हाकालपट्टी,...
कुणा-कुणाकडून काही गोष्टी
स्वत:पासुनच भटकू शकतात
कुणा-कुणाच्या काही गोष्टी
कुणा-कुणाला खटकू शकतात
मात्र भटकणारे अाणि खटकणारे
कधी गट्टीत,कधी कट्टीत असतात
अन् आपले वाटणारेही वेळेप्रसंगी
कधी-कधी हाकालपट्टीत असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
स्वभावी बाणे,..
मवाळवादी बाणा कधी
जहालपणे वागुन बघतो
तर कधी जहालपणाही
मवाळतेला भोगुन बघतो
जहाल आणि मवालसुध्दा
एकमेकांत ओघळू शकतात
जशी वेळ येईल तस-तसे
स्वभावी बाणे बदलु शकतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
पाठिंब्याच्या आशा,...
पाठिंबा देण्या-घेण्यासाठी
मना-मनामधुन गळ असतो
पाठिंब्यात मिळालेला आधार
जणू उम्मेदिचं बळ असतो
कधी इतिहासाच्या पाऊलखुणा
वर्तमानात पहूडलेल्या असतात
अन् पाठिंब्याच्या आशा मात्र
मना-मनात दडलेल्या असतात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सन्मान,...
चांगले काम करण्याच्या
प्रत्येकाला संधी असतात
अन् प्रत्येकाच्या कार्याच्या
इथे सर्व नोंदी असतात
त्यांच्या सत्कार्याचा भाग
देशाचीही शान होतो
अन् प्रत्येकाच्या सत्कार्याचा
सन्मानानं सन्मान होतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कटू सत्य
भारतीयांच्या पराभवानं
कुणी अश्रु ढाळतो आहे
तर खेळाडूंना दोष देत
कुणी शाब्दिक छळतो आहे
मात्र हार असो की जीत
संयमानं रूचवावं लागतं
अन् विजयाच्या आनंदापरी
हरल्याचं दु:खही पचवावं लागतं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
हार-जीत,...
जिंकण्याची आशा जरीही
मना-मनात हेरलेली असते
मात्र कुणाचीही हार-जीत
खेळामध्ये ठरलेली नसते
कधी न जिंकणाराची काया
कधी बदलली जाऊ शकते
तर जिंकणाराचीही खेळामध्ये
अवचकलीनं हार होऊ शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
हार-जीत,...
जिंकण्याची आशा जरीही
मना-मनात हेरलेली असते
मात्र कुणाचीही हार-जीत
खेळामध्ये ठरलेली नसते
कधी न जिंकणाराची काया
कधी बदलली जाऊ शकते
तर जिंकणाराचीही खेळामध्ये
अवचकलीनं हार होऊ शकते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
राष्ट्रउभारणी ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. राष्ट्राच्या निर्मितीनंतर राजकीय धोरणे, आर्थिक स्थैर, परराष्ट्रीय संबंध ह्याच बरोबर सामाजिक जडणघडण सुद्धा योग्य दिशेने होणं अतिशय महत्त्वाचं असतं. राष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत जी वेगवेगळी क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यातील एक म्हणजे क्रीडा क्षेत्र. क्रिडाक्षेत्रातला सहभाग आणि यश हे देशातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतं, देशाला स्वतःची एक ओळख मिळवून देतं आणि एकीची, राष्ट्रीयत्त्वाची भावना रुजवतं.