सर्वत्र कोरोनाच्या चर्चा सुरू असतानाही काल एका वेगळ्याच, अनपेक्षित व त्यामुळे धक्कादायक असलेल्या एका बातमीने लोकांची झोप उडाली. खरे तर अशा घटना कुठेकुठे अधूनमधून होत असतात, पण या घटनेची मात्र जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या, संशयाचे वारेही वेग घेऊ लागले. नेमके याच काळात, जेव्हा सारे लक्ष एखाद्या संकटाचा सामना करण्यावर केंद्रित झालेले असतानाच असे कसे घडले असेही अनेकांना वाटून गेले. त्यावरही कडी म्हणजे, या घटनेत नेमके काय नष्ट झाले असा, जुन्या घटनेत अधोरेखित झालेलाच सवाल पुन्हा एकदा पुढे आला.
व्हॉटसअॅप,फेसबुक,ट्विटर,मिपा आणि अशी अनेक आंतरजालीय समाजमाध्यमे जिथे चर्चा करता येते; ती बहुतांशी वेळा देशाच्या,राज्याच्या राजकारणावरील चर्चेने अोसंडून वाहत असतात.अगदी काही वेळा वैताग येईल इतका इतका वेळ अशा चर्चांवर दिला जातो.आपला आवडता पक्ष,आवडता नेता हाच आख्ख्या भारतात किंवा राज्यात कसा चांगला आहे.तोच कसा जनतेला सर्वाधिक चांगला न्याय देऊ शकतो यावर अटीतटीने मुद्दे मांडणं सुरु असतं.समोरचा आपला मुद्दा मान्य करत नाही हे बघून काहीजणांचा तोल ढळतो; मग नको त्या शब्दांत किंवा वैयक्तिक जीवनातील गोष्टींचा उद्धार करुन नामोहरम करण्याचाही प्रयत्न होतो.आवडता पक्ष,नेता हरला की राग,संताप होतो.यावरुन कोणी
मतदार हुशार झालेत ?
दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.
आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.
घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?
नाटक अणि राजकारण हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण मानले जाते। राजकारणातील नाट्य ( युती अणि आघाडीचे यशश्वी खेळ) मागचे ४ ते ५ महिने पूर्ण महाराष्ट्रने पाहिले। अस्सल नटाला लाजवतील अशा भूमिका आपल्या पुढाऱ्यांनी वटविल्या। युतीचा काडिमोड़ , आघाडीचे मनोमिलन , वैयक्तिक महत्त्वकांक्षा , रूसवे -फुगवे असे रहस्य पटाला(Suspense Thriller) लागू होणारे सर्व काही त्यात होते। साहजिकच ती मोहिम फत्ते झाली असल्यामुळे कदाचित पुरोगामी मंडळी आलेला शिणवठा घालविण्यात मग्न आहेत।
"इतिहास, राजकिय आणि नैतिकदृष्ट्या"
(History ,Political And Ethically )
प्रथमतः २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नविन विचारवंताना व सदस्यानां हार्दिक शुभेच्छा....
हॉटेल शिवीभोजन थाळी
मालक: हॅ हॅ हॅ.
मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्हाईक आलं.
हॅ हॅ हॅ या या या.
बसा बसा बसा.
मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्हाईकाला काय लागते ते पुस.
हॅ हॅ हॅ.
मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय?
अजित पवार, शरद पवार इडीची नोटीस मिळताच चांगलेच शॉक मध्ये गेले होते. इडीची भिती दाखवून भाजपा काका पुतण्यावर अंकुश ठेवू शकली असती.
परंतु शिवसेनेला शह देण्याच्या नादात अजित पवारांना पावन करुन घेतले.
अजित पवारांनी पलटी मारल्यानं हातची सत्ताही गेली. आता इडीचा वापर करणं बरं दिसणार नाही. किंवा भाजपला अजित पवार परत भुकंप घडवतील ही ( वांझोटी) आशा असावी.
अगोदरच अजित पवारांशी हात मिळवणी केली नसती तर इडीसारख्या यंत्रणा वापरुन भाजप काकांवर अंकुश ठेवू शकली असती. भुजबळ, अशोक चव्हाण यांच्या सारख्यांना सत्तेपासून दूर ठेवता आले असते.
पण भाजपची गोची झाली आहे असे मला वाटते.
2020 ला फेब्रुवारीत दिल्लितल्या निवडणुका होणार आहेत. ह्या निवडणुकात मोदी विरुध्द केजरीवाल असा सामना रंगणार आहे.
मागच्या निवडणुकीत केजरीवाल यांनी भाजपला चांगलाच धोबीपछाड दिला होता..एकेक सिट लढताना भाजपची दमछाक झाली होती शेवटी कशाबशा तिन सिट जिंकण्यात त्यांना यश आले..७० पैकी ३ सिटवर कसाबसा विजय मिळाला तर ६७ आमदार निवडुन येउन केजरीवाल यांनी दिमाखदार व दैदिप्यमान असा विजय साकारला.
सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे मात्र भारताची राजधानी दिल्लित केजरीवालांचे राज्य आहे. हे म्हणजे 'गावभर नाव पण घरात नाही भाव' असाच प्रकार आहे..
फिटेल का हे ऋण माझे
विवंचना आत दाटली
याच काळजीने मीच माझी
वर जागा शोधली
रोप मीच लावले
बघून स्वप्न उद्याचे
काय ठावं , याच जागी
इथेच सुळी चढायचे
रोज रोज तोच सूर्य
तीच आग ओकतो
रोज रोज मीच का पण ?
तेच तेच भोगतो
मीच जर का अन्नदाता
रिक्त का रे चूल माझी ?
घेतला नांगर हाती
हीच का रे भूल माझी ?
ऐकतो सरकारनामे
अभय कर्जांना दिले
फासली पाने पुन्हा ती
भाव तैसेच राहिले
================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर