पहिल्या दिवशी शिवथरघळीत राहून मग पहाटे निघालो ते रायगडाकडे! तसा हा नेहमीचा रूट आहे असं घळीत समजलं होतं. आणि मी २० वर्षांपूर्वी अगदी असाच प्रवास केला होता. घळीतल्या शिबिरानंतर २ रात्री गडावर आम्ही सगळ्यांनी मुक्काम केला होता. गडाचा कानाकोपरा पाहिला होता. त्यामुळे तिथे जाऊच हा माझा आग्रह माझ्या बेटर हाफ ने ऐकला आणि घळीतून निघून सकाळी ९:१५ ला गडाच्या पायथ्याशी आलो. रोप वे ने जाऊन येऊ असं ठरवलं नि त्या बेताला पायथ्याशीच सुरूंग लागला.. साडेचार तास वेटिंग आहे म्हणाले. मग परत उलट फिरलो आणि जमेल तेवढं जाऊ चढत, कंटाळा आला, फारच दमलो तर असू तिथून उलटपावली येऊ असा बेत करून पायी निघालो.
गेल्या आठवड्यात ३ दिवस सलग मिळालेली सुट्टी अनपेक्षित धनलाभासारखी 'लाभली' मला! आधीपासून ठरत होतं, कुठेतरी फिरून येऊ.. अगदी टिपिकल टुरिस्ट ठिकाणं धुंडाळून झाली, नि काही कारणाने बेतच रद्द झाला. पण शुक्रवारी, सुटीच्या पहिल्या दिवशी जरी घरीच होतो, तरी काहीतरी ठरवलं, त्या दिवशी बाकीची बाहेरची कामं उरकली, थोडी विश्रांती घेतली नि दुसर्या दिवशी चक्क शिवथरघळीत जायला निघालो! सासुबाईंनी सुचवलं ठिकाण, आणि बरेच दिवस मनात घोळत होतंच जायचंय म्हणून... मग तयारी केली नि निघालो. घळीतच जास्त वेळ राहून थोडी साधना करावी असा विचार पक्का झाला.
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2012/12/blog-post_9674.html
भगवद्गीतेवर बंदी घालण्याचा प्रयत्न होऊन एक वर्ष होत असतांना रशियाच्या शासनाने आता त्या देशातील हिंदूंचे एकमेव मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीपर्यंत इस्कॉनचे मॉस्कोस्थित मंदिर नामशेष केले जाणार आहे. (जगभरात हिंदूंची संस्कृती नष्ट करण्याचा विडा उचललेल्या धर्मांध खिस्त्यांचा डाव ओळखा ! - संपादक)
नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कोणत्या स्टेशनवर उतरावे? सांगलीच्या गणपतीचे आणि कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे आहे. तेव्हा प्रवासाचा क्रम कसा ठेवावा. मुंबईहून ट्रेनने जायचा बेत आहे. कॄपया चांगली हॉटेल्सही सुचवा.
राम राम, मायबोलीकर मित्रांनो.
मी बीड जिल्ह्यातील एक तरूण. घाटशिळ पारगांव हे माझे गांव. येत्या २६ नोहेंबरला आमच्या गावची निवडणूक आहे. गेली ५ वर्ष आम्ही गावातील २०० तरूण गावच्या विकासासाठी धडपडतोय, पण सत्ताधारी विरोधक त्यात अनेक अडचनी आणत आहेत. म्हणून ठरवलय कि गावच्या विकासासाठी सत्ता हाती घ्यायचीच. म्हणून आम्ही सर्व तरूण निवडणूक मैदानात उतरलोय.
आम्हाला प्रचारासाठी मायबोलीकरांच्या मदतीची गरज आहे. तेव्हा, आदर्श सरपंच, गाव, किंवा ग्रामपंचायत याविषयी, तसेच आम्हाला या क्षेत्रात उपयोगी पडेल अशी कुठली ही मदत वा माहीती मायबोलीकरांनी आम्हाला येथे पुरवावी ही विनंती.
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].
सुरेश कलमाडी यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली व पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवले. यावर गुन्हेगारांचे फटाके वाजवून स्वागत करणे पुण्याच्या संस्कृतीला शोभत नसल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्यावर माणिकराव ठाकरे कसे गप्प बसतील? कलमाडींची बाजू घेत ते म्हणाले, ‘‘पद्मसिंग पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसता हे चालते काय?’’ महाराष्ट्रातील मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व वाभाडे काढीत आहेत. भ्रष्टाचार व गुंडगिरीचे पुरावे देत आहेत. भ्रष्टाचार व गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या हाती सत्ता असणे हाच महाराष्ट्रात ‘गुंडा’राज सुरू असल्याचा पुरावा आहे.
Staten Island कडे जाणारी ती नारंगी रंगाची फेरी, आपल्या पोटात १५०० पेक्षा अधिक जीवांचे ओझे वागवून, काहीश्या अवघडलेल्या अवस्थेत पलीकडच्या किनाऱ्याकडे सरकताना, हडसनचा शहराच्या पसाऱ्यात घुसमटलेला प्रवाह, जणू या दिव्यातून पार पडण्याची शक्ती मिळावी म्हणून तिला गोंजारताना, जेंव्हा जेंव्हा मला माझ्या खिडकीतून दिसतो तेंव्हा तेंव्हा मला आठवण येते हुगळीच्या विस्तीर्ण पात्रात स्वताला झोकून देणाऱ्या 'त्या' फेरीची, जी विश्वासाने आणि निर्धास्त मानाने जणू आपल्या मातेच्या कुशीत झेपावत असते.
काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.
भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.