014 - 05:45

दिवा लावताना जरी सांजवेळी उजेडास आमन्त्रणे धाडली
मनाने करावे भयाचे इशारे, स्वत:चीच नाचे तिथे सावली ।
भले हात जोडून देवासमोरी मुखे प्रार्थना ती दिव्याची असे
मनी फक्त काहूर दाटून येते, कुशंका इडेची पिडेची वसे ॥१॥

निशा दाटुनी येत चोहीकडूनी, नभी चांदण्यांचा सडा घातला
अजूनी नसे चन्द्र आला समोरी, तमाचा पसारा मनी दाटला ।
किडे किर्किरोनी टिपेच्या स्वराने हवेतील अस्वस्थता वाढते
तुटूनी कशी अंगणातील झाडावरूनी सुकी काटकी वाजते ॥२॥

घरातील कोणी अजूनी न आले म्हणूनी प्रतीक्षा सुरू होतसे
उशीराच येणे जरी नित्यचे हे, मना चिंतण्याला पुरेसे असे ।

ऐक जरा ना.. (वृत्त चम्पकमाला)

Submitted by स्वामीजी on 4 August, 2014 - 02:17

सांजसकाळी कातरवेळी
गूज मनाचे ऐक जरा ना..

झांजर वारा कातळमाळी
भोकर बोरे काजळजाळी,
चाखुन घेता माधुर ओठी
बोलत जाऊ लाघव गोठी..

पाउलवाटा आड मळ्याची
धून सजावी गोड गळ्याची,
मावळतीला सूर्य बुडावा
लाजत हाती हात धरावा..


भेट घडाया मुक्त मनाची
चाहुल ना हो दूर कुणाची,
तू बरसावे बावर गाणे
स्वप्न मनीचे गोजिरवाणे..

आवरताना सावरलेले
पाझर डोळे बावरलेले,
प्रीत उरीची व्याकुळ व्हावी

भाव मनी हे, भेट घडावी..

(वृत्त चम्पकमाला - गालल गागा गालल गागा)

- स्वामीजी
(काही ठिकाणी या वृत्ताचे नाव "रुक्मवती" असे सुद्धा दिलेले आहे)

संपादन...

कुठे मनास गुंतवू....? ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ(पञ्चचामर)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:42

"कुठे मनास गुंतवू?" विचित्र प्रश्न काय हा ?
चहू दिशातुनी कुणी मनास बोलवी पहा ।
असेल पर्वणी इथे क्षणोक्षणी लहानशी
अशा सुखा जपूनिया शिदोर ठेव छानशी ॥१॥

निसर्ग रंग माखतो सदैव जीवनास रे
तयास पांघरून घे, कधी नको म्हणू पुरे ।
लहान रोपट्यावरी नव्हाळ एक पान ते
दंवात चिंबते पहा जिथे उद्या पहाटते ॥२॥

लहानग्या मुलास जोजवी कुशीत माउली
तिच्या मुखावरी पहाल तृप्तता उजाडली ।
जरी कितीक वंचना विवंचना जगात या
कृतार्थता जिण्यातली सुखात झाकते तया ॥३॥

जबाबदार जाणिवा पुनश्च मार्ग रोखती
धरून धैर्य पावले पुढील मार्ग शोधती ।
थकूनिया घरी चहा पिता मनी निवान्त तो

निसर्गनाते ㅤㅤㅤㅤㅤㅤ(पादाकुलक)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:31

नव्हाळ हिरव्या पानावरती
दंवबिन्दूंचे हिरकणगोंदण,
अस्फुट उमलत कळ्या सुगन्धी
पहाटवाऱ्याकडून आंदण..

कविमन बघते रोज अनावर
प्रमुदित होउन निसर्गवाटा,
मन्थन होउन उसळत येती
शब्दसागरा भरती लाटा..

सहजी प्रगटे निसर्गनाते
यात नसे हो प्रयत्न कसला,
आवर्जुनिया बांधिलकीच्या
आवेशाचा विचार कुठला..

अंधाराचा विरून पडदा
उजेड कानी कुजबुज करतो,
विसावलेल्या गात्रांमधला
उरला आळस दूर ढकलतो..

गोड शिरशिरी अंगावरती
हवेत भूपाळी पाझरते,
उरलासुरला आळस झटकत
नव्या दिसाचे स्वागत करते..

भले रोजचा असतो अनुभव
नवीन म्हणुनी काही नसते,
चिरंतनाच्या नवेपणाचे
नित्य नवेसे रूप झळकते..

घुसमट

Submitted by रसप on 8 October, 2013 - 00:41

तळमळणार्‍या, घुसमटलेल्या अनेक रात्री उश्यास घेउन
आठवणींची चादर ओढुन
कधी कधी मी विचार करतो
काय नेमके तुटले आहे?
काय हरवले, काय खोलवर रुतले आहे ?

तू नसताना विचार येती पूर्णत्वाला
उत्तर कळते
स्वच्छ मोकळ्या नभासारखे क्षणभर वाटे

आणि स्वतःशी बोलू बघता -
शब्द फिरवती पाठ असे की,
त्यांच्या लेखी माझी किंमत नसेच काही !

पुन्हा एकदा सखे, परत ये
आणि व्यक्त हो,
शब्दबद्ध हो
माझे उत्तर मला मिळू दे
तोड अबोला, मिटव दुरावा
सोड तुझा हा रुसवा, कविते..

सोड तुझा हा रुसवा, कविते..!!

....रसप....
७ ऑक्टोबर २०१३

किंवा

तळमळणार्‍या,
घुसमटलेल्या
अनेक रात्री
उश्यास घेउन
आठवणींची

अबोली

Submitted by रसप on 22 May, 2013 - 03:23

अबोलीच्या फुलांचे
तुझ्या-माझ्या मनांचे
घरांच्या अंगणांचे
कुणी ऐकायचे ?

छतांच्या झुंबरांशी
कड्यांच्या बंधनांशी
जवळच्या अंतरांशी
किती भांडायचे ?

स्मृतींच्या पाउलांना
पसरत्या सावल्यांना
तरल कातर छटांना
कसे वाचायचे ?

तुझे येणे न होते
तुझे जाणे न होते
तुझे असणे न होते
कधी सांगायचे?

इथे सारा पसारा
अनावर कोंडमारा
छुप्या पाऊसधारा
कसे टाळायचे ?

तरीही हाक द्यावी
उरी आशा रुजावी
नजर ओली थिजावी
कुणी समजायचे ?

विचारा..

Submitted by रसप on 19 May, 2013 - 04:45

तुझी साथ वाटे मला शाश्वताची तुझ्यावर मला हक्कही वाटतो
तसे ह्या जगाशी जुळवले कितीही तरी रोज हटकून मी भांडतो

क्वचित एकदा तू असा मूर्त होऊन येतोस, होतोस अक्षरफुले
तुझा हाच दुर्दम्य विश्वास माझ्यात आशा उद्याची बनुन किलबिले

छुप्या पावलांनी कधी भ्याड हल्ले, कधी वार होतील पाठीवरी
लढू सोबतीने जगाशी, तुझ्या सत्यतेची असे ही लढाई खरी

विचारा, तुझ्यावर अजुन ठाम मी तू नको धीर सोडूस इतक्यात रे
प्रवासास आरंभ केला कधीचा नको थांबणे व्यर्थ अर्ध्यात रे

तुझी आठवण येते....

Submitted by रसप on 12 April, 2012 - 03:17

"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ९०" मधील माझा सहभाग -

भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने
दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे
हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते
धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते

मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती
सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती
गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते
नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते

ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले
भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे
डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते
लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते

चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला

गुलमोहर: 

राजहंस मी!

Submitted by रसप on 3 September, 2011 - 06:00

राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही
डौलदारशी चाल मंदशी पळण्याचाही सराव नाही

कधी ओढली चर्या नाही उदासवाणे गीत गाउनी
कधीच फडफड पंखांची ना कधी न केला दंगाही मी
शांत विहरतो, कधीच केला क्रुद्ध होउनी उठाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही

ध्यान लावुनी डाव साधणे येथ चालली कुटील नीती
मला न मंजुर डाव रडीचा तुम्हीच पाळा तुमच्या रीती
स्थितप्रज्ञतेचा हा खोटा दर्शनरूपी बनाव नाही
................................. राजहंस मी उंच भरारी घेणे माझा स्वभाव नाही

किल्मिष नाही मनात काही कळकट माझी वसने नसती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - वृत्तबद्ध