maayboli gulmohar

हास्य लहरी - क्लीन चिट - चैतन्य रासकर

Submitted by चैतन्य रासकर on 8 September, 2019 - 08:30

"आय चिटेड ऑन निखिल" केतकी म्हणाली.
"व्हॉट?"
"आर यू मॅड??"
"सॉरी..."
"सॉरी काय? अगं तुझ्या लग्नाला दोनच आठवडे राहिलेत" मेघा केतकीवर ओरडली.
हे ऐकून नंदन सटकन शिंकला!! शिंकेचे कण असे भोवताली विसावले, वातावरण शिंकामय झालं.
"शी.. का?" मेघा नंदनवर ओरडली.
"सॉरी... काही शॉकिंग ऐकलं की मला शिंका येतात" नंदन नाक पुसत म्हणाला.
"तुझ्या शिंकासुद्धा शॉकिंग आहेत" मेघा नंदनला रुमाल देत म्हणाली.
हे सगळं बघत, केतकी डिश मधल्या सॉसमध्ये बोट घालून, विचार करू लागली.

तडजोड (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 3 July, 2017 - 06:22

"तुला भात रोज पाहिजेच असतो का? एक दिवस नसेल..."

"हो.. माझं त्याशिवाय जेवण होत नाही...."

"मग स्वतः कुकर लाव, करून घे" मी कुकर किचनच्या ओट्यावर आपटत म्हणाले, त्या आवाजाने नितीन दचकला, मी एवढी चिडेल असे त्याला वाटले नव्हते, तो माझ्याकडे बघत होता, त्याच्या डोळ्यात भीती होती, मी उजव्या हाताने कुकरचा दांडा घट्ट पकडला होता, माझे हात रागाने थरथरत होते, श्वास फुलला होता, घामाची धार केसातून, कपाळापर्यंत आली होती.

नितीन माझ्याकडे बघत एक पाऊल मागे सरकला, तसा मी कुकरवरचा हात सैल केला, मी पुढे झुकली गेले, या रागामुळे माझे अवसान गळाले होते, मी ओट्याचा आधार घेतला.

विषय: 

मनसोक्त (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 7 March, 2017 - 15:40

"घरी पोहचल्यावर मेसेज कर" रेवती ताई मला म्हणाली.

मी हसून होकारार्थी मान डोलावली.

मुलांना कधी असा मेसेज करावा लागतो? का आम्ही मुलीच फक्त घरी पोहचल्यावर एकमेकींना मेसेज करतो? शेवटी आम्हा मुलींनाच एकमेकींची काळजी......

"आणि हो उद्या लवकर ये" रेवती परत म्हणाली.
मी कसे सांगू? मला उद्या इथे नाही यायचे, मला या कामाचा कंटाळा आलाय, मला काहीतरी वेगळ करायचय, हे रेवती ताईला काही सांगता आले नाही.

अव्यक्त (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 6 February, 2017 - 09:40

"पाच जुनला लग्न आहे.."

केतनचा मेसेज होता, मी तेवढेच वाचू शकले, पुढचा मजकूर मला वाचायचा नव्हता.

मेसेज जरी बऱ्याच दिवसांनी आला असला तरी केतनची आठवण रोज येत असे, आठवण नाही, त्याची सवय लागली होती, माझ्यासारख्या सत्तावीस वर्षाच्या मुलीची, केतन एक चांगली, वाईट कशी का असेना, एक सवय होता, तुमचं नात संपत पण सवय नाही ना संपत!

रोजची एक सवय, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना आणि मग कामाच्या मधूनच, त्याचा व्हाट्सअँप डीपी, स्टेटस बघायचा, त्याचा नंबर डिलिट करायचा, परत सेव्ह करायचा, ब्लॉक करायचा, अनब्लॉक करायचा, नंबर पाठ असला तरी!!

सरतेशेवटी: भाग तीन (अंतिम)

Submitted by चैतन्य रासकर on 28 December, 2016 - 03:47

सरतेशेवटी (भाग एक): http://www.maayboli.com/node/61163

सरतेशेवटी (भाग दोन): http://www.maayboli.com/node/61187

सरतेशेवटी: भाग तीन (अंतिम)-

"माझे थोरले काका तीन वर्षापूर्वी वारले, पण ते अजूनही मला फोन करतात"

गिरीश एवढे बोलून थांबला, पण त्याचे हे बोलणे कोणाला काही झेपले नाही, कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, बाहेर पाऊस आता कमी झाला होता.

एखाद सेकंदानंतर, रिक्तमांना तो काय बोलतोय हे कळले, रिक्तम एकदम हसायला लागले, संजय ही त्यांच्या हसण्यात सहभागी झाला, गिरीश त्यांच्या हसण्याने दचकला, संपादकाने त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केले, परत नजर गिरीशकडे वळवली.

सरतेशेवटी (भाग एक)

Submitted by चैतन्य रासकर on 21 December, 2016 - 09:43

"याने परत शेवट बदलला" डॉक्टर रिक्तम म्हणाले.

"तुम्ही जो शेवट सांगितला होता तोच लिहिला आहे" संजय घाबरत म्हणाला.

"मी म्हटलो होतो की.." डॉक्टर रिक्तम काही म्हणणार तेवढयात, संपादकाने विचारले "एक मिनिट..काय स्टोरी आहे?"

थोडा वेळ कोणी काहीच बोलले नाही, डॉक्टर रिक्तम, संजयकडे रागाने बघत होते, संजय डॉक्टरांची नजर चुकवत होता, तिघेजण डॉक्टर रिक्तमांच्या घरातल्या, दिवाणखान्यात बसले होते, डॉक्टर सोफ्यावर, त्यांच्या समोर संजय आणि संपादक बसले होते, संध्याकाळची वेळ होती.

संजय संपादकाकडे बघत कथा सांगू लागला.

विषय: 

स्मृती काढा (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 2 December, 2016 - 06:04

"आणि तुला तो नंबर आठवला?"

"हो, मी बघितला होता, पण नंतर मी विसरलो, हा काढा पिल्यावर मला नंबर आठवला"

"कसे काय?"

"सोप आहे, पाला पाण्यात टाकायचा, ते पाणी उकळायच, पाणी गाळून घ्या, पिऊन टाका, बस एवढच"

"तुला मग सगळच आठवल असेल?"

"सगळ नाही रे, तुझ्या जवळची आठवण असायला हवी, माझ्या जवळची आठवण, त्या चारचाकीचा नंबर होता"

"पण ही आठवण दुःखद होती"

"फक्त जवळची आठवण, मग ती सुखद असो किंवा दुःखद"

विषय: 

संभ्रम-ध्वनी (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 27 October, 2016 - 03:47

मला आज ही हे माहीत नाही की कार्तिकचा तो मेसेज वाचून तारा का अस्वस्थ झाली होती.

कार्तिक आणि तारा टिंडर वर भेटले. दोन दिवस फक्त फोन वरच बोलणे झाले, पण तिसऱ्याच दिवशी कार्तिक ने ताराला कॉफीसाठी विचारले, तारा ही लगेच नाही म्हणाली. तारा फक्त एकवीस वर्षांची होती, तिची ग्रॅजुयेशन झाल्यावरची पहिलीच नोकरी होती, नवीन शहर होते, नातेवाईक कोणही नव्हते. जेमतेम चार महिने झाले होते, नोकरी वरुन आल्या वर तिला कंटाळा येत असे, म्हणून ती मग टिंडर वर आली आणि कार्तिक ला भेटली.

विषय: 
Subscribe to RSS - maayboli gulmohar