नैनिताल सरोवर, नैनादेवी मंदिर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत प्राणिसंग्रहालय, रज्जूमार्गाने वर जाऊन दुर्बिणीतून दूरदर्शन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे नैनिताल गावात आहेत. सारीच स्थळे उत्तम आणि जरूर पाहावीत अशी आहेत. सरोवरातील वल्ह्याच्या नौकेतून मारलेला सुमारे तासभराचा फेरफटका तर अविस्मरणीय. आम्ही सर्वच गोष्टीत खूप रस घेतला. प्राणीसंग्रहालय तर आम्हाला बेहद्द आवडले. तिथून बाहेर पडल्यावर आमच्या बसमधील सर्व मुलांनी, मग पोलिसचौकीसमोर एका ओळीत उभे राहून पिपाण्या फुंकत आपला आनंद व्यक्त केला.
गेल्या भागात उत्तराखंडातील इतक्या वनस्पती पाहिल्या पण एक कळीची वनस्पती राहूनच गेली. आम्हाला मात्र संपूर्ण प्रवासात इथे तिथे सर्वत्र ती दिसतच राहिलेली होती. सदाहरित आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची.
मोगर्याच्या झाडासारखेच हिरवेगार, बुटके झुडूप. मुळात हिरव्या-पोपटी रंगाच्या कळ्यांचे झुपके, फुलत फुले मोठी होतात तसतशी पांढरी होऊ लागतात, नंतर उमलत विकसत जात असता त्यांना निळी जांभळी छटा चढू लागते. अशा सर्व अवस्थांतले गुच्छ बाळगणारे झुडूप मग खूपच देखणे दिसू लागते. ह्या झुडुपाला म्हणतात हायड्रन्झिया.
उत्तराखंड हिरवागार आहे. असंख्य वनस्पतींनी सदाबहार सजलेला असतो. त्यातील काही निवडक वनस्पती, ज्या मला विशेष वाटल्या आणि ज्यांची प्रकाशचित्रे जरा तरी बरी काढू शकलो आहे ती इथे देत आहे. मला जाणीव आहे की हल्ली जी प्रकाशचित्रे पेश केली जात आहेत, त्यांच्या मानाने ती कदाचित एवढी उल्लेखनीय नसतीलही पण प्रातिनिधिक आहेत.

ऑगस्ट क्रांती राजधानी
मी आजवर कुठल्याच राजधानी गाडीने कधीही गेलेलो नव्हतो. विमानात मिळते तशी खानपान सेवा मिळते हे ऐकून होतो. आमच्या प्रवासाकरता जलद आणि स्वस्त उपाय शोधत ऑगस्ट क्रांती राजधानीच्या निवडीप्रत पोहोचलो होतो. मात्र, रेल्वेचे आरक्षण मिळाल्याशिवाय सहल निश्चितच करायची नाही हे पक्के असल्याने, आधी जाण्यायेण्याचे आरक्षण केले आणि ते चांगलेच झाले. वस्तुतः सचिनतर्फे, आरक्षण करून देण्याचे मुळीच पैसे घेणार नव्हते. पण ज्यांनी ते सचिनतर्फे केले त्या अनेकांना प्रतीक्षा यादीवर राहण्याची पाळी आली. काहींनी मग विमानाने जाणे पत्करले. म्हणून आम्हाला आमच्या निर्णयाचा खूप आनंद झाला.
राजकीय अवस्था
९ नोव्हेंबर २००० रोजी, भारतीय प्रजासत्ताकाचे २७ वे राज्य म्हणून उत्तरांचलाचा जन्म झाला. तात्पुरते दिलेले उत्तरांचल हे नाव जानेवारी २००७ मध्ये बदलवण्यात आले आणि मग आजचे उत्तराखंड हे राज्य निर्माण झाले. ते दोन भागांत वसलेले आहे. वायव्येला गढवाल आणि आग्नेयेला कुमाऊँ. गढवालमध्ये हरिद्वार, डेहराडून, उत्तरकाशी, चामौली, रुद्रप्रयाग, टिहरी आणि पौडी हे सात जिल्हे आहेत. तर कुमाऊँमध्ये उधमसिंगनगर, नैनिताल, अलमोडा, बागेश्वर, पिथौरागड आणि चंपावत असे सहा जिल्हे आहेत. डेहराडून हे राजधानीचे शहर आहे [१].
आम्ही येत्या पावसाळ्याच्या सुरूवातीला अथवा शेवटी केरळ फिरण्यासाठी जात आहोत. सध्या मी मंगरूळात असल्याने आम्हाला इथून कार घेऊन निघणे (आणि त्यात मल्लू ड्रायव्हर घेणे) जास्त सोयीस्कर पडणार आहे.
मला प्लीज कुणी म्हैसूर शहरातील पब्लिक ट्रन्स्पोर्ट विषयी माहिती देउ शकेल का? शिवाय अॅज टुरिस्ट हे शहर छान पहाण्यासाठी किती दिवस पुरेत ?
कार फॅक्स रिपोर्ट मध्ये अॅक्सीडेंट दाखवलेली गाडी घेणे कितपत ठिक आहे? विकताना अडचण येउ शकते का?मालकाचे म्ह्णणे आहे की बंपर बदलायला लागला होता.
कोकणासाठी हवी जलवाहतूक
कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.