विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅच ला रजनी आलाय म्हणजे जिंकलीच म्हणावी का?
असो, शाहीद, रणबीर, सोहा, आमिर खान दिसले मला. शाहीद नी पण मुछ वाढवली आहे, डिज्जे, क्यो?

युवी, भाऊ, शॉर्ट वगैरे बॉल कायको? भज्जी, विकेट काढणार आहे! मस्त टाकतोय, त्या रज्जाक ला घेतला तसा एखाद्याचा दांडा निघणार आहे आता.

क्लाईव ल्यॉईड पण आलाय. आपण लंकेशी सेमी फायनल हरलो होतो, जाळपोळ वगैरे झाली होती तेव्हा मॅच रेफरी क्लाईव लॉईडच होता असं एकदम मला आठवलं, कोणाला आठवतय का ९६ चा वर्ल्ड कप?

मला वाटत ते फार इंटलीजंटली खेळत आहेत...बहुतेक २५० चे लक्ष्य ठेउन संगकारा खेळतोय..

श्रिसंथने काय असे पुण्य केले आहे की त्याला वर्ल्ड कप फायनल खेळायला मिळत आहे(अहेड ऑफ आश्विन व पठाण) हे फक्त धोनीच जाणो..

या दोघांना लवकर आउट केले पाहीजे...

Pages