चित्रविचित्र गोष्टींचा नाद असणारी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात आणि त्यांच्या त्या विक्षिप्तपणातूनअनेक नवे नवे अनुभव आपल्याला येऊ शकतात. नाकासमोर बघून चालना या लोकांना मान्य नसतं. अशा लोकांबरोबर घालवलेले काही क्षण सुद्धा साधा सरळ जीवन जगणाऱयांना विलक्षण वाटू शकतात. इद्रिस नावाच्या या विचित्र माणसाबरोबर मला मिळालेले दोन दिवस माझ्यासाठी अतिशय वेगळ्या विश्वातले अनुभव देऊन गेले.
काही माणसं जन्माला येताना चिरतरुण म्हणूनच जन्माला येत असतात. त्यांचं पान पिकलं तरी देठ हिरवाच राहतो आणि काहीही झालं तरी त्यांच्यातला ' स्वप्नाळू रोमँटिक' तरुण शिळा होतं नाही. ही माणसं जातील तिथे 'प्रेमाचा वर्षाव' करण्यात मग्न असतात. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला असा एकमेव महाभाग म्हणजे माझ्याबरोबर माझ्याच ऑफिस मध्ये काम करणारा इमाद.
जगाच्या पाठीवर आज अनेक देशांतून राजे-राजवाडे नामशेष झालेले असले, तरी लोकांच्या मनात आपल्या जुन्या राजांबद्दलचा आदर आणि भीतीयुक्त दरारा कायम आहे। अनेक देशात आज सुद्धा असे नामधारी राहिलेले राजे आपल्या जुन्या वैभवाच्या स्मृती उगाळत आणि स्वतःच्या कुळाचा राजेशाही इतिहास जोंबाळत आयुष्य जगायची धडपड करताना दिसतात। आरशासमोर उभा राहिल्यावर स्वतःच्या डोक्यावर अदृश्य मुकुट बघायची आणि साध्या लाकडी खुर्चीवर बसतांना २४ कॅरेट सोन्याच्या सिंहासनावर बसायच्या ऐटीत बूड टेकवायची सवय जरी पिढ्यानपिढ्या चालत आलेली असली, तरी वस्तुस्थितीत दोन वेळच्या जेवणाची ददात असलेली ही राजे मंडळी अनेकांच्या थट्टेचा विषय झालेली अ
वाळवंटात केवळ ३०-४० वर्षांमध्ये स्वर्ग उभारला जाऊ शकतो, यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच...पण दुबईमध्ये या चमत्काराची प्रचिती पावलोपावली येते. 1971-72 साली शेख झाएद नावाच्या द्रष्ट्या आणि नेमस्त वृत्तीच्या मनुष्याने आजूबाजूच्या टोळ्यांना एकत्र आणून यूएई नावाचा देश जन्माला घातला आणि बघता बघता या देशातल्या सात अमिरातींनी जगाच्या नकाशावर आपला नाव कोरलं. या देशाच्या जगात सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या शहरामध्ये - दुबई मध्ये - पर्यटकांसाठी खास तयार केलेल्या स्थानिक आकर्षणांपैकी एक म्हणजे वाळवंटातली ' सफारी'.
' आमच्या काळात' असं नव्हतं हे चाळीशी यायच्या आत बोलावं लागेल असं मला कधीही वाटलं नव्हतं , पण माझ्या मुलीला शाळेत घातल्यावर त्या शाळेचे जे जे अनुभव मला येत होते ,ते वारंवार अशा पद्धतीची तुलना करायला मला भाग पाडत होते. जग अतिशय वेगाने बदलत आहे , याचं हे एक उत्तम उदाहरण होऊ शकेल. आमच्या वेळी धीम्या वेगाने प्रगती होत असल्यामुळे आमच्या शाळा ८-१० वर्षांनी एकदा रंगरंगोटी होऊन कात टाकायच्या. पण आता तर शाळांमध्ये २-३ वर्षातच पुनर्जन्म झाल्याइतका बदल जाणवायला लागतो, ही प्रगती खरोखर थक्क करणारी आहे.
‘हरिश्चंद्रगड’ व्हाया ‘गणेश दरवाजा’
लोणी भापकरचा यज्ञवराह
नुकताच काही कामानिमित्त लोणी भापकर (मोरगावजवळ) गेलो असता तेथील मध्ययुगीन काळातली प्राचीन मंदिरे व जुने वाडे पाहण्यात आले.
लोणी भापकर हे गाव मोरगावपासून अंदाजे ९ किमी वर आहे. भापकर सरदार घराण्याच्या वंशजांचे मूळ गाव.
गावात एक सोमेश्वराचे मंदिर आहे, याला पिवळा ऑईलपेंट रंग दिलेला आहे. तसेच या मंदिराजवळ अनेक वीरगळ आहेत. गावात भापकरांचा प्रचंड जुना वाडा आहे.
लोणी भापकरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ. काळभैरवनाथाचे सुंदर मंदिर गावात आहे.