सरकारला काही कळते का नाही ? काय चाललेय काय ?
तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या बॅंक कर्मचाऱ्यांची बाजू कोणी घेत नाही असे सरकारला वाटते का ?
अधूनमधून का होईना पण नियमितपणे संप करून सामान्य जनतेची मोठी सोय करणारया कर्तव्यदक्ष संपकरी बॅंक कर्मचाऱ्यांना शासनाने खरे तर चौदावा वेतन आयोग लागू केला पाहिजे ....
फार सोशिक आहेत हो हे लोक ! गळफास लावून मरणारया गोरगरीब भिकारचोट शेतकरयापेक्षाही यांच्यावर जास्त अन्याय होतो !
तरीदेखील नेटाने नोकरी न सोडता फक्त अधून मधून संप करतात ...
मग शनिवार रविवारला जोडून संप केला तर बिचारे थोडं फार आऊटींग का काय म्हणतात ते करू शकतात ...
सर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.

अधिकारी बांधवांनो
समाज आणि प्रशासनामध्ये
नक्कीच काही दुरावा आहे
याचा वेळोवेळी जाहिर होणारा
समाजात जिवंत पुरावा आहे
समाजातील अधिकार्यावर
जनतेचे सदैव लक्ष असतात
समाजही त्यांनाच ग्रेट मानतो
जे सदैव कर्तव्य दक्ष असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही. याचाच फायदा घेऊन काही ‘सुपीक’ डोक्याच्या ठगांनी याचा गैरवापर केला.

उंबरा मनाचा
विखरून रंग प्रितिचा साऱ्या वनात होता
बेरंग विरह वाटे ओल्या दवात होता
कापून छान खुबिने तो केस त्यास गेला
गफलत गळ्यास नव्हती विश्वास घात होता
होते उभे पिठोरी का चांदणे मनाशी
हा उंबरा मनाचा जेव्हा उनात होता
होणार काय त्याचे माहीत त्यास होते
जात्यातला तसाही आधी सुपात होता
मी उखडणार नव्हतो त्या वादळातही ,,पण
गेला सुटून जोही हातात हात होता !
विलास खाडे
चेन्नईच्या श्रीमती वसुधारिणी यांनी कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेत दि. १० ऑक्टोबर रोजी कामधेनु योजनेमध्ये रु. एक लाख गुंतवले. त्यासाठी त्यांनी रु. ५०,०००/- रोख व उरलेल्या रक्कमेचा धनादेश बँकेला दिला. एक वर्षानंतर ठेवीची मुदत संपल्याने त्यांना व्याजासह रु.१,०७,१८७/- मिळाले . मात्र सप्टेंबर २००९ मध्ये म्हणजे वरील व्यवहार झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी बँकेने त्यांना कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यांतून रु. ६१३८३/- वसूल केले. पासबुकातील ती नोंद पाहताच वासुधारिणी तडक बँकेत गेल्या. त्यांनी १० ऑक्टोबर २००६ रोजी कामधेनू योजनेसाठी जमा केलेल्या रु.
बँकेचे व्यवहार करणे ग्राहकांना सुलभ व्हावे या दृष्टीने अनेक सुविधा अलिकडच्या काळात उपलब्ध झाल्या आहेत. विशेषतः नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सारख्या सुविधांमुले पैशाची देवघेव, खरेदी – विक्री, नियमित सेवांची बिले भरणे इत्यादी व्यवहार अक्षरशः एका बोटावर होत आहेत. ए. टी. एम. च्या सुविधेमुळे तर क्षणार्धात पैसा ग्राहकासमोर हजर होतो. या सुविधांबरोबरच गैरव्यवहाराच्या, सदोष सेवेच्या तक्रारीही वाढू लागल्या आहेत. ए. टी. एम. सुविधेच्या बाबतीत बोलायचे झाले तर यंत्रात कार्ड घातल्यानंतर माहिती दिल्यानंतरही पैसे बाहेर न येणे, पैसे कमी आले तरी खात्यातून जास्त रक्कम वजा होणे या स्वरुपाच्या तक्रारी येत आहेत.
पैसा
आपल्या कुवतीनुसार
जो-तो कमवतो पैसा
चढ-ऊतार करत कधी
माणसांना रमवतो पैसा
पैशामुळं तर कधी कधी
माणूसकीलाही डागणं आहे
जगण्यासाठी हा पैसा की
पैशासाठी हे जगणं आहे,.?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
जागता पहारा- जन धन योजना
हा सुद्धा जागता पहाराच आहे, पण हा उपक्रम स्पेसिफिक पहारा आहे.
मे २०१४ पासून आदरणीय मोदींनी बरेच उपक्रम सुरु केले.
जन धन योजना , डिजिटल इंडिया , स्वच्छ भारत अभियान, स्किल इंडिया, मुद्रा बँक, गंगा स्वच्छता, etc
या प्रत्येक योजनेचे क्रिटीकलअनालिसिस करण्या साठी हे धागे काढायचा मानस आहे