भुरकटराव घरी येऊन २ दिवस झाले होते. थोडा अशक्तपणा असला तरीही आता व्यवस्थित होते. त्यामुळे बोलता बोलता मीनाक्षीदेवींनी विषयाला हात घातलाच. विषय संवेदनशील होता. मुलीच जमलेलं लग्न मोडायचं म्हणजे कठोर निर्णय.
मीनाक्षीदेवी:- तुम्हाला राग येणार नसेल तर बोलायचं होत.
भुरकटराव:- बोला देवी. राग कसला येणार. आपल्याला तयारीला आता वेळ उरला नाही. पैसा हातात होता तो हि खर्च झाला.
मीनाक्षीदेवी:- हो. तेच बोलायचं होत. तुम्ही ऍडमिट असताना शाम्भवी चा विचार घेतला. (घडलेला प्रसंग सांगत)
तिला मुलगा पसंत नाही हो....
मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी रिक्षातून घरी येत असतात. पवळ्याची आई दरामध्ये थांबुन त्यांना विचारपूर करते.
पवळ्या ची आई:- कशी आहे गं, तब्येत आता?
मीनाक्षीदेवी:- रात्रीपेक्षा ठीक आहे. पण ऑक्सिजन लेवल कमी आहे. इन्फेकशन जास्त आहे. इंजेकशन चालू केलंय.
नवरामुलगा आणि त्याचे वडील बाहेर एका कोपऱ्यात जाऊन चर्चा करतात. आणि पुन्हा येऊन बोलू लागतात.
नवरदेवाचे वडील:- भुरकटराव, आम्ही तुमच्या शब्दाचा मान ठेऊन गाडीचा खर्च १०,०००/- ने कमी करतो. पण लग्न मात्र या महिनाभरात उरकावे लागेल.
नाममात्र कमी केलेली रक्कम हा शब्दाचा मान नसून आपल्याला दाखवलेला ठेंगा आहे याची पुरेपूर कल्पना भुरकटरावांना आली होती. आणि त्यातही एका महिन्यात पैश्याची जमवा जमव करून लग्नाची तयारी करणे आव्हानात्मक होते.
मुलीच्या सुखाचा विचार करता थोडी धावपळ करणे अपरिहार्य होतेच.
सर्वांनाच मदतीसाठी धावणारा आणि सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणारा अवचट आता सर्वांच्याच परिचयाचा झाला होता. शहरात अनेकांना उपयोगी पडल्यामुळे त्याच्या नावाची चर्चा सर्वत्रच होती. असा गुणी मुलगा होणे नाही, अशीच त्याची ख्याती होऊ लागली.
त्याच सुमारास शाम्भवीला स्थळ चालून आलं. मुलगा MBA, नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारा आणि गलेलठ्ठ पगार घेणारा. माहिती एकूणच मीनाक्षीदेवी खुश. मुलगा मुलीला पाहायला आला. पांढरे शुभ्र कपडे, चांगली शरीरयष्टी, कणखर आवाज, कुणाच्याही नजरेत भरेल असे व्यक्तिमत्व.
दिवसेंदिवस परिस्थिती रौद्ररूप धारण करत होती. tv वर corona बातम्यांशिवाय काहीच उरल नव्हतं. रस्ते ओस पडले होते. घराबाहेर पडण्याची भीती सर्वांमध्येच होती.गर्दी टाळण्यासाठी केलेल्या नियमांना डावलून अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन नियम धाब्यावर बसवल्याच्या घटना कानावर येत होत्या. किंबहुना त्यामुळेच कोरोना केसेस वाढत होत्या.
lockdown वाढला होता. दुकानाला लागणारा माल मिळत नव्हता. त्यामुळे दुकान बंद करून नव्या कामाच्या शोधात अवचट होताच. मित्राकडूनच नगरपालिकेतर्फे covid ऍम्ब्युलन्स साठी ड्राइवर ची आवश्यकता आहे अशी बातमी समजली.
हार फुलांचा धंदा चालू करून आता महिना लोटला होता. धंदा व्यवस्थित चालू होता. शाम्भवीने केलेल्या मदतीची परतफेड करण्याचा विचार मनात येऊनही अवचट ते टाळत होता, कारण तिचे ते कर्ज त्याला हवेहवेसे वाटत होते. अवचट बातम्या पाहत नसला तरीही अधून मधून चर्चेतून भारतातील corona केसेस वाढल्याच्या बातम्या त्याच्या कानावर आल्याचं होत्या. धंद्यात जम बसतच होता आणि शेवटी नको ती बातमी येण्याचा दिवस आला.
Enter Caption
अवचट चा दुसरा दिवस शाम्भवीच्या दर्शनाशिवाय सुरु होऊन मोठ्या नाटयमय प्रसंगात बदलला होता. शिवाय ५० लोकांच्या ऑर्डर्स बरोबरच काही जास्तीचे हार दुकानावर किरकोळ विक्रीसाठी बनवायचे होते. त्यामुळे आल्यापासूनच अवचट आणि पवळ्या हार बनवण्यात गुंग होऊन गेले.
पोरगा पहाटे गेलेला दुपार होईपर्यंत घरी न आल्याचे पाहून अवचट ची आई त्याच्या दुकानावर येते. काही न खाता पिता करत असलेली धावपळ आणि मेहनत पाहून तीच मन भरून येत. काहीही न बोलता ती घरी परतते. दोघांसाठी जेवणाचा डब्बा भरून पुन्हा येते.
मागील भाग पाहण्यासाठी
भाग १ https://www.maayboli.com/node/79319
अवचट चौकामध्ये न्हाव्याच्या दुकानात गाणी ऐकत, गप्पा मारत बसलेला असतो. तिकडून मीनाक्षीदेवी भाजी घेऊन समोरून जात असतात. जाता-जाता त्यांचं अवचट कडे लक्ष जात. मीनाक्षीदेवी अवचट ला आवाज देतात. (आता सासूबाईंनी आवाज दिलाय म्हंटल्यावर आपला सलमान खान शांत कसा राहील)
अवचट आनंदाने हसत हसत मीनाक्षीदेवींजवळ जातो.
मीनाक्षीदेवी:- कधीपासून तुझा उद्योग सुरु करतोय?
अवचट:- (आता काय उत्तर द्यायचे असं तोंड करून विचार करू लागतो)