राजकारण

कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2014 - 13:48

"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"

आता धागा सुरू करूया,

१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.

"हे पोलिस स्टेशनच राजकारण्यांना विका आता!"

Submitted by उडन खटोला on 23 November, 2014 - 03:01

काल काही कामासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलो असतानाचा प्रसंग. एक बारा-तेरा वर्षांची मुलगी आईवडिलांसोबत तक्रार नोंदवायला आली होती. समाजातील सध्याच्या दुर्दैवी परिस्थितीस साजेशी अशी छेडछाडीची तक्रार. परिसरातील दोन मवाली तिची रोज क्लासला जाताना छेड काढतात अशी तक्रार तिने नोंदवली आणि पोलिसांनी ताबडतोब त्यांना पकडून आणले. आधी पोलिसांसमोर दोघांनी साळसूदपणाचा आव आणला, पण पोलिसांनी शिव्या घालायला सुरुवात केल्यावर ते दोघे भडकले आणि पोलिसांनाच शिविगाळ आणि जातीवाचक धमक्या द्यायला सुरुवात केली.

विषय: 

राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य आणि भारतीय जनमानस

Submitted by बावरा मन on 16 November, 2014 - 01:37

अशात बघण्यात आणि वाचण्यात आलेले दोन प्रसंग - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना वर्तमान पत्रात कुणी राजकुमारी कौल वारल्याची बातमी वाचण्यात आली . त्यांच्या अंतिम संस्काराला अरुण जेटली , ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर बरेच दिग्गज उपस्थित होते . कोण होत्या या राजकुमारी कौल ? वाचून अनेकाना धक्का बसेल पण दिल्ली च्या राजकारणी वर्तुळात त्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'Constant Companion ' म्हणून प्रसिद्ध होत्या .

विषय: 

भाजपचे सरकार तरले

Submitted by नितीनचंद्र on 12 November, 2014 - 03:16

आज महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मतदानाने सिध्द न करता आवाजी मतदान पध्दतीने नवनिर्वाचित लोकसभा अध्य्क्षांनी निर्णय देऊन सरकार तारले. एकदा गुप्त मतदानाची मागणी आली नाही की विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा फायनल असतो. त्यावर कुठेही दाद मागता येत नाही ही लोकशाहीची तांत्रीक प्रक्रिया झाली आणि म्हणुनच जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणुन शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची निवड झाली आणि त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदानाची मागणि करताच तो विषय संपला आहे असे विधानसभा अध्यक्षांनी जाहिर केले.

विषय: 
प्रांत/गाव: 

स्वतःच स्वःतच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस करणे हे योग्य आहे का?

Submitted by कासव on 5 November, 2014 - 11:11

पंडीत नेहरु आणि इंदीरा गांधी यांनी स्वतःच स्वतःच्या भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. असे ऐकीवात/वाचन्यात आले. त्याबद्दल सत्यता पडताळुन पाहणे गरजेचे आहे का? आणि हे सत्य असेल तर ते कितपत योग्य आहे.

सोर्सः विकि
http://en.wikipedia.org/wiki/Indira_Gandhi#Awards

शब्दखुणा: 

मनमोहन सिंग यांना जपानचा राष्ट्रीय पुरस्कार

Submitted by भरत. on 3 November, 2014 - 23:49

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जपानचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. : Grand Cordon of the Order of the Paulownia Flowers
भारत-जपान मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांत केलेल्या कार्यासाठी डॉ. सिंग यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. असा सन्मान दिला जाणारे ते पहिलेच भारतीय आहेत.

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

Submitted by जीएस on 20 October, 2014 - 20:20

उद्धव ठाकरेंना कुणीतरी जागे करेल काय ?

उद्धव ठाकरेंच्या एका घोडचुकीने विधानसभेत शिवसेनेला बलवान बनवण्याची आणि ज्या मुख्यमंत्रीपदासाठी ते एवढे आतुर झाले होते ते पद मिळवण्याची दारी चालून आलेली संधी त्यांनी दवडली आहे.
आता त्यांची आणखी एक घोडचूक शिवसेनेचे फार मोठे खच्चीकरण करू शकते.

कसे ते सांगण्यासाठी मी राजकीय परिस्थितीचे माझ्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे विश्लेषण वगैरे करणार नाही कारण ते किती सापेक्ष असते हे आपण विविध विश्लेषकांचे लेख वाचून अनुभवतो आहोत. मी फक्त निकालाच्या आकड्यांचा आधार घेऊन, आकडे काय दाखवतात ते लिहिणार आहे.

विषय: 

निवडणूक

Submitted by अनिकेत भांदककर on 20 October, 2014 - 13:17

आली निवडणूक
वाजला दिंडोरा,
गल्ली-बोळ्यात
नेत्यांचा हिंडोरा.

कुणाला जयभीम
कुणाला राम-राम,
उन्हात फिरून नेत्यांचा
निघतोय घामच-घाम.

जमविली पोर
आणल्या गाड्या,
प्रचारासाठी आता
राल्याच-राल्या.

कुणाला मोबाईल
कुणाला देशी,
निवडणुकीच्या दिवसात
नाहीच राहत कुणी उपाशी.

पिंजून होतोय वार्ड
गल्यापण सुटत नाही,
निवडणूक झाल्यावर नेता
कुणालाच दिसत नाही.

कधी वाटतोय नोटा
कधी वाटतोय साडी,
नेता आपल्या जनतेची
अचूक पकडतो नाडी.

मोठे- मोठे दावे
अन आश्वासनांची खैरात,
विजयी झाल्यावर मग
संपूर्ण गावभर वरात.

जाती-धर्माचे दाखले
देऊन ठेवतो अचूक बोट,

प्रादेशिक पक्ष आणि फाजिल अस्मिता

Submitted by उडन खटोला on 20 October, 2014 - 10:09

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॉंग्रेस-मुक्त भारताचे स्वप्न साकार होताना दिसत आहे,ही अभिनंदनीय गोष्ट आहे. त्याचबरोबर फाजील प्रादेशिक अस्मिताना पायबंद घालून प्रादेशिक पक्षांचे कंबरडे मोडणे देखील अपेक्षित आहे . याचे कारण गेल्या 20-25 वर्षात प्रादेशिक पक्षांच्या लांगूलचालन करीत कसेबसे केंद्रसरकार् चे पांगूळगाडे हाकणारे दुर्बल पंतप्रधान भारताला पहावे लागले .

विषय: 

ते दोघ

Submitted by बावरा मन on 20 October, 2014 - 02:07

विदयार्थी दशेत असताना 2004 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मी एका प्री पोल सर्व्हे मध्ये भाग घेतला होता . त्यावेळेस अमरावती लोकसभा मतदार संघात पण काही चकरा कराव्या लागल्या होत्या . शिवसेनेचे अनंत गुढे आणि लोकशाही आघाडीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होती . त्यावेळेस कोणी एक बच्चु कडू अस विचित्र नाव असणारा कोणी एक पोरगेला उमेदवार पण अपक्ष म्हणून उभा होता . या दिग्गजांच्या लढतीमध्ये पोरांचं टोळक घेऊन फिरणारा आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणारा आर्थिक परिस्थिती यथातथाच असणारा हा पोरगा काय करणार असाच एकूण सूर होता . पण निवडणुकीच्या मतमोजणी नंतर सगळ्यांनाच तोंडात बोट घालावी लागली .

विषय: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण