मेळघाटातल्या चिलाटी गावात, १०० दिवसांच्या शाळेच्या निमित्त्ताने, मागच्या वर्षी घालवलेल्या, त्या ८-१० दिवसांच्या आठवणी माझ्या मनात आजही अगदी ताज्या आहेत.
माझ्या तिथल्या सोन्यासारख्या वास्तव्याला सुगंध देण्याचे काम, तिथल्या अंगण-वावरात दिसलेल्या, अगदी सहज व विनासायास दिसलेल्या पक्षांनी केले.
त्यांची काही प्रकाशचित्रे आज इथे टाकत आहे.
शुभशकूनी भारद्वाज

बुलबुल एकटा

अन् जोडीने
मागील वर्षी पुण्याच्या 'मैत्री' संस्थेने मेळघाटात भरवलेल्या १०० दिवसांच्या निवासी शाळेचा हा सचित्र वृतांत. ३१ मुली व ११ मुले अशी एकूण ४२ मुले होती. चार गट पाडले होते. आम्ही ४ स्वयंसेवक ४ गटांसाठी अशी योजना होती. प्रत्येकजण ८ दिवस तिकडे राहिलो आणि आयुष्यभर पुरतील अशा आठवणी सोबत घेऊन आलो.
मेळघाटातील 'कोरकू' या आदीवासी समाजातील, रानपाखरांगत मनमौजी मुलांना शाळेबद्दल आकर्षण व प्रेम निर्माण करण्यात यशस्वी व्हायचे म्हणजे येरागबाळ्याचे काम नोहे.
त्यामुळे मुद्दामच असे 'वेळापत्रक' आखले होते, ज्यात अभ्यासाखेरीज इतरही उद्योग असतील...:)
'मैत्री शाळा १०० दिवसांची - मुलांच्याच गावी' (मेळघाट २०१२ – २०१३)
स्वयंसेवक हवेत.
नमस्कार!
गेल्या १५ वर्षांपासून पुणेस्थित 'मैत्री' नावाची एक संस्था, प्रामुख्याने, मेळघाटात कुपोषणामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे बालमृत्यु टाळण्यासाठी व इतर भेडसावणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे. (अधिक माहितीसाठी भेट द्या - www.maitripune.net) तेथे पावसाळ्यात होणारे बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते, त्याकरता, आखून घेतलेल्या कार्य़क्षेत्रामधे 'शुन्य बालमृत्यु' हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, धडक मोहीमा आखणे व त्याची अंमलबजावणी करणे हे काम करण्यात येत आहे.