हेमाच्या तोंडून रामच नाव निघताच जया उठू लागली. हेमाने तिला हाताला घट्ट धरून बसवलं .
“जरा थांबा , थोडा शांतपणे विचार करा , सर्व गोष्टी घडण्यामागे, प्रत्येक माणसाच्या कृतीमागे काहीतरी कारण असत , कोणी कोणला उगीच नाही त्रास देणार आणि ते देखील राम सारखी व्यक्ती तर अजिबातच नाही , तुम्ही स्वतःहून रामच्या अश्या वेगळ्या वागण्याचा विचार केलात का कधी ,कि एक गोष्ट समजली आणि तुम्ही त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ केल,कधी स्वत: हून त्याची भेट घेतली, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केलात , रागाच्या भरात फक्त स्वत”वर सूड उगवत राहिलात तुम्ही जयाताई ”
हेमा ने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला , आणखीन काही दिवस जाऊदे , आम्ही सर्व जाऊन रामशी बोलतो,
सुशीला बाईचा शब्द राम ने मोडला नसता , पण जयाला ते तस करण नको होत , तिने ह्या वेळचा सर्व निर्णय राम वर सोपवला होता , तिने ठरवलं तस झाल तर ठीक नाहीतर , अन्यथा जे काही होईल ते रामच्या मनाविरुद्ध असेल , आपल्या घरच्यांसाठी केलेलं असेल , आणि त्याला काहीही अर्थ नसणार होता ,
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले
आणि
स्वतःशी हसत घरात परतला.
भुताट्कीच्या घरात रात्रभर राहतो म्हणून काल संध्याकाळी तिथे रहायला आलेला अंधश्रद्धा हटाव समितीचा तरूण कार्यकर्ता त्याला आठवला.
माझ्या घरातून त्या घरातल्या पलंगाखालच्या लादीत उघडणारे भुयार खोदले असेल हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते.
रात्री बाराच्या ठोक्याला आपण पलंगाखालून पहारीने ठोकत हसायला लागलो तेव्हा दमच तोडला घाबरटाने.
वाईट तर झालंच बिचार्याचं पण रघू मान्त्रिकाशी पंगा घ्यावाच का म्हणतो मी?
जाऊंदे..झालंं ते झालं.
बरीच कामं पडलीयेत
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले. आणि...
बंद दरवाजा उघडून एक म्हातारा बाहेर आला.
“अरे नारायणा, केव्हा आलास? भाऊकाका आणि काकू किती आठवण काढत होते. गेले बिचारे. आज यायला सवड झाली काय?”
“मी रघू. आपली ओळख?” लोक मला नारायण का म्हणताहेत? मी रघु आहे.
“मला नाही ओळखलस? मी झिलू काका. चाकरमानी झालास आणि ओळख विसरलास?”
“झिलू काका? बंद घरात तुम्ही कसे रहाता?”
“माझे घर बंद नाहीये. नारायणा, तुझे घर बंद आहे.”
पुन्हा नारायण? हे घर माझे थोडच आहे. माझे घर तिकडे मुंबईला आहे.
नर्सबाईने नारायणला हलवून जागे केले.
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....
स्वतःशीच मान हलवली. बिलालला निरोप द्यायला हवा आता.
RDX. इथून काढण्यासाठी खास माणसं घेऊन रसूल एक -
तर, स्वयंपाक करायला खूप आवडतो मला. पण समहौ भांड्या कुंड्यांचा काही शौक नाही. पण तरीही भांड्याकुंड्यांवरच लिहिणार आहे आज. अन तेही खूप भांडी, खूप मोठी भांडी यांवर!
नाही नाही, मी घेतली नाहीत भांडी; मी फक्त फोटो घेतले भांड्यांचे!
मधेच एक पिटुकली ट्रिप केली अहमदाबादला. नेहमी प्रमाणे आधी थोडी शोधाशोध केली, हटके, ऑफबिट काय आहे तिथे? तर त्यात या भांड्याकुंड्यांचा शोध लागला. अर्थात तरीही प्रत्यक्ष बघे पर्यंत अंदाजच आला नव्हता.
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय ......
" तुझ्या अंगावर हा मोठ्ठा डाग कसला " पैठणीची शंका.
" छकुली मुलुखाची धांदरफळी. भाजी सांडलीन्. म्हणून तर इथे यावं लागलं ना. आता धुलाई नक्कीच होणार.पण तू इथे कशी "नारायणपेठी उत्सुकता.
"सुरकुत्या जाऊन तरूण व्हायला. हीःहीः. ते बोटॉक्स का काय म्हणतात ना तसं काहीसं." पैठणी.
"काही का असेना, आपण कपाटातून बाहेर तर आलो या निमित्ताने.
अंगणात येऊन रघूने सवयीने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे पाहिले आणि तिथे चूळ फेकायला उघडलेला त्याचा जबडा तसाच राहिला.
दाराला कुलूप नव्हते. चुळा, पिचकार्यांनी भरलेले अंगण कोणीतरी स्वच्छ धुवून काढले होते. तुळशीला पाणी दिले होते. याच वृंदावनावर डोके आपटून राधाक्कांनी....
दार करकरले आणि सानी बाहेर आली. कुंकू, मंगळसूत्र ल्यालेली. रघूला पाहून क्षणभर चरकली. मग तिने खालचा ओठ गच्च दाताखाली दाबला, पदर कमरेला खोचला, आणि सणसणीत आवाज दिला,
'राघोबानाना, पुन्हा या अंगणात घाण केलीत तर तोंड फोडीन'
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
.........
"हे हरीण अगदी तुझा पाठपुरावाच करतंय गं ताई. " मैत्रेयीचा कौतुकभरला स्वर.
" अगं त्याच्या आईचं नि माझं फार गूज असे. काय करणार! स्वामींकडून मिळणाऱ्या आत्मज्ञानाच्या ओढीने तू आश्रमात केवळ देहाने उपस्थित आणि स्वामी तर नेहमीच ज्ञानयज्ञात गुंतलेले.शिष्यांनी वेढलेले.. . मला बापडीला तुम्हा दोघांशी जे बोलावंसं वाटे ते हरिणीजवळ सांगायची मी.. "
बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......
"इतक्यात तिसरीही आली?!" ती चकित होऊन उद्वेगाने म्हणाली.
"माझी जुळी बहीण आहे ती." दुसरी खिन्नतेने म्हणाली.
"म्हणजे दोघींबद्दलही कळतं का त्यांना?" पहिलीने इवलुसा प्रश्न विचारला.
"हो! आता सगळंच कळतं आधीच ताई!" तिसरी शांतपणे म्हणाली.
"काय तरी बाई एकेक नवीन! आमच्या वेळी असलं काही नव्हतं!" पहिली उद्गारली.
"पण मग तुला कसं इकडे आणलं?"
"माझ्या नशिबात दूध होतं गं बाई!"