न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.
१९९३मध्ये ‘बझार सीताराम’ या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नीना गुप्ताने सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. त्या चित्रपटाचे निर्माते श्याम बेनेगल यांनी तिला त्या वेळी सांगितले होते - “प्रत्येक कथेची स्पष्ट सुरुवात, मध्य आणि शेवट असं सगळं लक्षात ठेवलं, तर कधीही अपयश येत नाही.” हा सल्ला तिने केवळ चित्रपटालाच लागू केला असे नव्हे, तर तिच्या आत्मचरित्रालाही लागू केल्याचे दिसते. ती ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्रात हेच समीकरण वापरून आपली कहाणी सांगते.
पाकिस्तानी टीवी सिरिअल्स पाकिस्तानात गाजलीत कि नाही हे समजण्याचा मार्ग म्हणजे त्यातील संवादांची सोशल मीडियावर होणारी चर्चा. पाकिस्तानी सीरिअल्स मधील ज्या काही संवादांची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली ती अशी:
१) “मम्मी आप ये क्या कह रही है? ” – हमसफर. हमसफर रिलीज झाल्यावर अगदी ब्लॉकबस्टर बनले. ज्यांनी ही सिरीयल पहिली त्यातील माहिरा खानचा रडका चेहरा आणि तिचा हा संवाद याचीच आठवण ठेवली. “ मम्मी आप ये क्या कह रही है? ”
हळद आणि हडळ - २
शुद्धीवर आली तेव्हा अमृता एका लाकडी खुर्चीवर बसलेली होती. डोळे चौफेर फिरवत ती न्याहाळू लागली. गर्द काळोखातही थोडंफार समजण्याइतपत तिला दिसत होत. कोंदट दुर्गंधी, जागोजागी कोळयाचे जाळे, धूळ. भेदरलेल्या अवस्थेत ती उठून पळायचा प्रयत्न करत होती. मध्येच हुंदक्यांचा आवाज येत होता. कोणीतरी बहुदा आतल्या खोलीत रडत असाव. अमृताचे हात पाय बांधले होते. तोंडावर पट्टी बांधली होती. जखडलेल्या अवस्थेतुन ती सुटका होण्यासाठी धडपडत होती. जोराने ओरडण्याचा प्रयत्न करत होती.
तोच तिला आवाज येऊ लागला. "तुला पुन्हा ईथेच यायचंय, लवकर येशील ना?"
भुरकटराव घरी येऊन २ दिवस झाले होते. थोडा अशक्तपणा असला तरीही आता व्यवस्थित होते. त्यामुळे बोलता बोलता मीनाक्षीदेवींनी विषयाला हात घातलाच. विषय संवेदनशील होता. मुलीच जमलेलं लग्न मोडायचं म्हणजे कठोर निर्णय.
मीनाक्षीदेवी:- तुम्हाला राग येणार नसेल तर बोलायचं होत.
भुरकटराव:- बोला देवी. राग कसला येणार. आपल्याला तयारीला आता वेळ उरला नाही. पैसा हातात होता तो हि खर्च झाला.
मीनाक्षीदेवी:- हो. तेच बोलायचं होत. तुम्ही ऍडमिट असताना शाम्भवी चा विचार घेतला. (घडलेला प्रसंग सांगत)
तिला मुलगा पसंत नाही हो....
मीनाक्षीदेवी आणि शाम्भवी रिक्षातून घरी येत असतात. पवळ्याची आई दरामध्ये थांबुन त्यांना विचारपूर करते.
पवळ्या ची आई:- कशी आहे गं, तब्येत आता?
मीनाक्षीदेवी:- रात्रीपेक्षा ठीक आहे. पण ऑक्सिजन लेवल कमी आहे. इन्फेकशन जास्त आहे. इंजेकशन चालू केलंय.
नवरामुलगा आणि त्याचे वडील बाहेर एका कोपऱ्यात जाऊन चर्चा करतात. आणि पुन्हा येऊन बोलू लागतात.
नवरदेवाचे वडील:- भुरकटराव, आम्ही तुमच्या शब्दाचा मान ठेऊन गाडीचा खर्च १०,०००/- ने कमी करतो. पण लग्न मात्र या महिनाभरात उरकावे लागेल.
नाममात्र कमी केलेली रक्कम हा शब्दाचा मान नसून आपल्याला दाखवलेला ठेंगा आहे याची पुरेपूर कल्पना भुरकटरावांना आली होती. आणि त्यातही एका महिन्यात पैश्याची जमवा जमव करून लग्नाची तयारी करणे आव्हानात्मक होते.
मुलीच्या सुखाचा विचार करता थोडी धावपळ करणे अपरिहार्य होतेच.
सर्वांनाच मदतीसाठी धावणारा आणि सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणारा अवचट आता सर्वांच्याच परिचयाचा झाला होता. शहरात अनेकांना उपयोगी पडल्यामुळे त्याच्या नावाची चर्चा सर्वत्रच होती. असा गुणी मुलगा होणे नाही, अशीच त्याची ख्याती होऊ लागली.
त्याच सुमारास शाम्भवीला स्थळ चालून आलं. मुलगा MBA, नामांकित कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करणारा आणि गलेलठ्ठ पगार घेणारा. माहिती एकूणच मीनाक्षीदेवी खुश. मुलगा मुलीला पाहायला आला. पांढरे शुभ्र कपडे, चांगली शरीरयष्टी, कणखर आवाज, कुणाच्याही नजरेत भरेल असे व्यक्तिमत्व.
दिवसेंदिवस परिस्थिती रौद्ररूप धारण करत होती. tv वर corona बातम्यांशिवाय काहीच उरल नव्हतं. रस्ते ओस पडले होते. घराबाहेर पडण्याची भीती सर्वांमध्येच होती.गर्दी टाळण्यासाठी केलेल्या नियमांना डावलून अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन नियम धाब्यावर बसवल्याच्या घटना कानावर येत होत्या. किंबहुना त्यामुळेच कोरोना केसेस वाढत होत्या.
lockdown वाढला होता. दुकानाला लागणारा माल मिळत नव्हता. त्यामुळे दुकान बंद करून नव्या कामाच्या शोधात अवचट होताच. मित्राकडूनच नगरपालिकेतर्फे covid ऍम्ब्युलन्स साठी ड्राइवर ची आवश्यकता आहे अशी बातमी समजली.
हार फुलांचा धंदा चालू करून आता महिना लोटला होता. धंदा व्यवस्थित चालू होता. शाम्भवीने केलेल्या मदतीची परतफेड करण्याचा विचार मनात येऊनही अवचट ते टाळत होता, कारण तिचे ते कर्ज त्याला हवेहवेसे वाटत होते. अवचट बातम्या पाहत नसला तरीही अधून मधून चर्चेतून भारतातील corona केसेस वाढल्याच्या बातम्या त्याच्या कानावर आल्याचं होत्या. धंद्यात जम बसतच होता आणि शेवटी नको ती बातमी येण्याचा दिवस आला.
Enter Caption