युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, ते वर्णन वाचूनच माझं किलोभर वजन वाढलं असेल. Proud
आधीच गुलाबजाम, त्यात त्यावर आमरस आणि क्रीम? Happy

.

दाद, क्या बात है !

सुखदा, धणे टिकवणे तसे कठीण आहे. आता ऊन असेल तर उन्हात अगदी कडक वाळवून ठेवता येतील. डाळ करुन मिळत असेल तर ती करुन, मुखवास म्हणून चालेल.

तूप करताना लोण्यात ताकाचा अंश जास्त असेल तर ऊतू जाते. मोठे भांडे घेतले तर नाही होणार असे.

तूप चांगले कढवले असेल तर खवट वास येणार नाही (इथे सविस्तर चर्चा झालीय.) अगदी जास्त असेल तर विकायचा पण पर्याय आहेच कि. मिठाईवाले आनंदाने घेतील.

मी नाहीच खाणारय (अजून.. म्हणजे एक-दोन खाल्ले तितकेच). लेकाच्या मित्राकडे पार्टी आहे... काहीतरी चिप्स-बिप्स असलं स्नॅक्स्वालं घेऊन जायच्या ऐवजी हे दिलं...
"लुक्स नाईस... काये?"
"माहीत नाही?... अरे, गुलाब-आम... तुला आठवत नाही खाल्लेले?"
(नुकत्याच लॉनमॉवर फिरवलेल्या डोक्यावरून हात फिरवीत)... "च्चक."
"मला पण नाहीत...." (मी मनात)
Happy

दाद जबरी आयडीया... झकास लागेल हा पदार्थ... पण एका वेळेस अर्धाच गुलाब जाम तर खाल्लाय म्हणून भरपूर जातील पोटात...

धन्यवाद दिनेशदा ,उन्हात धणे वाळवण्याचा उपाय चांगला आहे.तूप विकणे थोडे कठिण आहे,कारण ते खास नातवां साठि पाठवले जाते.माझिच धुलाई होईल.
दक्षिणा ,मला तुझ्यासह सगळ्या माबो करांना तुप वाटायला आवडले असते ,पण मी गाझियाबाद मध्ये राहते.
दाद ,गुलाब-आम खासच!!!!घरच्या खव्या पासुन पुढच्या वेळि हि पाक्रु नक्कि!!!!

सुखदा, ते जास्तीचे वाटणारे तूप हलवायाला किंवा आचार्‍याला देऊन त्याच्याकडून मस्त मिठाई / लाडू बनवून घेता येतील. सामान आपण त्यांना द्यावे लागते व ते करणावळ घेतात. रोज मुलांना, आल्यागेल्यांना वगैरे घरी देसी घी मधील पौष्टिक लाडू खिलवता येतील! शिवाय वाटायलाही सोपे.

तूपाविषयी थोडेसे :

उत्तमपणे कढवलेले तूप महिनाभर आरामात टिकू शकते असे म्हणतात.

तुपाचा ओल्या भांड्यांशी/ उन्हाशी/ दमट हवेशी संपर्क टाळावा. ते थंड व कोरड्या जागेत साठवले जाते. तुपाच्या डब्याचे झाकण घट्ट व कोरडे हवे. त्याला ओले हात लावणे टाळावे.

वापराचे तूप कायम एखाद्या लहान तामलीत / भांड्यात काढून घ्यावे. थेट मोठ्या डब्यातून तूप घेऊन रोजच्यासाठी वापरत असल्यास त्याचा वारंवार बाहेरच्या हवेशी संपर्क येतो.

तूप फ्रीजमध्ये रेफ्रिजरेट करून ठेवू शकता. घट्ट टण्णू गोळा बनेल फार तर. पण नंतर वितळवता येईल.

दर आठवड्याला येणारे दहा किलो म्हणजे महिन्याचे ४० किलो लोण्याचे किती तूप होत असेल? Uhoh
मोठी फॅमिली नसेल तर एवढं तूप खाण चांगल आहे का? माफ करा, वैयक्तिक घेऊ नका, पण मला खरोखरच आश्चर्य वाटत एवढ्या लोण्यातूपाची तूम्ही विल्हेवाट लावू शकता म्हणून.

काही आयुर्वेदीक औषधांसाठी तुपाची गरज असते असे ऐकले आहे. जवळपास कोणी आयुर्वेदाचार्य किंवा रसशाळेला विचारता येइल.

तूप जे बाहेर आळते व घट्ट होते ते आपल्या रक्त वाहिन्यातून फिरताना काही वेगळे वागेल असे शक्य नाही. काळजी घ्या.

धन्यवाद अरुंधति,संजना,अनघा,अश्विनीमामी ,लिना.
आमचे एकत्र कुटुंब असल्या मुळे आणि ते खुप मोठे असल्या मुळे घरच्या भाज्या वगैरे संपतात ,पण तुप खायला कोणिहि तयार नसते.म्हणूनच एवढ्या लोण्यातूपाची विल्हेवाट
लावायचा प्रश्न पडतो.आपल्या कडे एवढे तुप वापरले जात नाहि.पण यू पी साईड ला घरचे भरपुर दुध-दुभते असेल तर रोजच्या भाज्या ,पराठे,शिरा,पुर्‍या इ.सर्व साजुक तुपात केले जाते.आमचि खुप शेति आणि शेकडा जनावरे आहेत्,त्यांचे दुध मोठ्या डेअर्‍यां ना विकले जाते ,मोठ्या पत्र्यांच्या डब्यां मधुन साजुक तुप हि विकायला पाठवले जाते.गावि आणी शहरात दोन्हि कडे मोठि एकत्र कुटुंब असल्या मुळे गावा हुन इकडे शिकणार्‍या,नोकरि करणार्‍यां साठि घरचे लोणी पाठवले जाते.पण इकडे कोणिहि खात नाहि,खरं तर किंमत नाहि.म्हणुन मग वाटावे लागते.चला उद्या एका अंध आश्रमात तुपाचि वारि !!कोणाच्या तरि तोंडि लागेल.

मला एक प्रश्न आहे, आपण जितकं धान्य घेतो, ते दळलं की तितक्याच वजनाचं पीठ होतं का, की कमी / जास्त होतं?
म्हणजे, पाच किलो वजन करून गहू दळायला दिले, की त्याचं पीठ पाचच किलो निघतं, की अजून थोडं जास्त निघतं?
हाच प्रश्न साबूदाणा, बाजरी, ज्वारीसाठी.

चक्कीवर साधारण तेवढ्याच वजनाच पिठ मिळायला हवे. क्वचित थोडेसे बाष्प उडून जात असेल.
चक्कीच्या आत काही रहात नाही. सांडलवंड होते ती पण जास्त नसते.
तयार पिठात मात्र १२ ते १४ टक्के पाणी असते. गव्हात तितके (अंगभूत) नसेल तर जास्तीचे घालतात.

ज्ञाती, मिश्रणाला चटका दे किंवा मावेमधे अर्ध्या अर्ध्या मिनिटासाठी ठेव, मिश्रण चांगलं आळेल आणि लाडू वळता येतील.

मिल्क पावडर असेल आणि आवडत असेल तर घाल त्या मिश्रणात. थोडि खव्यासारखी चव येते, छान लागतात लाडू.

थॅन्क्स मंजुडी आणि निवेदिता!
आधी गरम करुन बघते, नाही जमलं तर मिल्क पावडर घरात आहे.

गरम करून वळण्याजोगे मिश्रण झाले, थॅन्क्स Happy

बरंचसं ताक उरलं आहे - ते पण थोडंसं आंबट झालंय. आज कढी करणार आहे. पण तरीही उरेलच. कुठलीही पेयं करता यायची नाही, कारण इथलं हवामान अजिबात तसं पेयांसारखं नाहिये. अजून काय काय करता येईल अशा ताकाचं?
अजून एक. बर्‍याच घरी ताकाची आंब काढून टाकून खालचं कमी आंबट ताक पितात. पण सगळं सत्व तर त्या आंबमध्येच असतं, मग असं ताक पिऊन काय उपयोग? की असं काही नसतं?

उकड करता येईल ते ताक वापरून.
ढोकळा, हांडवो चं पीठ भिजवायला वापरता येईल. खूपच आंबट असेल तर साखरेने थोडी चव अ‍ॅडजस्ट कर पीठ भिजवताना.

घरात दोन बॉक्स वॅनिला आईसक्रीम उरलय.. वॅनिला फ्लेवर आवडत नाही म्हणुन कोणी खायला तयार नाहीये..
काही करता येईल का??
फ्लेवर बदल किंवा आईसक्रीम विथ सम्थिंग??.. काही सुचवा..

गुलकंद घालून फिरवून परत फ्रिज करा. आमरस, सीताफळ गर पण घालता येइल. कॉफी घालता येइल. , कोल्ड कॉफीत घालता येइल.

Pages