मागच्या एका आठवड्यात लेकीच्या शाळेचा (इयत्ता चौथी) शेवटचा दिवस होता. त्यानंतर सुट्ट्या आणि परीक्षा सुरू होणार होत्या. शेवटचा दिवस म्हणजे त्या वर्षापुरते मित्रांचा निरोप घ्यायचा. म्हणून शाळेच्या गणवेषाऐवजी छान नवीन कपडे घालायला परवानगी होती. पोरगी शाळेत जाताना उत्साहात होती. परत आली ते हातात एक कागद नाचवत आली. पगाराचा चेक जसा देवासमोर ठेवतात तसे तो कागद माझ्या हातात ठेवला. कारण आपला बाप आठवणी जतन करायला त्यांचा फोटो काढून ठेवतो हे तिला माहीत आहे. आणि ईथे मुळात तो कागदच आठवणींचा होता.
परतलात सारे घाई-घाईनं
सोडून माझ्यासाठी मागे
पावलांच्या ठश्यांचा निर्जीव कळप.
मी काही मागे येणार नव्हतो,
तुमचा माग काढत
इच्छाही नव्हती, की तुम्ही यावं परत.
फक्त इतकंच वाटलं होतं,
की त्या कोपर्यावरून अखेर जाताना
पहाल एकदाच मागे वळून.
द्याल सारेजण निरोप
निदान हात हलवून.
- पण तुमचे पाय बांधलेले होते
घड्याळाच्या हातांना....
"हणम्या, जरा चहा पाण्याचं बघ! दिवस हातभर वर आलाय. ऊन तापायच्या आधी रानात खेटा मारायचाय!"
हानाम्याने लगबगीने मालकाच्या पुढ्यात, लाल भडक तांब्याचा लोटा अन तांब्याचाच वीतभर उंच पेला ठेवला. पुन्हा घरात फेरी मारून, ताज्या दुधाचा, विलायची-अद्रक घातलेला, वाफाळलेला चहाचा कप आणला.
नमस्कार माबोकरांनो! किती दिवसांपासून मी आजच्या दिवसाची वाट पाहत होते, तो आजचा दिवस उजाडलाच. काहीशी हुरहुर, उत्साह मनात घेऊनच आजच्या दिवसाची तयारी मी केली. सार्या गोड कटू आठवणींचं गाठोडं घेऊन पुढे जायचंय. आयुष्याचं एक पान संपल्यातच जमा झालंय. हे पान म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नकळत्या वयात येणारं नि नकळतच निघून जाणारं शालेय जीवन. होय, यंदा मी दहावीत आहे. शेवटचं शाळेचं वर्ष. आज आमच्या शाळेचा निरोपसमारंभ पार पडला . आज माझ्या खूशीचं कारण होतं की शाळेला आमच्या वर्गातर्फे मी शाळेवर केलेल्या कवितेची फ्रेम एक आठवण म्हणून देणार होतो. हे आम्हाला सर्प्राईज द्यायचं होतं शाळेला.
नमस्कार मायबोलीकर... बर्याच दिवसांनी लेखनाचा प्रयत्न करतो आहे. या आधी निरोप या कथेचे 3 भाग टाकले पण नंतर मायबोलीचा परवली शब्द विसरल्यामुळे जमले नाही. आता राहिलेला भाग पोस्ट करतोय....
खरे तर शाळेला निरोप देताना मनाची स्थिती त्यावेळी जी झाली होती ती आता होणे शक्य नाही, पण कथा अपूर्ण ठेवणं मला आवडत नसल्याने हा भाग लिहून कथा पूर्ण करतो.
______________________________________________
" खरेच या मुलांच्या प्रेमाला तोड नाही. यांनी दिलेल्या भेटीपेक्षा मनातली भावना आणि यांचे शिक्षकेतर कर्मचार्यांवरील प्रेम खरंच खुप श्रेष्ठ आहे... मला अभिमान वाटतो की मुलांनी दिलेल्या शिकवणीच
देणे - एक कला...
अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते.
देणे ही एक कला म्हणून पाहू जाता -
सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश. ती वरिष्ठांची जागीर, तो संतांची वचने, कवने, संस्कृत श्लोकातून खडाखड देता येणे ही कला.
तुझा निरोप घेऊन
तीनदा 'येतो गं' म्हणून
जड पावलांनी मी निघालो
हळूच माझ्या मागे येऊन
खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस...
"मी आहे!"
पाठ वळताच भयाण पोकळी जाणवू लागली
तुझ्याविना जगाची तसवीर मला भिववू लागली
जलतरंगाचा नाद व्हावा असा तुझा आवाज
पुन्हा कधी ऐकायला मिळेल
असं वाटू लागलं, तेव्हा
फोन आलाच तुझा, म्हणालीस...
"मी आहे!"
घरी आलो, अगतिकपणे बसलो खिडकीत
गाडी सुटली असेल का तुझी, असा खिन्न विचार करत
श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर
धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली
तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..."
वाटलं कळवावं का तुला,