काव्यलेखन

'देहबंध'

Submitted by अमेय२८०८०७ on 9 February, 2013 - 10:22

शब्दाविण हुंदका येतो
अर्थाविण गळती आसू
जणू जन्मभयाने यावे
मरणाच्या तिथीस हासू

स्पर्शाची किमयागारी
वाऱ्याच्या प्रणयसुराने
बेभान कळी फुलताना
जगण्याचे स्फुरते गाणे

ती वाट स्वतःशी वळली
ज्या दिशेस सजणी गेली
विरहाच्या हरितखुणांनी
मार्गातिल सजल्या वेली

पाऊले सांजरंगांची
मेंदीसम पडली काळी
की दुःख पहाटेचे हे
उजळून दवाला जाळी?

डोहात स्निग्ध भिजताना
गंगेचे आठव स्मरती
अन धूळ देह्बंधांची
गर्तेतून उठते वरती

'झंकार'

Submitted by अमेय२८०८०७ on 9 February, 2013 - 09:46

त्या रेशमी क्षणांचा अभिसार मागतो मी
प्रीतीत गुंतलेला सहचार मागतो मी

उजळून रात गेली भाळावरी परंतु
डोळ्यात जागृतीचा मंदार मागतो मी

रामायणी चुकीचा वनवास भोगताना
सीतासमर्पणाचा अधिकार मागतो मी

निष्प्राण भावनांना मातीत सोबतीला
निर्माल्य पाकळ्यांचा आधार मागतो मी

आता तसे उन्हाने निवले विझून डोळे
का सावळ्या दिशांचा अंधार मागतो मी

शब्दांत सार्थतेचे जगले जरी दिलासे
मौनात मुग्धतेचा झंकार मागतो मी

गुंता

Submitted by मिरिंडा on 9 February, 2013 - 09:36

गुंत्यास पिंजले मी
जटांस पिंजलें मी
जटांस कवळिले मी
जगण्याचे सार म्हणुनी

उबदार वाटल्या त्या
थंडीत भावनांच्या
थंड गार वाटल्या त्या
ऊष्म्यात जीवनाच्या

गुंत्यात कवळू पाहिले
मी विश्वरूप सारे
आतले बाहेरचे ते
सारेच गुंते गुंतलेले

अडकलेल्या माणसांच्या
किंकाळ्या ऐकल्या मी
सुटकाही नको त्यांना
असेही ऐकले मी

आनंद मोकळेपणाचा
साराच विसरलो मी
देउनी सत्यास माती
गुंत्यास पांघरले मी

आमची 'ती'.....माझी 'हि'.....आणि 'मी'......!!

Submitted by विनायक उजळंबे on 9 February, 2013 - 05:22

'ती'

घाबरून ससा झालेली ..
काही क्षणापूर्वी मोर होती ..
"कसले कपडे घातलेस..?
सारे संस्कार कुठे विकलेस?
वाटलं असेल?,बाप काही बोलत नाही ..
म्हणजे असं नाही कि त्याला काही दिसत नाही..!!"

'हि'

तितकीच थंड..
तिला कुशीत घेऊन गेली..
अन थोड्या वेळाने 'ती'
कबुतर होऊन फुर्र होऊन गेली..

'मी'
जाम भडकलेला..
आधी तिच्यावर अन आता हिच्यावर..
"तुला कळतंय का काही..?
मला काही किंमत आहे कि नाही..?
का सोडलं तिला तसं?"

हि:
"बाप म्हणून विचारतोयस कि पुरुष म्हणून ..?"

मी एकदम गार..
अन म्हणालो , "घरात बाप असलो तरी ..
बाहेरच्या पुरुषांच्या नजरा कळतात.."

हि:
"मला नाही कळत..?"

कविता म्हणजे..

Submitted by रसप on 9 February, 2013 - 05:12

कविता चूक किंवा बरोबर असत नाही
कविता म्हणजे कुठलं गणित नाही
कविता कुणा दुसऱ्यासाठी जन्मत नाही
कवितेशिवाय स्वत: कवीलाच करमत नाही
कविता नेहमीच एकमार्गी चालत नाही
कवितेला वळण घेतलेलंही कधी कळत नाही

कविता म्हणजे झुळझुळ पाझर
कविता म्हणजे अथांग सागर
कविता म्हणजे कोमल अंकुर
कविता म्हणजे वृक्ष मनोहर
कविता म्हणजे संध्या रंगित
कविता म्हणजे पहाट पुलकित

कविता म्हणजे रिमझिम रिमझिम वळिवाची सर
कविता म्हणजे कुंद धुके अन चंचल दहिवर

कधी कुणाची जुनी वेदना उमलुन आली कविता बनुनी
कधी कुणाच्या आक्रोशाने हाळ घातली कविता बनुनी

आकाशाची मान झुकू दे, असे लिही तू

आजकाल...

Submitted by बागेश्री on 9 February, 2013 - 04:13

तुझ्यापर्यंत पोहोचत
नाहीच मी, आजकाल

एकतर्फी प्रवास हा
टाळते आहे, आजकाल

इच्छांना आशेची
आस नाही, आजकाल

स्वप्नांना बंधमुक्त
करते आहे, आजकाल

मोकळे रस्ते, वाटा मोकळ्या
खुणावतात, आजकाल

निरोपानंतरची हूरहूर
गोठली आहे, आजकाल

तुझ्यातली अलिप्तता
पांघरून आहे, आजकाल

रिक्त मनाचं, स्थिरावणंही
भावतं आहे, आजकाल....!!

मी...

Submitted by सुयशतात्या on 9 February, 2013 - 04:11

नियतिने केलेला आयुश्यावर घाव सोसला मी
त्याच घावाच्या साथीत अश्रुन्चा माग शोधला मी

एका परिचे स्वप्न आयुश्याच्या सुखद वलणावर पाहिले मी
त्याच स्वप्नाचा विरत जानारा दुखद अनुभव घेतला मी

सर्व दुख्हे "प्याल्यात" बुडवलि मी
व्यसनाच्या अन्धकारात स्वतहाला लोटले मी

मनाच्या तगमगीत आयुश्याचा अन्त पाहिला मी
त्याच अन्ताची निरन्तर अपेक्शा करनार मी...

मी...

Submitted by सुयशतात्या on 9 February, 2013 - 04:11

नियतिने केलेला आयुश्यावर घाव सोसला मी
त्याच घावाच्या साथीत अश्रुन्चा माग शोधला मी

एका परिचे स्वप्न आयुश्याच्या सुखद वलणावर पाहिले मी
त्याच स्वप्नाचा विरत जानारा दुखद अनुभव घेतला मी

सर्व दुख्हे "प्याल्यात" बुडवलि मी
व्यसनाच्या अन्धकारात स्वतहाला लोटले मी

मनाच्या तगमगीत आयुश्याचा अन्त पाहिला मी
त्याच अन्ताची निरन्तर अपेक्शा करनार मी...

येतील ते दिवस फुलतील पुन्हा आठवणी

Submitted by विनायक. दि.पत्की. on 9 February, 2013 - 03:24

एक मुंगी रस्त्याने चालली होती,
आपल्याच नादात गात हि होती.
चहुकडे पहात होती,
आनंदाने डोलत होती.
अचानक सुटला सोसाट्याचा वारा,
पावसाच्या हि सुरु झाल्या धारा.
सोबत पडू हि लागल्या गारा,
बिचारीला मिळेना कुठे हि थारा.
पाण्याचा वाहत आला मोठा लोंढा,
त्यामध्ये होता बराच कोंडा.
कोंड्याच्या आसराने गिळला आवंढा,
शीण झाला हलका जेव्हा लागला धोंडा.
धोंड्याला होती मोठी खोबणी,
त्यात देवतेची मूर्ती देखणी.
प्रसादाची सुद्धा तेथे आखणी,
वारयाने उडवली होती सर्व झाकणी.
मुंगीला मात्र तेथे हायसे वाटले,
डोळ्यातील सर्व पाणी हि आटले.
मग तिने बस्तान तिथेच थाटले,
जीवा शिवाचे अधिष्टान मनोमनी पटले.

ज्ञान | यशाचे उगमस्थान ||

Submitted by विनायक. दि.पत्की. on 9 February, 2013 - 03:21

ज्ञान असते पाण्याहून पातळ,
नसे याहून अन्य कोणी नितळ.
प्रसंगी येवो कसलीही वावटळ,
बोथट होणे ज्ञानापुढे मात्र अटळ.||१||
धीर गंभीरता हि साधते ज्ञानाने,
निरव शांतता हि अनुभवावी मनाने.
हेच जमवावे कणाकणाने,
चराचरात असलेले घ्यावे अनुभवाने.||२||
यश असाध्य नसते,
शान सुद्धा जोडीला असते.
चेतन्य शरीरी वसते,
उरी समाधान हि ठसते.||३||
गरम दुध फुंकून पिणे,
मनाने आवडीची साखर घालणे.
स्थान परत्वे स्वताला बदलणे,
नव्या,नित्य,यशाची हीच आहेत साधने.||४||
(प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर वाचावे )

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन