२०२२ जुलैची एक सायंकाळ -
खंडाळ्याच्या घाटात मेघ मल्हारच्या नादात सरी झेलत अनिकेची विकांताची धम्माल सुरू होती. लाँग राईड वर एकट्यानेच जायला आवडायचं त्याला. मस्त धुवांधार पाऊस, पल्सर आणि एक निसर्गवेडा.
२०२२ जुलैची ती रात्र -
चिंताग्रस्त होऊन सर्वजण डॉक्टरांची प्रतीक्षा करत ओटीच्या बाहेर उभे. ऑपरेशन संपले आणि अनिकेत कोमात गेल्याचे कळल्यावर आई बाबा शून्यात हरवून बसलेले.
दोन दिवसांपूर्वी तो ममा-डॅडासोबत डोंगरामागच्या कुरणात खेळायला आला होता. त्याला इथेच थांब, असे सांगून ममा-डॅडा कुठेतरी गेले होते. दोन दिवसांपासून तो त्यांची वाट बघत होता. आताशा त्याला घराची खूप आठवण येऊ लागली होती. त्याचे छोटेसे घर, मऊ उशी, खेळणी, कपडे आठवत, त्याने आकाशाकडे बघत आवाज काढला. त्याला सपाटून भूकही लागलेली होती. पोटात खड्डा पडला होता.
रात्री काहीजण त्याच्यापुढे अन्न टाकून गेले होते.
"यक्, मी नाही शिळे खात!"
तेव्हढ्यात त्याला ओळखीचा वास आला.
उंच डोंगरावर काहीतरी हलताना दिसत होते. ममा-डॅडा आले असतील का? त्याने आनंदाने चारही पायांवर उडी मारली.
परतीला असह्य विलंब होत होता!
परत घरी जाऊ शकू यावरचा विश्वास डळमळीत होऊ लागला होता.
तांत्रिक बिघाड की मूळ डिझाईन मधला लोचा ..काही समजत नव्हते!
तऱ्हेतर्हेच्या मीमांसा आणि दोषारोप.
ती साकारत असलेलं पात्रच तसं होतं. 'रांधा वाढा उष्टी काढा...' या काळातली स्त्री तिने साकारली होती.
पोटात भुकेची आग. पण कामावरची अपार निष्ठा तिला जेवू देत नव्हती. कारण तिचीच प्रमुख भूमिका असलेला हा प्रयोग तिच्यासाठी फार महत्वाचा होता. तो यशस्वी होण्यासाठी तिने जीवापाड मेहनत घेतली होती. तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला प्रेक्षागृहातून भरभरून प्रतिसादही मिळत होता.
स्वाहा
आक्रोशानं अवघा आसमंत झाकोळलेला. एक्या बाजूस ती..थिजल्या नजरेने सारं पाहत असलेली.. किती आठवत होतं. असाच आकांत पूर्वीही झालेला. तिचा सहचर होता तो..त्याच्याबरोबर निश्चयपूर्वक पावलं टाकणारी ती.. मात्र तिचा निर्धार ढ्ळला, तो सासर्याच्या आर्त विनवणीनं ! दूषणं सोसतच तिनं मळलेली वाट सोडलेली. सुभेदार आणि बाईजींच्या भक्कम पाठिंब्यानं !
आज पुन्हा मळलेल्या वाटेने चालणारी एवढी पावलं. काही तर अवघ्या सात- आठ वर्षांच्या चिमुरड्यांची ! का? इंदूरच्या सुभेदारांघरची रीत म्हणून ? मग आता आपणच पुढे व्हायला हवं ! सुभेदारांसारखं ..
नर्मदेने डोक्यावरचे लाल आलवण कानामागे खोचले, आणि बाहेर कुणी आहे का याची चाहूल घेतली.
रोजच्या कामाच्या धबडग्यात दुपार कधी सरून जाई तिला पत्ताच लागत नसे.
दोन थोरले दीर, त्यांचा परिवार, पाव्हणेरावळे ... सरदेसायांचा मोठा बारदाना होता!
या सगळ्यात तिला अगदी जवळचा वाटणारा एकच जण होता, चार वर्षांचा अनंता!
तो आजारी होता. काही खातच नव्हता. वैद्यांनी तिला बजावून सांगितलं होतं, की निदान दोन मोसंबी तरी त्याने खायलाच हवीत आज.
तिने निकराचा प्रयत्न चालवला होता आणि अनंता रडरडून खायला नकार देत होता.
"कडू तर नाही मोसंबी? का खाईना पोर..!"
अरे ए! शुंभासारखा तिला बघत काय उभा राहिलायस? असा पुढे ये आणि समोर नजरेला नजर देऊन बोल घडाघडा.
छे! पालथ्या घडावर पाणी आहे
आज दोन महिने झाले तालीम करतोय ना आपण? प्रयोग चार दिवसांवर आलाय आणि तरी एकेकाची ही तऱ्हा. तुम्हा पोरांची नाटकं बसवणं म्हणजे माझ्याच संयमाची परिक्षा आहे.
ओरडून ओरडून माझा घसा दुखला आणि प्रॉंप्टिंग करुन या वामन्याच नरडं सुजलं तरी सुधारणा नाही.
“माझा जरा छान फोटो काढून दे ना”
“जसा आहे तसाच येणार ना?”
“टोमणे मारण्यापेक्षा फोटो काढ”
“बरं! हा घे काढला”
“ईss किती जाड आलेय यात. परत काढ”
“बरं!”
“अरे हे काय? पोट विचित्र दिसतय यात.”
“आता बघ!”
“श्शी! बाई तुला नीट काढताच येत नाही फोटो. हा असा फोटो लावू मी डिपीला?”
“मग तुझा तू काढ ना सेल्फी”
“होsत्तर! सगळं मीच करते आता. घर आवरते, तुमची गिळायची सोय करते. नातेवाईकांनाही एंटरटेन मीच करते. तू फक्त मीम्स धाग्यावर पडीक रहा wfh च्या नावाखाली.”
दहा वर्षांनी कॉलेजमेट्सच्या रियुनियनचा योग आला. पावसाळ्यात करायचे ठरले.
वर्षाविहार रियुनियन!
सारे आले होते. "ते दोघे" वगळून! पाऊसही तसाच धुंद होता. दहा वर्षांपूर्वी असायचा तसाच. आणि आम्ही सारेच रेनडान्स करत होतो. दहा वर्षांपूर्वी करायचो तसेच. पण माझ्या मनात प्रश्न येत होते. ते दोघे का आले नसावेत? कॉलेजमध्ये त्यांचे प्रेमप्रकरण किती गाजलेले. आता कुठे असतील? काय झाले असेल?
आणि अचानक माझे लक्ष गेले. ते दोघे सुद्धा आम्हाला जॉईन झाले होते. "अरे तुम्ही दोघे कधी आलात?", असे विचारत मी त्यांच्याकडे निरखून पाहीले. एकमेकांसोबत डान्स करत होते खरे.
लहानपणापासून तिची भूक काही अजबच ! किती, कसा , कुठे फडशा पाडेल याचा नेमच नाही.
त्यामुळे ती सतत चर्चेत असे. घरी-दारी, शाळेत, पंचक्रोशीतही... ते ही वय वर्षे फक्त नऊ असतांना !!
तिच्या असामान्य भुकेचं शमन करण्याचं काम तिच्या बाबांचं होतं. वाढत्या वयानुरुप उचित असं खाद्य ते तिला सतत पुरवीत असत.
त्या दिवशीसुद्धा बाबा दोन्ही हातात अवजड पिशव्या घेऊन दमून-भागून घरी आले. त्यांना वाटत होतं लेकीसाठी आठवड्याभराची बेगमी केली आहे आपण. पुढच्या आठवड्यापर्यंत बघायला नको.
पण कसंच काय, दोन तासांत बाईसाहेबांनी फडशा पाडला होता.