साहित्य

हे असं का घडतं??

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हा मी जुन्या मायबोलीवर लिहिलेला एक लेख आहे. एका तत्कालिक घटनेवर मनात उठलेल्या प्रतिक्रियेवर. त्या वेळेला मनात फार चलबिचल झाली होती. असे कसे घडू शकेल असे प्रश्न होते आता दोन तीन वर्षानंतर ती घटना देखील नीट आठवत नाहिये. रोजच्या अमानुष खून्, बलात्कार आणि अतिरेकी कारवाया. काय काय लक्षात ठेवणार. आणि किती लक्षात ठेवणार??

कदाचित माझे मन मुर्दाड बनत चाललेय.
किंवा कदाचित या घटना आता "नॉर्मल" झाल्या आहेत.

विषय: 
प्रकार: 

साहित्याचे निकष यावर माझे मत

Submitted by हर्ट on 28 October, 2009 - 03:14

नमस्कार

या फलकावर तुम्ही चांगल्या साहित्याची निवड करताना कुठले निकष लावता यावर लिहा. ज्यानी त्यानी विचारविनिमय करुन आपापले मत प्रामाणिक होऊन मांडावे. स्पष्टीकरण देता आले तर अजून छान. अलिकडे मायबोलिवर चांगल्या कवितांची निवड होते आहे. पुढे कधीतरी आणखी कुठल्या तरी साहित्यप्रकारचीही निवड केली जाईल. त्यावेळी इथली बहुसंख्य मते विचारात घेता येतील.

विषय: 

२००९ चे दिवाळी अंक

Submitted by हर्ट on 21 October, 2009 - 05:11

नमस्कार!

ज्यांनी २००९ चे दिवाळी विकत घेतलेत आणि वाचलेत त्यांना विंनती की त्यांनी त्या त्या दिवाळी अंकातील चांगले साहित्य आणि साहित्यकार याबद्दल लिहावे. म्हणजे एखाद्या दिवाळी अंकातील चांगला लेख सुटणार नाही.

आभारी आहे.

विषय: 

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

लोकसत्ता (लोकमुद्रा पुरवणी दि० ०४ ऑक्टोबर २००९) मध्ये प्रकाशित झालेला हा लेख, प्रत्येक स्वाभिमानी व स्वभाषाप्रेमी माणसाने आवर्जून वाचावा असा आहे.
—————
आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याची ’सुरस आणि विस्मयकारी’ कथा पुढील दुव्यावर सापडेल.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

प्रकार: 

"आजोळचे दिवस"

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मी तसा मुळचाच खुप नॉस्टेल्जिक माणुस... मला माझा आजचा 'आज', उद्या परवा 'काल' म्हणुन आजच्या 'आज' पेक्षा जास्त आवडतो... असो! "आजोळचे दिवस" हा तर माझा सगळ्यात आवडता नॉस्टेल्जिया!
या आठवणी सुरु होतात साधारणत: मी पहिली-दुसरीत असल्यापासुन... त्याकाळी आम्ही रहायचो इस्लामपुरला आणि माझे आजोळ कोल्हापुर, म्हणजे जेमतेम एका तासाच अंतर, त्यामुळे फारच फ्रिक्वेंटली आजोळी येणं व्हायच.
बर्‍याचदा शनिवारची शाळा झाली की आमची स्वारी दुपारच्या एसटीने कोल्हापुरला यायची... कोल्हापुर स्टँडवरचं यळगुड दुध आणि सहकारची बिस्कीटे हे सगळ्यात पहिल आकर्षण... तिथच पहिला स्टॉप पडायचा.

विषय: 
प्रकार: 

चांदोबा आता ऑनलाइन

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

'कॉमिक बुकं' हा आपल्यापैकी बहुसंख्यांनी लहानपणी केलेल्या रेल्वेप्रवासातल्या आठवणींचा अविभाज्य घटक आहे. चाचा चौधरी, फँटम वगैरे कॉमिक बुकांच्या जोडीने 'चांदोबा' हे तसं रूढार्थानं कॉमिक बुक नसलेलं नियतकालिक बालगोपाळांमध्ये तुफान लोकप्रिय होतं! त्या चांदोबाची मराठी ऑनलाइन आवृत्ती आता उपलब्ध झाली आहे.

प्रकार: 

मंथन - मराठी साहित्याचे इ-प्रसारण

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"तुमची पिढी वाचतच नाही."

मी अमेरिकेतल्या एका प्रतिष्ठीत मध्यमवयीन मराठी गृहस्थांशी फोनवरुन बोलत होतो, तेव्हा त्यांनी हा बॉम्ब टाकला. मी हबकलोच. त्या गृहस्थांविषयी मला आदर होता (आणि आहे). अमेरिकेतून निघणारं एक मराठी मासिक तरुण मंडळी का वाचत नाहीत या विषयावर आम्ही फोनवरुन बोलत होतो.

विषय: 
प्रकार: 

श्रीमती लालन सारंग - 'सखाराम बाइंडर', 'बेबी', 'कमला'

Submitted by चिनूक्स on 6 July, 2009 - 14:15

रंगभूमीची अप्रतिष्ठा होईल, वा तिचं पावित्र्य बिघडेल म्हणून मी माणसांचे हे जिणे नाटकाबाहेर ठेवायला मी तयार नाही. रंगभूमीपेक्षा माझ्या दृष्टीने माणसे आणि त्यांचे आयुष्य कधीही महत्त्वाचे आहे. एखाद्या प्रकारचे आयुष्य बाहेर ठेवून रंगभूमी पवित्र राहणार असेल, तर त्या पावित्र्याविषयी मला प्रेम नाही. माझी मराठी रंगभूमी मेलेल्या ’काल’ची किंवा ’आज’ची आहे म्हणून तिने एका सुस्थित जगाचीच स्वप्नरंजनात्मक वातड चित्रे रंगवीत जगता कामा नये. तिने आजचे, या घटकेचे खरेखुरे जगणे, काहीवेळा त्यातील उघडेवागडेपणासकट, सच्चेपणाने, अर्थपूर्णपणे व समर्थपणे दाखविले पाहिजे. सच्चेपणात मला तिची ताकद वाटते. - श्री.

लॉर्ड ऑफ द वर्ड्स!

Submitted by स्वाती_आंबोळे on 15 June, 2009 - 00:13

Spoiler Warning : लॉर्ड ऑफ द फ्लाईज वाचायचं ठरवलं असेल आणि शेवट पुस्तकातूनच वाचावा असं वाटत असेल त्यांनी स्टार्सच्या नंतरचा भाग वाचू नये.
---------------------------------------------------------------------------------

वाचलंच पाहिजे असं काही- अलिप्त दृष्टिकोनातून...

Submitted by pratham.phadnis on 12 June, 2009 - 22:03

भारत हा शेतिप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था ७०% शेतिवरच अवलंबून आहे. पण एखाद्या अर्थ तज्ज्ञाच्या नजरेने पाहिले तर अर्थशास्त्राचे अजुनही बरेच पैलु असतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य