मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
क्षेत्र
ग्रामपंचायत जिंकायचीच !
राम राम, मायबोलीकर मित्रांनो.
मी बीड जिल्ह्यातील एक तरूण. घाटशिळ पारगांव हे माझे गांव. येत्या २६ नोहेंबरला आमच्या गावची निवडणूक आहे. गेली ५ वर्ष आम्ही गावातील २०० तरूण गावच्या विकासासाठी धडपडतोय, पण सत्ताधारी विरोधक त्यात अनेक अडचनी आणत आहेत. म्हणून ठरवलय कि गावच्या विकासासाठी सत्ता हाती घ्यायचीच. म्हणून आम्ही सर्व तरूण निवडणूक मैदानात उतरलोय.
आम्हाला प्रचारासाठी मायबोलीकरांच्या मदतीची गरज आहे. तेव्हा, आदर्श सरपंच, गाव, किंवा ग्रामपंचायत याविषयी, तसेच आम्हाला या क्षेत्रात उपयोगी पडेल अशी कुठली ही मदत वा माहीती मायबोलीकरांनी आम्हाला येथे पुरवावी ही विनंती.
चिरंजीव परशुराम भूमी प्रांगण, बुरोंडी
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) - म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].
पुण्यातील फटाके (कल-माडी)
सुरेश कलमाडी यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली व पुण्यातील त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवले. यावर गुन्हेगारांचे फटाके वाजवून स्वागत करणे पुण्याच्या संस्कृतीला शोभत नसल्याचे अजित पवारांनी जाहीर केले. त्यावर माणिकराव ठाकरे कसे गप्प बसतील? कलमाडींची बाजू घेत ते म्हणाले, ‘‘पद्मसिंग पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसता हे चालते काय?’’ महाराष्ट्रातील मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले व वाभाडे काढीत आहेत. भ्रष्टाचार व गुंडगिरीचे पुरावे देत आहेत. भ्रष्टाचार व गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेल्या मंत्र्यांच्या हाती सत्ता असणे हाच महाराष्ट्रात ‘गुंडा’राज सुरू असल्याचा पुरावा आहे.
गंगासागर
Staten Island कडे जाणारी ती नारंगी रंगाची फेरी, आपल्या पोटात १५०० पेक्षा अधिक जीवांचे ओझे वागवून, काहीश्या अवघडलेल्या अवस्थेत पलीकडच्या किनाऱ्याकडे सरकताना, हडसनचा शहराच्या पसाऱ्यात घुसमटलेला प्रवाह, जणू या दिव्यातून पार पडण्याची शक्ती मिळावी म्हणून तिला गोंजारताना, जेंव्हा जेंव्हा मला माझ्या खिडकीतून दिसतो तेंव्हा तेंव्हा मला आठवण येते हुगळीच्या विस्तीर्ण पात्रात स्वताला झोकून देणाऱ्या 'त्या' फेरीची, जी विश्वासाने आणि निर्धास्त मानाने जणू आपल्या मातेच्या कुशीत झेपावत असते.
गंगासागर
टाईप करण्यासाठी इथे धागा उघडला होता. तो ना आता मला डिलिट करता येत आहे ना तेंव्हा तो मला तिकडे हलवता आला. तो तसाच अप्रकाशीत पडुनच रहाणार होता तर त्याचा उपयोग करावा असे वाटले. आणि माझे सगळे लिखाण, माझ्या रंगीबेरंगीवर एकत्र असावे हा पण एक हेतु आहेच. त्यासाठी ही लिंक इथे आहे. (इतर कुठलेही (गैर)समज करुन घेउ नये.)
http://www.maayboli.com/node/30839
लिखाण जुने झाले की शोधा-शोध करायचा कंटाळा येतो.
- आरती.
अयोध्या निकाल - इतिहास घडताना.
काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.
भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
कोकण यात्रा - २: शांत, नयनरम्य कोळिसरे
भटकंती -- कर्नाटक
गेल्या खूप दिवसापासून "कुठेतरी फिरायला जाऊ या ना!!" अशी भुण भुण कधीपासून आमची चालू होती. त्यात पप्पाना एकुलत्या एका जावयाला कर्नाटकातून तेही स्वतःच्या गावी घेऊन जायचे होतेच होते. आमचा देसायांचा वाडा, गावातले धरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्नाटक प्रांत एकदा फिरवून आणायचा होता. अर्थात सतिशला पण फिरायची फारच आवड असल्याने तो तर कधीचाच तयार होता. पण त्याला कर्नाटकामधे सर्वात जास्त उत्सुकता ही तिथल्या वडापची होती. लोकं बसच्या टपावरून प्रवास करतात असे त्याला कुणीतरी सांगितले होते. आईला मंत्रालयमला जाऊन जावयाकडून सुवर्ण रथोत्सव करायचा होता.
कोकण यात्रा - १: केळशी - दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी
कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने
अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं
पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली
सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता
येणार्या या गावाला पर्याय नाही.