कमाल!!! अविश्वसनीय!!! काल रात्री जागून पाहिलेल्या मॅच ने अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं. अनेक वर्षांपूर्वी रात्रभर जागून पाहिलेल्या अशाच त्या इडन गार्डन च्या मॅच च्या आठवणी जिवंत झाल्या. भारतीय संघाला, त्यांच्या लढण्याच्या जिगरीला, त्यांच्या विजिगीषू वृत्तीला त्रिवार सलाम!!
सादर कुर्निसात!!
'अरे ओ सांभा, यह रामगढ वाले, अपने बच्चोंको कौनसी चक्की का पीसा आटा खिलाते हैं रे?' - शोले मधे गब्बर सांभा ला विचारतो. ऑस्ट्रेलियन थिंक टँकने शोले बघितला नसेल, पण भारतीय संघाविषयी त्यांना हाच प्रश्न पडला असावा. लहानपणी ती एक जड बुडाची बाहुली पाहिली होती. तिला कितीही खाली पाडा, ती परत वर यायची. जितक्या वेगानं खाली पाडाल तितक्याच वेगानं उसळी मारून वर यायची. ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघ त्या उसळून वर येणार्या बाहुलीसारखा वाटला असावा. किंबहूना जितक्या वेळा ऑस्ट्रेलियाने 'बळेचि केला खाली जरि पोत' तितक्या वेळा ही भारतीय संघाच्या अस्मितेची ज्वाळा उफाळून वर आली.
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटलमध्ये सुपर ओव्हरमध्ये संपलेला क्रिकेटचा सामना तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात येईल की मार्क्स स्टॉइनिसने मयांकच्या देहबोलीवर कसे बारीक लक्ष ठेवले आणि त्याला चूक करायला भाग पाडले. ३ चेंडूंत केवळ १ धाव आणि सामना जवळजवळ मयंकच्या हातात होता. 'मयंक आता चेंडू केवळ पुश करून एक धाव काढतो की चौकार-षटकाराने सामना संपवतो, हे पाहावे लागेल,' असे समालोचक म्हणाला पण तो फटका मारणार हे नक्की, हे त्याच्या देहबोलीत असणाऱ्या आक्रमणाची लक्षणे दिसत होती त्यावरून कोणीही कयास बांधला असता. पहिला डॉट बॉल गेला.
सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया 
आज क्रिकेट मधल्या कॅप्टन कूलाचा वाढदिवस. खरं तर मागे काही दिवसापासून त्याच्या रिटायर होण्यासंबंधी चर्चा
लहानपणापासून मला प्रश्न पडायचा की बीसीसीआय या क्रिकेटच्या मंडळाचा अध्यक्ष एखादा क्रिकेटपटू का होत नाही ?
आज उत्तर मिळाले.
त्यासाठी खेळाडू दादा असावा लागतो !
सेहवाग म्हणतो देर है पर अंधेर नही
सचिन म्हणतो दादाने जी भारतीय क्रिकेटची सेवा केलीय त्याला तोड नाही.
तोच ती ईथेही करणार.
लक्ष्मण म्हणतो दादा तू आम्हाला जिंकायला शिकवलेस तुझ्यापेक्षा योग्य व्यक्ती आणखी कोण..
आजी माझी सर्वच खेळाडूंना आनंद झाला आहे.
ते दिवस अनेकांना आठवत असतील. भारताच्या संघाचा बकरा करण्याच्या ठराविक पद्धती होत्या - परदेशातील विकेट्स, स्पीड, स्विंग, बाउन्स, स्लेजिंग, माइंड गेम्स. विशेषतः परदेशातील दौर्यांमध्ये, पण कधीकधी भारतातही. कधी नुसत्या वेगावर, कधी बाउन्सर्सनी जखमी करून, तर अनेकदा पत्रकार, जुने खेळाडू यांच्यापासून ते संघाचे मॅनेजर, कोच यांच्यापर्यंत अनेकांनी संघाला कमी लेखणारी विधाने करून खेळलेल्या माइंड गेम्स.
विश्वकप आता 'करो या मरो' फेरीत येऊ ठेपला आहे. अपेक्षेप्रमाणे बाद फेरीचे चारही संघ निश्चित झाले आहेत.
अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला पुन्हा एकदा ईंग्लंडशी लॉर्ड्स मैदानावर होण्याची बरीच शक्यता आहे.
साखळी फेरीतल्या आपल्या संघाच्या सगळ्या डिपार्टमेंटमधल्या कामगिरीवरून आणि खासकरून ईंग्लंड विरूद्धच्या पराभवावरून धडा घ्यायचा झाल्यास आगामी सामन्यासाठी भारतासमोर नक्कीच बरीच आव्हाने ऊभी आहेत. त्यातल्या काहींचा ऊहापोह मी ईथे करू ईच्छितो.
आमची क्रिकेट पाहायला सुरुवात 1993 मधली... याच वर्षी भारताने वेस्ट इंडिजला हीरो कप च्या अंतिम सामन्यात हरवलं होतं. त्यानंतर थेट 1996 च्या विश्वचषकात क्रिकेटची आणि आमची गाठ पडली. हा विश्वचषक आहे तसा आठवणीतलाच. श्रीलंकेचा क्रिकेटमधली एक नवी शक्ती म्हणून याच वर्षी उगम झाला. शिवाय केनियाची एन्ट्री ह्याच विश्वचषकातली. उपांत्य सामन्यामध्ये श्रीलंकेकडून झालेली आपली हार कायम लक्षात राहील अशीच होती. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झालेली होती आणि या विश्वचषकाच्या पराभवानंतर खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेट संघ बांधायला सुरुवात झाली.