आज मी मोकळा आहे जरा. त्यामूळे निव्वळ टाईमपास म्हणून हे लिहितोय. यात (नेहमीप्रमाणेच) काहि फार महत्वाचे नाही. त्यामुळे दिवे, कंदील, काजवा किंवा थेट सूर्यप्रकाश घेऊनच वाचा.
माझ्या लहानपणी, काही नाटके विंगेतून बघायची संधी मिळाली होती. त्यावेळी असे दिसायचे कि मराठी नाटकात जे खाण्यापिण्याचे, सॉरी जास्त करुन खाण्याचेच, (आणि पिणे असेल तर तो चहाच ) जे प्रसंग असत, त्यात क्वचितच ते पदार्थ असत. आपले थोर नाट्यकलाकार निव्वळ अभिनयातून तो पदार्थ साकार करत असत. अपेय पिण्याच्या बाबतीत काही थोर कलाकार मात्र अभिनयात जिवंतपणा यावा म्हणून, अस्सल पेयाचाच आग्रह धरत असत.. पण तो काही माझा प्रांत नाही.
ह्ल्ली अनेकदा मला आपण पुण्यात रहात असल्याचा भास होतो. पुणेकर कलेच्या बाबतीत जरा 'elitist' असतात, तसेच बे एरियातही आता आढळुन येतं. निव्व्ळ मनोरंजना पेक्षा विचारंना चालना देणार्या कलाकृती इथल्या रसिकांना जास्त प्रीय असतात. 'कला' च्या 'समीप रंगमंच' चा दुसरा प्रयोग त्याच पठडीतला.
समीप रंगमंच म्हणजे 'theater-in-a-room'. कमीतकमी props/नेपथ्य वापरुन नाटके सादर करायची. त्यामुळे यात मोठे सेट्स, मेकप वगैरे फार काही
नसतं. थोड्क्यात, मैफिल का अंदाज आणि नाटकाचा बाज. अशा वातावरणात गेल्या शनिवारी, 'छुनेसे प्यार बढता है' आणि 'स्वामी', समीप रंगमंच च्या उपक्रामात 'कला' ने सादर केल्या.
नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता
सोडा हातातल्या हाता नाथा आता
हातातल्या हाता
अहो सोडा हातातल्या हाता नाथा
हातातल्या हाता ||धृ||
मनाचीये गुंत्यामधे
होssओssहोssओ
मनाचीये गुंत्यामधे
नका अडकू आता नाथा
सोडा हातातल्या हाता ||१||
आले जरी दुरवरूनी
आssआssआssआss
आले जरी मोहीम करूनी
का बळेची ओढता
नाथा आता
सोडा हातातल्या हाता ||२||
सासू सासरे दिर जावा
हंssअंssअंssअंss
सासू सासरे दिर जावा
बोल बोलतील असे एकांती पाहता
नाथा आता

बरेचसे चित्रपट नाटके सहजपणे काळाच्या पदद्याआड जातात. साधारण एक वर्षानंतर चित्रपट साफ विसरले जातात. अनेक वर्ष लोकांना आठवतात. लोक पुन्हा आवर्जुन पहातात असे फारच थोडे चित्रपट व नाटके असतात.
चित्रपट पुन्हा पहायला काहीच अडचण नसते. ज्यांना चित्रपटगृहातच जाऊन चित्रपट पहायचे असतात त्यांच्यासाठी सदाबहार चित्रपट पुन्हा पुन्हा येत रहातात. आजकाल सी.डी./डी.व्ही.डी च्या युगाततर हा पर्याय आणखीनच सोपा झालाय.
सूर्याची पिल्ले --- नाटक तसं जुनच. वसंत कानेटकरांनी लिहिलेलं.
१. ५ एप्रिल १९७८ साली "धी गोवा हिंदु असोसिएशन" प्रथम रंगमंचावर आणलेलं. दिग्गज कलाकारांनी रंगवलेलं. नुसती नावं जरी घेतली तरी कल्पना येते. माधव वाटवे, बाळ कर्वे, दिलिप प्रभावळकर, मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर, शांता जोग इत्यादी इत्यादी.
२. व्हीसीडी च्या जमान्यात याच पुर्वीच्या संचात थोडेफार फरक करून सर्वांपर्यंत पोहोचलेलं हे नाटक. कानेटकरी विनोदाची एक वेगळीच मांडणी आणि जातकुळी सांगणारं हे नाटक. काळ बदलला तरी संदर्भ फारसे न बदलल्यामुळे ताजं वाटणारं.
दोन चार दिवसांपूर्वी योगेश२४ नावाच्या मायबोलीकराने 'गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी) या विषयावर लिहिताना बालगंधर्वांच्या संदर्भात श्रीराम रानडे यांनी लिहिलेल्या एका लेखाचा उल्लेख केला होता.
http://www.maayboli.com/node/16889?page=6
माझ्या माहितीच्या काही मंडळींनी ' हे तुझे बाबा का गं' अशी विचारणा केली आणि या मालिकेतले इतर लेख वाचायची इच्छाही व्यक्त केली.
मराठी विश्व नाट्य संमेलनाचं औचित्य साधून गेल्या ३ महिन्यात माझ्या वडिलांचे नाट्यविषयाशी निगडीत असलेल लेख लोकसत्ता मधे प्रसिद्ध होत होते/आहेत.
श्री. विजय तेंडुलकर नक्की कसे होते, हा एक अतिशय अवघड प्रश्न. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुपेडी होतं की खरे तेंडुलकर कसे होते, हे समजून घेणं खूप कठीण आहे. नाटककार म्हणून जागतिक ओळख असलेल्या तेंडुलकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका ही माध्यमं लीलया हाताळली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दृक्-श्राव्य विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.