समाज

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन

Submitted by सचिन पगारे on 28 November, 2013 - 11:26

jyotirao-govindrao-phule.jpg

क्रांतिसूर्य महात्मा फुले ह्यांचा २८ नोव्हेंबर हा महानिर्वाण दिवस. जातीयवादाच्या चक्रात सापडलेल्या दिन दुबळ्यांचा कैवारी म्हणजे महात्मा फुले. ह्या स्वाभिमानी नेत्याने देशाच्या सामाजिक जीवनात अशी काय उलथापालथ घडवली कि त्याची दखल इतिहासाला घ्यावीच लागली.त्याग,आदर्श, साहस ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महात्मा फुले.

विषय: 

ग्राहकांची फसवणूक .. कशी टाळू शकता ?

Submitted by अभि१ on 27 November, 2013 - 10:12

मला आलेले काही अनुभव आणि त्यावरचे मला सुचलेले उपाय . तुमचे मत आणि असेच काही अनुभव तुम्हाला आले आहेत का ?

१. रद्दी . आपल्याला वाटते कि रद्दीवाले हे गरीब बिचारे लोक. त्यांनी मारले थोडे पैसे तर मारू दे. १०/२० रुपयांनी काय नुकसान होते आपले ? मुळात रद्दीचा भाव - १० रु / किलो . जेव्हा ते हा भाव आपल्याला देतात तेव्हा त्यना नक्कीच १२ ते १३ रु / किलो कमीत कमी मिळत असणार. कदाचित १५ रु पण.

जाडो की नर्म धुप

Submitted by विजय देशमुख on 27 November, 2013 - 04:19

शनीवारचा दिवस. पहाटे ८ लाच उठलो. इच्छा नव्हती उठायची, पण "बाबा, भुक लागली" ऐकुन उठावच लागलं. बाहेर बघितलं तर धुकं असावं असं वाटत होतं. थंडीने बघुदा सुर्यदेवही झोपले असावे.

"रोज शाळा असते तेंव्हा जबरदस्तीने उठवावं लागते, अन आज मुद्दाम लौकर उठलास?" मी दुध गरम करत विचारलं. तो काय बोलणार बिचारा. एक कार घेउन त्याची खेळायला सुरुवातही झाली होती.

उद्घाटन

Submitted by आतिवास on 14 November, 2013 - 06:23

“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
“कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
“अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं.

नवे व्यवसाय

Submitted by नरेंद्र गोळे on 13 November, 2013 - 23:41

शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

शब्दखुणा: 

चित्रपटसृष्टीतील दुर्लक्षित लोक

Submitted by फारएण्ड on 10 November, 2013 - 22:03

'शोले' मधला पहिला मालगाडीवाला सीन...ठाकूरशी बोलताना टपावर पायाचा आवाज येतो. त्या डाकूला उडवायला अमिताभ वॅगनमधे जमिनीवर आडवा पडून वरती गोळी मारतो. नंतर त्याचे काय झाले ते पाहताना वेगात चाललेली मालगाडी व त्यामुळे "मागे" पडणारा डाकू. तसेच शेवटी धर्मेन्द्र सर्वांना "चुन चुन के" मारायला जाताना मोठ्या खडकावर उभा असलेल्या एकाला गोळी मारतो. तो तेव्हा भरधाव घोड्यावरून जात असल्याने तो तेथून पुढे गेल्यावर वरचा डाकू खाली पडतो. 'शोले' कितव्यांदा पाहताना या गोष्टी जाणवू लागल्या ते आता लक्षात नाही, पण काय जबरी एडिटिंग आहे असे तेव्हा आम्ही म्हणायचो.

बांध (जातीचा)

Submitted by अ. अ. जोशी on 5 November, 2013 - 09:24

***** खाली लिहीलेली कविता कोणताही आकस मनात ठेवून लिहीलेली नाही. तरी कृपया वाचतानाही तशीच वाचावी.

राही आल्याड भुकेला तसा पल्याडही आहे
फक्त बांधावरल्यांना मेवा मिळणार आहे

द्रोणा माहीत नव्हते पुढे काय होणाराहे
कोण्या एका चुकीसाठी जग थुंकणार आहे

जर माहीत असते वाद होईल जातीचा
अंगठा श्रीकृष्णानेही दिला असता स्वतःचा

भर सभेत विवस्त्र ज्यांनी द्रौपदीस केले
सामाजिक आंधळ्यांना कसे नाही ते दिसले

कर्णासाठी भांडतात कोणी आजी- कोणी माजी
एकातरी कर्णासवे त्यांनी खाल्ली पुरीभाजी?

शिव्या देऊन जाहल्या ज्यांच्या देवासही साऱ्या
लाळ-घोटेपणाने का माथा टेकती भिकाऱ्यां?

आंध्रप्रदेशातील मंदिर

Submitted by सचिन पगारे on 3 November, 2013 - 06:40

आंध्र प्रदेशात सोनिया गांधी ह्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे त्यात सोनियाजींचा फोटो लावून दररोज नियमित पूजा केली जाते. सोनियाजींमुळेच तेलंगाना राज्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे तेलंगणातील जनतेला त्यांच्या बद्दल खूपच आदर वाटतो व ते सोनिया गांधीना यांना देवी मानतात.

तर अखंड आंध्रच्या समर्थकांनी स्व इंदिराजींचे स्मारक उभारले आहे. या मंदिराचे गेल्या रविवारी २६ तारखेला करीम नगर येथील तेलंगाना चौकात उद्घाटन झाले .या मंदिराच्या शेजारीच इंदिराजींचा पूर्णाकृती पुतळा आहे..

विषय: 

फटाकेमुक्त दिवाळी

Submitted by प्रकाश घाटपांडे on 26 October, 2013 - 08:12

दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी.

ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 October, 2013 - 09:44

''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''

''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''

अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्‍या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.

Pages

Subscribe to RSS - समाज