क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही फोटो नंद्या. महागुरू - कोणते हॉटेल? तुझ्याबरोबर फोटो काढ म्हणून विनंती केली का नाही त्यांनी?

झक्की-हुड भेटीसारखेच>>> Lol

सेहवाग ने बांगलादेश "ordinary team" आहे असे वक्तव्य केल्याने (ती मुलाखत वाचली का कोणी? धमाल आहे. सेहवाग ने एकदम अनौपचारिक पणे उत्तरे दिलीत) जरा टीका झाली, पण सचिन बहुधा मुद्दामच त्याच्या बाजूने उभा राहिला -मैदानावर आणि पहिल्या दिवस अखेर मीडियाला मुलाखत देतानाही. मला वाटते आजही तो चांगला खेळेल.

गंभीर जबरी फॉर्म मधे आहे पण.>>> सहमत..
सलग पाच मॅच मध्ये पाच शतके.. आणि सलग १० मॅच मध्ये १० वेळा ५० हून अधिक धावा.. फक्त दोन खेळाडूंनी असा पराक्रम केल आहे कसोटी मध्ये... सर व्हिवियन रिचर्डस आणि दुसरा इंग्लंडचा डावखुरा फलंदाज (नाव आठवत नाहीये).. सलग ११ वेळा ५० हून अधिक धावा... अर्थात गंभीरच्या नंतर म्हणजे सलग ९ वेळा असे केलेले बरेच जण आहेत...

साहेब आज लवकर आउट झालेत... फक्त १६ धावा आणि पायचित...>>साहेबांचे हे नेहमीचे आहे पण Sad एकदा शतक मारले की मग साहेबांना law of averages पाळावाच लागतो Happy आणि अगदीच त्यांनी नाही पाळला तर पंच पाळतात Happy

दुसरा इंग्लंडचा डावखुरा फलंदाज (नाव आठवत नाहीये).. >>> डेव्हीड गावर का?
तिकडे पाँटींगने शतक मारले की साहेब लगेच आपला एक्का टाकतात, जबरी रेस लागली आहे त्यांच्यात.

पूर्वी श्रीलंका नवीन असताना हे लोक आपापली रेकॉर्डे सुधरवण्यासाठी त्या दौर्‍याचा वापर करीत. आता श्रीलंकेपासून जीव वाचवायची पाळी येत आहे. त्यानन्तर बांगला देशापासून लवकरच जीव वाचवायची पाळी येईल असे दिसते....

तसे अजून झिंबाब्वे, आयर्लंड असे काही संघ आहेतच. शतके काढायची ती विक्रमासाठी नसून, जाहीराती करण्यात जास्त पैसे मिळावेत म्हणून.

अरे नसतो जिंकलो तर बदाबदा पोस्ट्स पडल्या असत्या ईथे.
९७/६ वरून बांगलाबाबून्नी २४३ केले यातच काय ते आलं. त्यांची पोरं टोरं पण शर्मा, झहीर, श्रीशांत ची पिसे काढत होते. नेहेमीप्रमाणे फलंदाजीच्या जोरावर जिंकलो.
पुढील सामन्यासाठी:
लक्षमण बाहेर म्हणजे बहुतेक मुरली विजय ला खेळवतील.
युवराज ला बसवायला हवाय.. फिरकी गोलंदाजी अजूनही झेपत नाही त्याला.

श्रीशांतला बसवून इरफान पठाण ला घ्यायला पाहिजे. त्याला धोनीनं पार सडवलाय आणि युसुफ ला उगाचच डोक्यावर घेउन बसलाय.

सेहवाग अजूनही त्यांना ऑर्डीनरीच म्हणतोय.
आयपीएलमधे पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्याबद्द्ल थयथयाट चाललाय.त्यांचा मंत्री म्हणतो 'आम्ही भारताला याचे चोख प्रत्युत्तर देउ'.म्हणजे काय करणार? कसाबसारखे अजून दहा लोक पाठवणार काय आयपीएलच्या सामन्यात? येडच्याप लोक आहेत.
साहेबांच्या पोराच्या आत्त्तापासूनच बातम्या बिचारा बुरखा घालून क्रिकेट खेळेल!

१४३ - साहेबांचं अभिनंदन.
कालच्या व्हायकिंग वि. सेंट्स गेममध्ये कमेंटेटर १०२ डेसिबल्सची साऊंडलेव्हल मोजून किती टेन्शन येत असेल वगैरे चर्चा करत होते. त्यांना २००३ भारत पाकिस्तान मॅचमध्ये बसवायला हवे होते.
म्हातारा फावरे म्हणत होता, "it puts you under tremendous pressure". मित्रा आमचे साहेब गेली २० वर्षे कसे खेळतात बघ जरा.

अरे नसतो जिंकलो तर बदाबदा पोस्ट्स पडल्या असत्या ईथे >>>> योग.. आयडी बदलायचा राहिला का रे हे लिहिताना??? Lol

सेहेवाग गट आणि ढोणी गटात भांडण म्हणे परत...
सचिन भारी खेळला बाकी काल..

तिकडे कोण कविता करतं? >>>>> Rofl

अरे मटाला आलं होतं काहितरी.. त्या अमित मिश्राला टिममधे घेण्यावरून..

लक्ष्मणबुवा घरी गेले - म्हणून घेतला. बरंय नाहितर वायूराज - वायूवेगाने ढपले असते. Happy

केजो: धोनी आहे तो, ५०० चा तरी लीड घ्यायला बघणार. सेहवाग असता तर त्याने केले असते.

बांग्लावासीयांनी नाकी नऊ आणायचा प्रयत्न केलाच काल.. पण शेवटी झहीर बाबा मदतीला आले आणि संपली मॅच... काल त्या तमिमनी खिमाच केला सगळ्या गोलंदाजांचा... तो ज्या पध्दतीन बडवत होता ते बघून कालच ते ३०० धावा कुटतात की काय असे वाटत होते.. पण तसे व्हायचे नव्हते....

आता द.अफ्रिका च्या विरुद्ध द्रविड आणि वायूराज पहिल्या मॅच मध्ये तरी बाहेर.. म्हणजे परत एकदा कार्तिकला संधी मिळणार बहुतेक.. किंवा मग कर्नाटकच्या मनिष पांडेला संधी द्यायला पाहिजे.. रणजी मध्ये जबरदस्त खेळला तो...

Pages