विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकड्यां विरुध्द च्या त्या हाय व्होलटेज ऊपांत्य फेरी नंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्किच दुणावला असणार, I feel the Indian Team has an edge over the lankans.

>>मुंबई : उद्या पहिली ३० मिनिटे जर सचिन टिकतोय तर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे १०० वे शतक झालेच म्हणून समजा, ही प्रतिक्रिया आहे वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर व कसोटीपटू सुधीर नाईक यांची.

अगदी. आणि त्यातही विरू पेटला तर बहर येईल..
मला वाटतं पहिली १० षटके आणि नंतर बॅटींग पॉ.प्ले. मधिल खेळ या दोन गोष्टी आज निर्णायक ठरतील.

असाम्या,
>>किती बोलताय रे ? जरा एक मॅच निवांत घ्या. धोनी नि कर्स्टनला ठरवू दे कोणाला घ्यायचे नि कसे कुठे खेळवायचे ते कधी तरी ...
just chill dude.. Happy

उद्या पहिली ३० मिनिटे जर सचिन टिकतोय तर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे १०० वे शतक झालेच म्हणून समजा, ही प्रतिक्रिया आहे वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर व कसोटीपटू सुधीर नाईक यांची.>>सचिनला शतकासाठी ऑल द बेस्ट... पण ही प्रतिक्रिया फारच उथळ वाटली/ किंवा पेपरमध्ये मसाला लाऊन छापलीये (असही नेहमीच छापतात Wink ) हा अती ओव्हर कॉन्फीडंस नाही वाटत का?

मला पर्सनली सचिन फक्त पहिली ३० मि. ऐवजी पुर्ण इनिंग टिकुन खेळलेला आवडेल!!!

ढोणीचे बोल चांगले वाटले,
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/current/sto...

वर्तमानातच रहायला हवे ह्या(प्रत्येक) मॅचसाठी!!!

India! ..India!! India!!!. ऑल दी बेस्ट..

साहेब आणि विरु चला करुन टाका लन्का दहन..:)

शुगोल....धन्यवाद.. मस्त दिसत आहे हर्श भोगले , इयन चॅपेल व सिद्धुचे अ‍ॅन

अजिबात झोप आली नाही आज

आत्ताच पिच रिपोर्ट ऐकला सौरव्ह व नाझिर हुसेनचा... रेड् क्ले पिच... पहिल्या १० ओव्हर्स फास्ट बोलर्ससाठी म्हणे

टॉस हरलो...

बुवा, मला सिध्दूची बडबड ऐकायचा मोह झाला , त्यामुळे extracover.net Proud

पण cdn2 वर पण सुरू झालयं बहुतेक.

नाखू, पहिला कॉल ऐकूच आला नाही..

आता बॉलर सहसा मटका नाही ठरायचा, पहिली बॉलींग असल्यामुळे, अर्थात कोणी भरपूर विकेट काढल्या तर काय सांगा? पण आता स्कोअर कमी झाला तरी मदार बरीचशी बॅट्समनवरच.
झालं सुरु पन्ना. सि डी १ वर.

बॉलर्स अ‍ॅटॅकवर जास्त भर दिलाय त्यांनी ! द्वारपालांवर भलताच विश्वास दिसतोय.
पहिल्या १० षटकांमधे द्वारपाल उडवा अर्धी मोहिम तिथेच फत्ते होईल.

टॉस दोनदा केला म्हणे...पहिला टॉस आपण जिंकला होतो...संन्गकारा खोट बोलला ...मी धोनीच्या जागी असलो असतो तर दुसरा टॉस करु दिला नसता... पण संगकाराचा रडीचा डाव खडी होणार ...

श्रिशांत पठाणपेक्षा मोठा जुगार आहे...

अरेरे.. लंका जिंकली का टॉस पहिली बॅटिंग घेऊन Sad
जाउ दे..
"आयी आयी टिम इंडिया आयी
लंका तेरी मौत आयी .."

भारतानं पहिल्या बॅटिंगमधे वर्ल्डकप जिंकलाय आणि लंकेनं स्कोअर चेसिंग मधे. अवघड आहे. काहितरी एक बदलणार.

Pages