काव्यलेखन

''बाबा''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 February, 2013 - 01:57

तुझ्याविना मी एकाकी मज मिठीत घे ना बाबा
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा II धृ II

आठ जणांचे कुटुंब होते,संकट थोडे नव्हते
सौख्याने पण तुडुंब होते,कसले कोडे नव्हते
दु:खाग्नीला शमवायाचे धाडस दे ना बाबा II 1 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

गुरुजी होते गावासाठी,पण सा-यांचा बाबा
ताई,माई,तरुण आणिक म्हाता-यांचा बाबा
कुणास बाबा बोलायाला जीभ धजेना बाबा II 2 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

तुझ्याविना ही धुरा घराची,कशी वहावी बाबा
अगतिक झालेल्या आईला,कशी पहावी बाबा
वठवू कैसी तुझी भूमिका, काहि कळे ना बाबा II 3 II
शिवी द्यायला,रागवायला,परतून ये ना बाबा

घरपण

Submitted by अज्ञात on 10 February, 2013 - 00:30

घर चार कुडाच्या भिंती
घरपण अमृत रसना नाती
आकाश निळे झरणार्‍या चांदण राती
ओंजळी भरूनी स्वातीचे मोती

स्वप्ने जरतरी नयनी आतुर भरती
हृदयी गाभारा तृप्त तेवत्या ज्योती
आवेग कळांचे लाटेवर देहाच्या
रुधिरातिल माया ममता लय ओघवती

शरिरापलिकडले गोत सवे सांगाती
दुष्काळी निर्मळ सोबत नित अनुप्रीती
घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती
घरपण पण असते रेष रसिक रसरसती

....................अज्ञात

हे कोणत्या दिशांनी वाहतात वारे?

Submitted by सतीश देवपूरकर on 9 February, 2013 - 10:52

गझल
हे कोणत्या दिशांनी वाहतात वारे?
हृदयात आज धुमसू लागले निखारे!

स्वप्नात काल तुझिया यायला न जमले;
होती फुले तिथेही द्यायला पहारे!

आपापसात चर्चा जाहली फुलांची;
कळले मला न त्यांचे बेरकी इशारे!

कानात काय वारे गुणगुणून गेले?
उठले तनूवरी ह्या लाघवी शहारे!

कोणी इथे समुद्री घेतली समाधी?
का आजकाल दचकू लागले किनारे?

चुपचाप आपला मी बेचिराख झालो!
आकाश का विजांनी सारखे थरारे?

माझी तुझी उमलली प्रीत पौर्णिमेला!
उरले नभात आता मोजकेच तारे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.

'देहबंध'

Submitted by अमेय२८०८०७ on 9 February, 2013 - 10:22

शब्दाविण हुंदका येतो
अर्थाविण गळती आसू
जणू जन्मभयाने यावे
मरणाच्या तिथीस हासू

स्पर्शाची किमयागारी
वाऱ्याच्या प्रणयसुराने
बेभान कळी फुलताना
जगण्याचे स्फुरते गाणे

ती वाट स्वतःशी वळली
ज्या दिशेस सजणी गेली
विरहाच्या हरितखुणांनी
मार्गातिल सजल्या वेली

पाऊले सांजरंगांची
मेंदीसम पडली काळी
की दुःख पहाटेचे हे
उजळून दवाला जाळी?

डोहात स्निग्ध भिजताना
गंगेचे आठव स्मरती
अन धूळ देह्बंधांची
गर्तेतून उठते वरती

'झंकार'

Submitted by अमेय२८०८०७ on 9 February, 2013 - 09:46

त्या रेशमी क्षणांचा अभिसार मागतो मी
प्रीतीत गुंतलेला सहचार मागतो मी

उजळून रात गेली भाळावरी परंतु
डोळ्यात जागृतीचा मंदार मागतो मी

रामायणी चुकीचा वनवास भोगताना
सीतासमर्पणाचा अधिकार मागतो मी

निष्प्राण भावनांना मातीत सोबतीला
निर्माल्य पाकळ्यांचा आधार मागतो मी

आता तसे उन्हाने निवले विझून डोळे
का सावळ्या दिशांचा अंधार मागतो मी

शब्दांत सार्थतेचे जगले जरी दिलासे
मौनात मुग्धतेचा झंकार मागतो मी

गुंता

Submitted by मिरिंडा on 9 February, 2013 - 09:36

गुंत्यास पिंजले मी
जटांस पिंजलें मी
जटांस कवळिले मी
जगण्याचे सार म्हणुनी

उबदार वाटल्या त्या
थंडीत भावनांच्या
थंड गार वाटल्या त्या
ऊष्म्यात जीवनाच्या

गुंत्यात कवळू पाहिले
मी विश्वरूप सारे
आतले बाहेरचे ते
सारेच गुंते गुंतलेले

अडकलेल्या माणसांच्या
किंकाळ्या ऐकल्या मी
सुटकाही नको त्यांना
असेही ऐकले मी

आनंद मोकळेपणाचा
साराच विसरलो मी
देउनी सत्यास माती
गुंत्यास पांघरले मी

आमची 'ती'.....माझी 'हि'.....आणि 'मी'......!!

Submitted by विनायक उजळंबे on 9 February, 2013 - 05:22

'ती'

घाबरून ससा झालेली ..
काही क्षणापूर्वी मोर होती ..
"कसले कपडे घातलेस..?
सारे संस्कार कुठे विकलेस?
वाटलं असेल?,बाप काही बोलत नाही ..
म्हणजे असं नाही कि त्याला काही दिसत नाही..!!"

'हि'

तितकीच थंड..
तिला कुशीत घेऊन गेली..
अन थोड्या वेळाने 'ती'
कबुतर होऊन फुर्र होऊन गेली..

'मी'
जाम भडकलेला..
आधी तिच्यावर अन आता हिच्यावर..
"तुला कळतंय का काही..?
मला काही किंमत आहे कि नाही..?
का सोडलं तिला तसं?"

हि:
"बाप म्हणून विचारतोयस कि पुरुष म्हणून ..?"

मी एकदम गार..
अन म्हणालो , "घरात बाप असलो तरी ..
बाहेरच्या पुरुषांच्या नजरा कळतात.."

हि:
"मला नाही कळत..?"

कविता म्हणजे..

Submitted by रसप on 9 February, 2013 - 05:12

कविता चूक किंवा बरोबर असत नाही
कविता म्हणजे कुठलं गणित नाही
कविता कुणा दुसऱ्यासाठी जन्मत नाही
कवितेशिवाय स्वत: कवीलाच करमत नाही
कविता नेहमीच एकमार्गी चालत नाही
कवितेला वळण घेतलेलंही कधी कळत नाही

कविता म्हणजे झुळझुळ पाझर
कविता म्हणजे अथांग सागर
कविता म्हणजे कोमल अंकुर
कविता म्हणजे वृक्ष मनोहर
कविता म्हणजे संध्या रंगित
कविता म्हणजे पहाट पुलकित

कविता म्हणजे रिमझिम रिमझिम वळिवाची सर
कविता म्हणजे कुंद धुके अन चंचल दहिवर

कधी कुणाची जुनी वेदना उमलुन आली कविता बनुनी
कधी कुणाच्या आक्रोशाने हाळ घातली कविता बनुनी

आकाशाची मान झुकू दे, असे लिही तू

आजकाल...

Submitted by बागेश्री on 9 February, 2013 - 04:13

तुझ्यापर्यंत पोहोचत
नाहीच मी, आजकाल

एकतर्फी प्रवास हा
टाळते आहे, आजकाल

इच्छांना आशेची
आस नाही, आजकाल

स्वप्नांना बंधमुक्त
करते आहे, आजकाल

मोकळे रस्ते, वाटा मोकळ्या
खुणावतात, आजकाल

निरोपानंतरची हूरहूर
गोठली आहे, आजकाल

तुझ्यातली अलिप्तता
पांघरून आहे, आजकाल

रिक्त मनाचं, स्थिरावणंही
भावतं आहे, आजकाल....!!

मी...

Submitted by सुयशतात्या on 9 February, 2013 - 04:11

नियतिने केलेला आयुश्यावर घाव सोसला मी
त्याच घावाच्या साथीत अश्रुन्चा माग शोधला मी

एका परिचे स्वप्न आयुश्याच्या सुखद वलणावर पाहिले मी
त्याच स्वप्नाचा विरत जानारा दुखद अनुभव घेतला मी

सर्व दुख्हे "प्याल्यात" बुडवलि मी
व्यसनाच्या अन्धकारात स्वतहाला लोटले मी

मनाच्या तगमगीत आयुश्याचा अन्त पाहिला मी
त्याच अन्ताची निरन्तर अपेक्शा करनार मी...

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन