शाहरूख खानचा लोकाना इतका राग का येतो ?

Submitted by केदार जाधव on 17 December, 2015 - 01:51

नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .

इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला Happy

पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अ‍ॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?

शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?

संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरुख चे बरेच पिक्चर आम्ही ( मी व मैत्रिणीनी ) अगदी पहिला दिवस पहिला शो असे बघीतले. पण तो सेटल झाल्यावर जेव्हा एका साप्ताहीकात त्याचा एका क्रिकेट मॅच दरम्यान पाकी झेन्डा हातात घेउन बसल्याचा फोटो पाहीला तेव्हाच तो नजरेतुन उतरला. त्या काळात फोटोशॉप, फेसबुक इत्यादी बोकाळलेले नव्हते, त्यामुळे कोणीतरी हिन्दुत्ववाद्याने तो झेन्डा त्याच्या हातात कोम्बला असेही नाही.

शाहरुखचे चुलत घराणे पाकीस्तानात आहे त्यामुळे त्याला त्यान्च्याबद्दल प्रेम आहे याबद्दल काही गैर नाही. अनेक हिन्दु कुटुम्बान्ची चुलत, मावस, आते घराणी आजही पाकीस्तानात आहेत. नसीरुद्दीन शाहचे आजोळ पण तिथेच आहे. पण तो ते प्रेम जाहीर रीत्या दाखवत नाही, जसे शाहरुख वारन्वार दाखवतो. त्यामुळे लोक चिडतात. खरे तर मोदीनी नवाज भामट्याला बोलावले ते मला पण आवडले नाही, पण आम्हा सामान्याना कोण विचारणार?

आणी मुसलमान आहे म्हणून लोक त्याचा द्वेष करतात असे म्हणणे निव्वळ मुर्खपणाचे आहे. आणी तसे ( तो मुस्लिम आहे म्हणून) कोणी मुद्दाम करत असेल तर तेही अती मुर्खपणाचे आहे. या देशात कोणी मा. डॉ. अब्दुल कलाम दिलीपकुमार, रफी, अझर, झहीर खान यान्चा धर्म नाही बघीतला, तर शाहरुख, अमीरच का? याची उत्तरे आपणच शोधावी नाही का?

गेल्या १५ वर्षात मी कुठल्याच हिन्दु वा मुस्लिम कलाकाराचा शिणुमा टाकीजात जाऊन बघीतलेला नाही, आणी त्याचे मला काही गैर पण वाटत नाही, आणी माझा कुणावर बहीष्कार पण नाही. वक्त मिलेगा तो देखेन्गे, मग तो दिलवाले असो वा बाजीराव!

दिलीप कुमार यांनी निशाणे पाकिस्तान स्विकारलेला की पाकिस्तानने देऊ केलेला आणि यांनी नाकारलेला?

एक सहज विचार मनात आला, अवांतर वाटला तर वाचू नका.

वासिम अक्रम हा भारतातच पडीक असतो, आपल्याच खेळाडूंचे गुणगाण गात असतो, आपल्याच क्रिकेट टीमचा सल्लागार वाटतो... वगैरे वगैरे..

पाकिस्तानात त्याच्याबद्दल काय भावना असतील लोकांच्या.. मला बरेचदा तो जिवंत कसा हा प्रश्न पडतो, सिरीअसली.. कारण तिथे तर सारेच कट्टर असतात बहुधा..

साधना , मी तर कायम लिहिताना तुमच्या आमच्या सारख्याबद्दलच लिहिलय .
आताही मला वरचा ८०% सीट रिकामेचा मेसेज अनेक ग्रुप वर आलाय . ती सगळी साधी मंडळी आहेत .
पण कळ्त नकळत "शाहरूख खानचा सिनेमा ( दिलवाले) बघणारा देशद्रोही/नमक हराम ( उसके खून मे नमक नही)" असा प्रचार करतायत . एवढी आपली देशप्रेमाची / द्रोहाची व्याख्या उथळ झाली आहे का ?

पण कळ्त नकळत "शाहरूख खानचा सिनेमा ( दिलवाले) बघणारा देशद्रोही/नमक हराम ( उसके खून मे नमक नही)" असा प्रचार करतायत . एवढी आपली देशप्रेमाची / द्रोहाची व्याख्या उथळ झाली आहे का ?

मेसेज फोरवर्ड करताना कितीजण पुर्ण मेसेज वाचतात? किंवा केवळ स्वतःला पटतात तेवढेच मेसेज फोरवर्ड करण्याची दक्षता घेतात? कित्येकदा तीच माणसे त्याच गृपवर दोनदोनदा मेसेज पाटह्वतत. नंतर अरे,, चुकुन इथे टाकला, गल्ली चुकली इत्यादी कमेंट येते,. त्यावरुनच कळते किती गांभिर्याने हे केले जाते ते.

सोशल मिडीयावर जे चालते तेच देशाचे मत हा गैरसमज करुन घेऊ नका. एकुण लोकसंख्येच्या किती टक्के मिडीया वापरतात हेही पाहा. सगळे शिक्षित मिडीया वापरतात हा गैरसमज करुन घेऊ नका. माझ्या ओळखीत कित्येक व्हॉअ‍ॅ वर नाहीत आणि फेसबुकावरही नाहीत. का? म्हणुन विचारले तर फालतु वेळ नाही हे उत्तर येते. असे कित्येक आहेत. त्यामुळॅ पुर्ण देश आज सोशल मिडियावरुन स्वतःचे मत व्यक्त करतोय, म्हणुन जे तिथे आहे तेच खरे, तोच देशाचा आरसा ह्या भ्रमात राहु नका. फॉरवर्ड व्यतिरिक्त इतर कामासाठी सोशल मिडीया वापरणारेही खुप आहेत.

आता बाय बाय, सकाळपासुन दोन तास वाया घालवलेत मी. Sad Sad

शाहरुख ने माफी मागितली
ही न्युज ज्या स्टेटमेंट वरून एबीपी न्युजने जाहीर केली आहे ते स्टेटमेंट बघितल्यावर मिडीयाच्या अकलेची अक्षरशः किव करावी वाटते. एक तर त्याने माफी काहीच मागितली नाही उलट त्याने अश्या गोल गोल शब्दात शालजोडीतले हाणले आहे की त्या एंकरला सुध्दा कळले नाही की तो काय बोलत आहे. Rofl

ग्रेट पीस ऑफ माईंड

केदार अहो मुव्ही कसा आहे सांगा ना?

मला शाहरुख पेक्षा काजोल आणि रोहित शेट्टी पहिल्यांदाच टीम अप करुन काय करतायत याची उत्सुकता आहे.

#‎BOYCOTTDILWALE‬
In the name of the great Chhatrapati Shivaji Maharaj, he who fought the mightiest empire in the world, that of Aurangzeb, with only his wits, his extraordinary courage, his utter devotion to Mother India and a few hundreds courageous Hindus, Boycott Shah Rukh Khan & Aamir Khan.
Please tweet #BoycottDilwale to ten of your friends and ask them to retweet to ten of their friends, so that it starts trending.
Come on, O my Hindu sisters & brothers, wake-up! You have nothing to be ashamed! You belong to the most ancient spirituality, that which sees the World as One Family. You are the most tolerant people in this planet - you can enter a church, a mosque, and a buddhist temple - and still see God there. Yours is the last Knowledge left in the world, which tells you what happens after death, why we are born again and again, what is Consciousness, what is Mind, what is an Avatar, what is Karma, what is Dharma....
Wake-up o my brothers and sisters. You are not lambs anymore, that were slaughtered by the Moghols or General Dyer. You have the numbers – every sixth person on this planet is a Hindu! You have the brains – your children top in every university of the world! You have the power – Hindus now are heads of dome of the biggest multinationals! Yours is also a Consumer's power that ignores itself. If you boycott Shah Rukh Khan’s and Aamir Khan’s films, they will feel the economic pinch and stop using the word “Intolerance” in the most tolerant country in the world. They will stop abusing a people that gave them hospitality, love, adoration even - to be kicked in the face in return.
Wake up of Hindus, stop being passive, selfish, and fearful. You have had some of the greatest heroes and heroines, from Shivaji Maharaj, to King Deva of Vijatnagar, to the Rani of Jhansi, or Ahilyabai Holkar. Look up to your avatars, Lord Krishna, who fought the battle of Kurukshetra, to Sri Aurobindo, whose basement was used to make bombs to fight the British, to Swami Vivekananda, who showed too that Hinduism is not only about being yogis in Himalayan caves, but also about action in the world, battle against Asuras for the triumph of Truth.
Wake-up of my Hindu sisters and brothers, your time has come. Only your spirituality can save the world from the clash of civilizations, which is going on at the moment. But for that, India needs to come-up, as an industrialized nation, on par with the West and China - but without losing this great Knowledge that some call Hinduism.
Wake-up O Hindus, you are the Light of the World

---

महामुर्खांचा महामुर्खपणा Proud

वैद्य यांच्या सांगण्यावरून इथे टाकले आहे

भारी आहे
शाहरूख काजोल केमिस्ट्री ही तर पर्वणी आहे .
दोघेही अ‍ॅट देअर बेस्ट
बाकी कॉमेडी वगैरे नेहमी शेट्टी स्टाईलने चांगली आहे .
शाखा फॅन साठी मस्ट वॉच Happy

साधनातै,

तथाकथित हिंदुत्ववादी, पक्षी सोयीस्कर पक्षी मांडवलीफेम म्हणायचे होते हो मला Wink

मला कोणत्याही सेलिब्रेटी बद्दल वैयक्तिक राग कधी वाटला नाही. पण हे खरंय, मायबोलीवर येऊन ४ महिने झाले. ऋन्मेऽऽष मुळे शाहरुखचा राग यायला लागलाय. Lol
जिथे तिथे ओढून ताणून शाहरुख दिसायला लागलाय.
आणि आता तर कोणीही कुठेही SRK म्हटलं कि मला ऋन्मेऽऽष आठवतो. Happy
मस्करी करतेय. प्लीज. नाहीतर मी टार्गेट बनेन इथे Sad

मुस्लिमांना जरा काही बोलले की, हे लोक का चिडतात? केवळ दिखावु पणा आहे की, विरोधाला विरोध, एव्हढा पुळका आश्चर्य कारक आहे.शाखाला सपोर्ट केला काय अन नाही केला काय. काय फरक पडणार. उगाच आपले
दिव्य ज्ञान लिहिल्यासारखे दाखवायचे. आनी तु हिदुत्ववादी, मी पुरोगामी. फालतु चर्चा. तु शाहाणा, मी वेडा,
काय हाती लागले? एखादे मेडल, किताब,? जस्ट टाइम पास.

ही न्युज ज्या स्टेटमेंट वरून एबीपी न्युजने जाहीर केली आहे ते स्टेटमेंट बघितल्यावर मिडीयाच्या अकलेची अक्षरशः किव करावी वाटते.

मिडीयाच्या अकलेची किंव करायची परिस्थिती सगळ्याच बातम्यांच्या बाबतीत आहे. खरेतर ते फक्त त्यांचा टिआरपी बघताहेत आणि त्यासाठी त्यांच्या मते फक्त सनसनाटी पसरवणारी बातमी पुरेशी आहे.

फक्त, आपण सामान्य लोकांनी त्यांची किंव करताना ते किव करण्यास्पद रोल मध्येच कायमचे गेलेले आहेत हे लक्षात ठेवलेले बरे. ते जर आपल्याला सोयिस्कर बातमी छापत असतील तर ती बातमी १००% खरी आणि सगळीकडे लिण्का देऊन पसरवण्याजोगी, आणि आपल्या मताविरुद्ध मत प्रदर्शित करणारी बातमी छापत असतील तर मात्र ते किव करण्याजोगे असा भेदभाव करु नका.

शाहरूख इन्शा अल्लाहचे स्पेलिंग असे कधीच लिहत नाही. ते फेक आहे आणि हे फिरवणारी हलकट जमात शाहरूखच्या फेवरमधली आहे. (घ्या, आतल्या गोटाची बातमी!!) पण याच बातमीचा विरोधी परिणामदेखील होताना दिसतो आहे. इंटरेस्टिंग. व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग!!!

शाहरूख इन्शा अल्लाहचे स्पेलिंग असे कधीच लिहत नाही. ते फेक आहे आणि हे फिरवणारी हलकट जमात शाहरूखच्या फेवरमधली आहे. (घ्या, आतल्या गोटाची बातमी!!) >> नंदिनी याचा काही पुरावा ? कारण मला आलेले तर सारे शाहरूख हेटर्स कडून आलेत

Pages