क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जैस्वाल च्या रन-आऊटविषयी माझं मतः तो कॉल जैस्वालचा होता, कोहलीने पळायला हवं होतं- हे एक. कॉल चुकीचा होता, तिथे रन नव्हती - कदाचित कोहली रन आऊट झाला असता - जवळ जवळ १० ओव्हर्स राहिल्या असताना नाईट वॉचमन पाठवणं आततायीपणाचं होतं. नंतरचा मिनी-कोलॅप्स तर दुर्दैवी होता - त्यामुळे जे झालं ते मॅच च्या आऊटकमसाठी, इंडियाच्या दृष्टीनं घातक आहे.

फुल्या फुल्या फुल्या फुल्याचा....
तुमचं क्ष क्ष खेळलं होतं काय हो असा शॉट...

पुलंच्या रावसाहेबांची भाषा वापरतोय सकाळी सकाळी Sad

कोहली शालेय धडे विसरला म्हणून जयस्वाल बाद झाला>>

+१

या विराट कोहली साठी मी रनआऊट झालो आहे
दुष्काळ त्याच्या धावांचा मी शतकाला मुकलो आहे.

असे गाणे गात असेल जयस्वाल.

326 - 7 ! ही दोन पोरं संघातल्या अनुभवी फलंदाजांना कसोटीतल्या फलंदाजीचे धडे देताहेत !! घाई नाही, प्रत्येक चेंडू खेळणं / सोडण आदर्शवत , 34 धांवा झाल्यावर सुंदरचा पहिला अप्रतिम, शैलीदार चौका ! धांव घेण्यासाठीचे कॉल समयोचीत....
..किप अप !!!

पंत आज जसा बाद झाला त्याची कोणीतरी कानउघाडणी केली पाहिजे. टॉप ऑर्डर चाचपडत खेळते तिथे हा आश्वासक भासतो. ठरवले तर कुठले अतरंगी शॉट न मारता मोठी खेळी करू शकतो. तरी अश्या पद्धतीने शॉट खेळून बाद झाला ते बघून मारावेसे वाटले त्याला..

गिल बसवून सुंदर आत घेणे आणि सुंदर नाईट वॉचमन न पाठवणे दोन्ही निर्णय योग्य ठरले.
>>
सुंदर ला जे टेस्ट बॅटिंग टेंपरामेंट आहे ते गिल ला नाही, अन् काल तो ही विशेष काही न करता बाद झाला असता असं म्हणायचं आहे का?
मग गिल टीम मधे का आहे??

10+ ओव्हर राहिलेल्या असताना सुंदर च्या बॅटिंग वर विश्वास दाखवून त्याला पाठवणं जास्त उपयोगी पडलं नसतं का?
आकाश दीप च्या बॅटिंग बद्दल विश्वास कशावरून आला? का असंच तुक्का म्हणून पाठवलं त्याला???

नितीशचं शतकं !!!!!
अभिनंदन, सलाम व खूप खूप शुभेच्छा !!!!

आपण ऑल राऊंडर बघताना मुख्यतः बोलर जे बॅटिंग पण करू शकतील, असा ऑप्शन घेतोय. प्रॉपर बॅटर जे गरज पडल्यावर बोलिंग पण करतील असा पर्याय आपण कन्सिडर च करत नाही आहोत.
त्यामुळे आपली मुख्य बॅटिंग लाईन फार लवकर संपती आहे अन् कामचलाऊ बॅटिंग लाईन (जी कधी क्लिक होते, कधी ढासळते) आपली शेपूट जास्त लांब करती आहे.

शर्मा, जयस्वाल, गिल, कोहली, राहुल या 5 पैकी 2 जण साधारण फॉर्म मधे आहेत अन् 3 जण चाचपडताहेत. पर्पल पॅच मधे एकही नाही. आता या पाच पैकी 4च जण खेळवून आपण आणखी बॅक फूट वर गेलोय.
बोलिंग मधे ही एक बुमरा डोलारा सावरतोय. पण त्याला बाकी मुख्य बॉलर्स कडून सपोर्ट नाहीये. ऑसी जसे लबुशेन किंवा हेड कडून कामचलाऊ बोलिंग करवतात तो ऑप्शन आपल्याला बंद आहे. रादर त्यामुळे आपल्या मेन बॉलर वर अतिरेकी प्रेशर येतं आहे. अन् त्यांची धार बोथट होते आहे.

आपला बॅटर जो थोडी बॉलिंग करू शकतो असा खेळाडू म्हणजे नितीश रेड्डी आहे, या सामन्यात त्याला sixth bowler म्हणून खेळवला आहे.

आपला बॅटर जो थोडी बॉलिंग करू शकतो असा खेळाडू म्हणजे नितीश रेड्डी आहे, या सामन्यात त्याला sixth bowler म्हणून खेळवला आहे.

10+ ओव्हर राहिलेल्या असताना नाईट वॉचमन...
>>>>

१० नाही फक्त ४ ओवर झाल्या Happy
वर सुद्धा कोणीतरी दहा ओवर वगैरे लिहिले होते.. झाल्या चारच ओवर. वेळ तितकाच होता की बॅड लाईट ने खेळ थांबला हे मी पाहिले नाही. पण कप्तान कोच याना त्याचा अंदाज असतो.

असो, संघ निवडी बद्दल सांगायचे झाल्यास,
ऑन पेपर कोणी फलंदाज आहेत म्हणून सध्या परफॉर्म करत नसताना देखील अश्या सर्वाँना एकत्र खेळवण्यात अर्थ नव्हता.

यशस्वी बद्दल मी आधीच म्हटले होते की भले तो काही सामने लवकर बाद झाला असला तरी ज्यावेळी खेळणार त्या दिवशी ती मोठी आणि सामन्यावर इम्पॅक्ट टाकणारी इनिंग असणार त्यामुळे तो असायलाच हवा होता या संघात. कारण सध्याच्या स्थितीत जो फलंदाज खेळणार त्याला निव्वळ आपले शतक करून थांबायचे नव्हते तर इतरांचे अपयश सुद्धा कव्हर करायचे होते, त्यांच्या वाटणीच्या धावा सुद्धा करायच्या होत्या, त्यामुळे खेळला तर त्याच्या दिवसाला मोठी खेळी करेल असा कोणी प्लेयर हवा होता, आणि जयस्वाल द्विशतक मारावे या क्षमतेचा खेळाडू आहे. मला काल अपेक्षा सुद्धा होती. धावबाद झाला नसता तर चित्र वेगळे असते.

स्कोर कार्ड वर नजर टाकली तर लक्षात येईल नेमके यशस्वी, रेड्डी, सुंदर यांनीच सर्वाधिक स्कोअर टाकला आहे.

झाल्या चारच ओवर. वेळ तितकाच होता की बॅड लाईट ने खेळ थांबला हे मी पाहिले नाही. पण कप्तान कोच याना त्याचा अंदाज असतो.
>>
जनरली नाईट वॉचमन 20-30% बॉल खेळतात अन् मुख्य बॅटर उरलेले 70-80%. इथे 4 ओव्हर च्या 24 पैकी निम्म्याहून अधिक बॉल नाईट वॉचमन खेळाला... म्हणजे एक तर मुख्य बॅटर ना माहिती नव्हतं की 4 च ओव्हर आहेत, किंवा त्यांना आकाश दीप स्वतः हुन बरा बॅटर वाटतं असावा, किंवा कदाचित त्यांना ही 10 ओव्हर उरले आहेत असं वाटत असेल...

जनरली नाईट वॉचमन 20-30% बॉल खेळतात अन् मुख्य बॅटर उरलेले 70-80%. इथे 4 ओव्हर च्या 24 पैकी निम्म्याहून अधिक बॉल नाईट वॉचमन खेळाला...
>>>>

थोडा वेगळा विचार करा. आऊट ऑफ द बॉक्स. जर नाईट वॉचमनचे काम आहे की त्याने मुख्य फलंदाजाला सुरक्षित करणे तर हेच त्याने मैदानावरील फलंदाजाला सुद्धा सुरक्षित करायला हवे. त्यानेच जास्त चेंडू खेळायला हवेत Happy

आणि बघा तेच झाले. कोहलीला जे चेंडू खेळावे लागले त्यात तो सुद्धा बाद झालं

“ पंत आज जसा बाद झाला त्याची कोणीतरी कानउघाडणी केली पाहिजे.” - “स्टुपिड, स्टुपिड, स्टुपिड“ असं गावसकर म्हणालाय. कुणीतरी ते त्याच्यापर्यंत पोहोचवायला हवं.

गावसकरचा च विषय निघाला आहे तर त्याचं नाईट वॉचमनविषयीचं मत ही विचार करण्यासारखं आहे (त्याला नाईट वॉचमन चा कन्सेप्ट पटत नाही.) असो.

आजचा दिवस रेड्डी-सुंदर जोडीचं कौतुक करण्याचा आहे. काय सुंदर खेळले दोघं!! अप्रतिम!! टेंपरामेंट, टेक्निक - लाजवाब!! रेड्डीचा ह्या पूर्ण सिरीजचा खेळ बघता त्याचा पूर्णवेळ पाचव्या नंबरवर विचार होऊ शकतो का?

आफ्रिका दौऱ्यावर पंत एकदा आपली सिच्युएशन चांगली नसताना तिसऱ्याच बॉलवर रबाडाला पुढे येऊन मारायला गेला होता आणि स्लीप मध्ये झेलबाद झाला होता.
त्यावर टीका होताच पुढच्या सामन्यात दोन्ही इनिंग फार जबाबदारीने खेळला आणि दुसऱ्यात शतक आले. ते सुद्धा जिथे आपला टोटल स्कोअर २०० होता.
त्याने ठरवले तर तो तसा खेळू शकतो आणि तरीही तो अश्या पद्धतीने बाद होतो हे त्याचा चाहता म्हणून क्लेशकारक आहे.

गावस्कर म्हणतो तसे पाचव्या नंबरवर खेळायचे असल्यास त्याने असे खेळता कामा नये नाहीतर खाली खेळ असे त्याला क्लिअर केले तो सुधारणा घडवून आणू शकतो असे वाटते.

भारतात खेळताना मात्र पाचवा नंबर त्याला योग्य वाटतो. भारतात त्याचे शॉट सीलेक्षण चांगले असते. सध्या फिरकीला खेळायची आपली बोंब असताना तो महत्त्वाचा प्लेअर वाटतो.

If India wins the series 2-1: Australia should beat Sri Lanka by no more than 1-0 margin, or South Africa lose at least 1-0 to Pakistan.

If the series is drawn 2-2: India will finish on 55.26; Australia will need to lose to Sri Lanka by at least a 1-0 margin, or South Africa lose 2-0 to Pakistan.

अरे हे ऑस्ट्रेलियाला लवकर का आउट करताहेत? हारतील हे अर्ध्या दिवसात आउट होऊन. बुमराने रोहितच्या सेंडॉफचा फुल प्लान केलेला दिसतोय.

एकंदर आघाडी 300 धावांच्या आंत असली तरच भारताला जिंकण्याची संधी आहे - खात्री नाही ! सुंदर अधून मधून तरी ओव्हर द विकेट गोलंदाजी कां करत नाहीं?
लबुशेनला सलाम !!

*जयस्वाल ने पकडायला हवी होती कॅच.. लक थोडे साथीला हवे होते..* - विकेटमागचा झेल सुटला, बॅड लक. पण विकेट पुढचा झेल सुटला, अक्षम्य; इतक्या जवळच्या पोझीशनला हात खाली न ठेवता क्षेत्ररक्षण करणं ही घोडचूकच !!

मागचा सुद्धा बॅडलक कसे म्हणावे.. आपली चूक होती ती..
आणि येस.. सिली पॉईंट सुद्धा खाली नव्हता ही सुद्धा आपलीच चूक..
बॅडलक म्हणालो ते एक बॉल टप्पा पडून स्टम्प वरून गेला.. एक कॅच उडाली पण दूर होती जे रेड्डी पोहोचला नाही.. बरेच एज मिस झाल्या स्पेशली सहावी क्रिकेट पडल्या पडल्या सिराज ने एका ओवरल लाबूषणाला सलग बीट केले होते ज्या इतर दिवशी एज लागल्याही असत्या.

Pages