या आधी लिहिलेल्या कवितेत काही बदल सुचले..
वयाच्या त्या एका टप्प्यावर
जेव्हा लागते आयुष्य उतरणीला
व्यवहारी जगही लागते आता
हळूहळू सोईस्कर दूर जायला
मी वाट पहात असतो
कुणा भेटीची; सखा, आप्तेष्टांची
अशात फोन खणखणतो
कुणी तरी अनाहूत असतो
मोहरते माझे विद्ध मन
धन्य झाला आजचा दिन
कुणातरी आली आठवण
क्रेडिट कार्ड घ्या तो म्हणं
म्हणे वार्षिक शुल्क नाही काही
आहे अॅडऑन कार्ड बायकोलाही
मी उत्तरलो
ही ऑफर घेऊ कुणासाठी
आता कुणीही नाही पाठी
तशीही आता नाही ऐपत
म्हातारपणी कुठली पत
गज़लकार इलाही जमादार यांच्या गज़लांनी प्रेरित होऊन मी मराठी गज़ल चे पहिले धडे गिरवले. अर्थातच इलाही माझे अतिशय जवळचे मित्र बनले व अजूनही (जरी आम्ही वर्ष-दोन वर्षातून एखाद्याच वेळी भेटत असलो तरी) आहेत.
इलाही यांचे पहिले पुस्तक 'जखमा अशा सुगंधी' छापून झाल्यावर त्यांनी मला भेट दिले होते. त्यातली एक गज़ल मला खूप आवडायची. तिचा मथळा होता:
'आकाशाला 'भास' म्हणालो, चुकले काहो?
धरतीला 'इतिहास' म्हणालो, चुकले का हो?
विशेषत: त्यातला एक शे'र वाचून मला नेहमी वाटायचे की इतक्या उच्च पातळीचे शे'र मला रचता आले पाहिजेत. तो शे'र असा:
प्रसंग पहिला, स्थळ, नवीन पनवेल, सुखापुर.
काल सकाळी व्हॉटस अॅप वर बायकोला तिच्या मैत्रिणीचे मेसेजेस आले त्यात तिने आम्हाला उद्देशुन सतर्क राहायला सांगितल, विषय होता तिच्या घरी झालेल्या घरफोडी बद्दल. तब्बल सतरा तोळं सोनं आणि काही रक्क्म घर फोडुन चोरांनी पळ काढला होता.
त्यानंतर तिला केलेल्या कॉल मधुन सविस्तर कळालेला व्रुत्त्तांत असा. "घरात ते तिघेच रहातात. ति, तिचा नवरा आणि त्यांची लेक. त्या मैत्रीणीचा वाढदिवस असल्यामुळे ते सहकुटुंब लोणावळ्याला फिरायला गेले असताना हा प्रकार घडला.
दर दुसर्या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्याच्या फोनवरून कितीसे बोलणार..
आमच्या घरी झालेल्या चोरीबददल माहिती काढणे आणि पुरावे शोधणे यासाठी मुंबई - नवी मुंबईतील विश्वासू आणि प्रामाणिक खाजगी गुप्तहेर व्यक्ती / संस्थांची माहिती हवी आहे.
माबोवर कुणी कधी खाजगी गुप्तहेराची मदत घेतली असल्यास तुमचे अनुभव लिहा.
सरकार प्रमाणीत (govt approved or registered) खाजगी गुप्तहेर असतात का? असल्यास त्यांची यादी कुठे बघावी?
Double Cross करण्याचा धोका किती असतो? फसवले गेल्यास ग्राहक कायद्यानुसार दाद मागता येते का?
असे खाजगी गुप्तहेरामार्फत माहिती काढणे / पुरावे गोळा करणे भारतात कायदेशीर आहे का?