क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आश्विनची दृष्ट काढा कोणीतरी>>>
आज फॉर या चेंज चौघांनी चक्क सुरेख गोलंदाजी केली.. आतापर्यंत कुठल्याही फुकट धावा दिल्या नाहीत...

जवळ पास ५० वर्षानंतर न्यूझीलंडने पाकला उपखंडात मालिकेत मात दिली...
आज शेवटच्या दिवशी पाक संघ ढेपळाला..

अश्विन ने मस्त बॉलिंग केली. इशांत ने सुद्धा सुरूवातीपासूनच परफेक्ट लाईन आणी लेंथ पकडली होती. बुमराह जरा चाचपडत होता, पण नंतर त्यालाही लय सापडली असं वाटतंय (बघितलं नाही). मस्त! आता पहिल्या इनिंग ला लीड मिळाला तर सायकोलॉजिकल अ‍ॅडव्हांटेज मिळेल. दुसर्या इनिंग मधे बॅट्समन, पहिल्या इनिंग च्या अपयशातून धडा शिकतील अशी आशा आहे.

चौथ्या डावाच्या फलंदाजीचा दबावही ऑसीजना जाणवत असेलच. आज मुरली विजयनेही ऑफ सपीन बरी गोलःदाजी केली.

"चौथ्या डावाच्या फलंदाजीचा दबावही ऑसीजना जाणवत असेलच. " - त्यातही शॉन मार्श ला जरा जास्तच जाणवत असेल.

१० रन्स चा लीड मिळाला तरी चालेल. पण त्याचा सायकोलॉजिकल अ‍ॅड्व्हांटेज खूप मोठा ठरेल. सिरीज मधली पहिलीच मॅच आहे.

15 धांवाची आघाडी. 250च्या वरील प्रत्येक धावेची आघाडी ऑसीजवरचा दबाव वाढवेल . बघूं आपली फलंदाजी बहरते का व कशी. अंपायरसना भूक लागली किंवा पावसाची शक्यता - लंच !

लंच तिथे पण माझं पोट भरलं , छाती पण अभिमानाने भरून आली ! टीव्ही वर लंच टाईमला त्या ऐतिहासिक 2003च्या सामन्याचे हायलाईट्स दाखवले - द्रविड, लक्ष्मण व आगरकरचया अफलातून कामगिरीने ऑसीज विरूद्ध अशक्यप्राय विजय !!!

भारताची छान सुरवात. 36 - 0 ! ऑसीज सुधारणं कठीण. फलंदाजांना चिथावणीखोर बोलणं सुरू !

मुरली कार्तिक कॉमेंटरी ला आला म्हणून मुरली विजय रागावून गेला दिसतोय.. दुसऱ्या डावात त्याचे सातत्याने फेल्युअर कायम..

85 - 2 . पुजारा - कोहली जोडीची कामगिरी आतां निर्णायक ठरण्याची दाट शक्यता.

अजून एक १००-१२५ धावा ... आजचं शेवटचं सत्र खेळाच्या दृष्टीने निर्णायक ठरावं. कोहली-पुजाराला शुभेच्छा!

टेस्ट मस्त रंगली आहे. पुजारा, कोहली आणी राहूल विजय च्या भागीदार्या निर्णायक ठरतील असं वाटतय. पण अजून ह्या टेस्ट मधे बराच वेळ (आणी जीव) शिल्लक आहे.

राहुलचे अप्रचलित फटके ऑसी गोलंदाजाना बुचकळ्यात टाकत होते. आता त्याच्याकरता डांवपेंच आखण्याची आणखी एक कटकट वाढली त्यांच्यासाठी .

भाऊ, राहुल बिलकुल कटकट न वाढवणाऱ्यातला आहे हे ऑसीजना व्यवस्थित कळलं असेल.
विचित्र फटके मारायच्या नादात तो स्वतःहूनच विकेट फेकतो.

विजय नी नीट न खेळून अन राहूल नी अडमतडम ४४ करून पुढच्या टेस्टला शॉ आल्यावर कुणाला हकलायचं अन कुणाला ठेवायचं हा प्रश्ण चांगलाच अवघड करून ठेवलाय.
मला तर वाटतं की शर्माला टेस्टमधून नारळ द्यायच्या आधी एकदा ओपनिंगला ट्राय करून पाहिला पाहिजे. आत्ता जे चालू आहे त्याहून वाईट काहीच होणार नाही. आणि जर ते करायचं नसेल तर पार्थिव ला आणावं ओपन करायला अन खाली विहारीला.
राहणे ला ही या सिरीज चा शेवटचा मौका आहे हे सांगून काही न केल्यास नारळ द्यायची व्यवस्था करावी.

* हा प्रश्ण चांगलाच अवघड करून ठेवलाय.* मॅच जिकले तर अवघड कांहींच रहाणार नाहीं; winninng cmbination continues हा जणू अलिखीत नियमच आहे !! Wink

६ बाद ३०३ नंतर सर्वबाद ३०७ कसे बरं आपला संघ वाटलं हा दुसऱ्या डावात बरोबर!! त्या ४ धावादेखिल स्टार्क ने दिल्या वाईड टाकून

जिंकतील. ३२३ चं टारगेट चौथ्या इनिंग ला अवघड आहे. पण ज्या पद्धतीनं लंच नंतर विकेट्स टाकल्या, ते वाईट होतं. थिंक टँक ला त्यांची स्ट्रॅटेजी re-think करायला हवी.

Pages