माफ करा. नमनाला मूठभर तेल न घालता थेट विषयावर येत आहे.
दक्षिणेचे सिनेमे बघताना दोन दशकाच्या आधी लक्षात आलेली गोष्ट म्हणजे त्यांचे साचे आहेत. त्याच साच्यात नायक बदलून गोष्ट सांगतात. पण साचा बदलत नाहीत. यातल्या काही साच्यांबद्दल अजिबात आक्षेप नाही. साच्यातला असूनही काही काही चित्रपट ठसठशीत बनतात. दक्षिणेच्या प्रेक्षकाला साचेबद्ध चित्रपट अंगवळणी पडलेले असतात, त्यामुळं त्याला त्यात वावगं वाटत नाही. तरीही वेगळ्या वाटेवरचे सिनेमे सुद्धा बनतात. त्यातले काही यशस्वीही होतात पण ते आपल्या पर्यंत पोहोचतातच असे नाही.
ज़िहाले मस्कीन - फिल्मी बंजाऱ्यांची चार पाले पडलेली आहेत. सूर्य मावळलाही नाही पण शेकोटी पेटवलेली आहे. राजस्थानी पगडी घातलेला एक माणूस रबाब वाजवायला सुरुवात करतो. वाळवंटात काळे कपडे घातलेली एक बंजारन उठून मान आणि कंबर हलवणाऱ्या बाहुलीसारख्या स्टेप्स करत ख़ालिस उर्दूमध्ये मुखडा गाते. मध्येच ती कथ्थकच्या स्टेप्स करायला सुरुवात करते. आणि हिरॉईन लांब केस मोकळे सोडून बसच्या टपावरून प्रवास करते. नाचणारी बाई अंतरा सुरु झाल्यावर कथ्थक सोडून फ्री स्टाईल डान्स करायला लागते.
नोव्हेंबर मधे मोठे लोक जन्म घेतात.
चाचा नेहरू नोव्हेंबरचे. इंदिराजी सुद्धा नोव्हेंबर मधल्या.
काल फेसबुकावर बॉलीवुड ट्रिवियाच्या एका पेजने 'भली भलीसी इक सूरत' या गाण्याची आठवण करून दिली.
ही चित्रपटसंगीताची एक इन्टरेस्टिंग क्याटेगरी आहे, ज्यात आडवळणाने प्रेमाचा इजहार, किंवा 'कौन है वो दिलरुबा?' या प्रश्नाला 'तू नाही, दुसरंच कोणीतरी' अशा छापाचं उत्तर दिलेलं दिसतं.
काल यु-ट्युब वर ह्या चित्रपटाचे ट्रेलर पहावयास मिळाले. इतक्यात येतोय असे दिसते.
भारताच्या उत्तर-पूर्व भागात ऑफिस कामा निमित्ते प्रवास करतांन्ना ह्या व्यक्तीचे नांव बर्याच जणांकडून ऐकले तेंव्हा परराज्यात आपल्या मराठी व्यक्तीचे नांव ऐकल्याचा अभिमान वाटला होता. तेथील रस्त्यांच्या दर्जाच्या फरकाचा माझा पण अनुभव चांगलाच होता.
नागपुरचेही रस्त्यांचे स्थित्यंतर पाहून एक पुणेकर म्हणून हेवा वाटतो.
चित्रपट अवश्य पाहीन. तुर्तास वाट पाहतोय.....
कॉमेडी, हॉरर, ऍक्शन किंवा मसाला चित्रपटांबद्दल बऱ्याचदा लिहिलं, बोललं जात, चर्चा रंगतात.
या वेळी इमोशनल / भावनावश चित्रपटाची चर्चा करूया.
मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कुठला चित्रपट बघताना कधी रडलायत का?
कुठल्या दृश्याला?
रडणे म्हणजे ओक्सा बोक्शी किंवा डोळे पुसायला रुमाल / tissues लागेल असेच नाही, डोळे भरून येणे किंवा मन हेलावणे हेही चालेल.
"क्लर्क"
मनोज कुमार, रेखा, शशी कपूर, अनिता राज, प्रेम चोपडा, अशोक कुमार, सतीश शहा, दीना पाठक.
सुरूवातीला ही सगळी नावं स्क्रीनवर ओळीनं उमटतायत. बॅकग्राऊंडला "मैंss कलर्क हूॅंss" हे गाणं चाललेलंय.
मनोज संरक्षणमंत्रालयात क्लर्क आहे. प्रामाणिक आहे. वक्तशीर आहे. रोज वेळेआधी कामावर जायचं. मन लावून सिगरेटी ओढायच्या. आणि मग खऱ्या टाईमपासला हात घालायचा. असं साधारण रूटीन आहे त्याचं.
भारतात चित्रपट चालण्याची अनेक कारणे आहेत.
त्यामधे ७० च्या दशकात संवादफेक आणि संवाद लेखन या कारणाची भर पडली. तसेच भावनेला हात घालणारे / हाय व्होल्टेज ड्रामा असलेले काळजीपूर्वक लिहीलेले सीन्स यांचीही भर पडली. कित्येकदा असा सीन क्रमाक्रमाने नाट्य खुलवत नेतो, व्होल्टेज वाढतं तसं काळजाचे ठोके वाढू लागतात आणि यावर वरताण म्हणून एखादा खंग्री डायलॉग येतो (खंग्री शब्द माबोवरूनच उचलला आहे).
एकदा हॉस्टेल वर दोन मुलं रात्री उशिरा आली. सीनियर पोरांनी विचारलं उशीर का झाला?"
त्यातला एक जण म्हणाला "शोले बघायला गेलो होतो"
पुन्हा सीनीयरने विचारलं "का ?"
दुसरा मुलगा म्हणाला " अजून पाहिलेला नाही म्हणून गेलो होतो"
तर त्या सीनीयरने उठाबशा काढायला लावल्या.
म्हणाला " शोले किती वेळा पाहिला एव्हढंच सांगायचं होतं. अजून पाहिला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ?"
तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.
असे अन्य काही हिंदी, इंग्लीश, मराठी सिनेमे असतील तर लिहा.