गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला १.५ महिने झाले, आता मला postik अन्न सान्गा.

स्नेहा

svb,
पौष्टीक - paushhTeeka.
अनुस्वारासाठी कॅपीटल M वापरा, सांगा- saaMgaa असे लिहा. Happy

सगळ्या प्रेग्नंट बायकांना दिलेला फुकट सल्ला आपल्यालाही देते. मालती कारवारकरांचं वंशवेल आणा. Happy त्यानुसार शक्य तितके पदार्थ स्वयंपाकात असु द्या.

सगळं व्यवस्थीत असेल तर रोजचं वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबिरी आणि फळं, ह्याखेरीज वेगळं काही खाण्याची गरज असते असं नाही. जेवणात शक्य झाल्यास मोड आणून केलेल्या कडधान्याच्या आमट्या, पालेभाज्या असं सगळं असावं. शक्यतोवर बाहेरचं तेलकट, तुपकट, अती गोड, जास्त मीठ असलेलं टाळावं. मांसाहार करत असाल तर ह्या दिवसांत तो माफक असावा. पचायला हलके पदार्थ खावेत. मसालेदार, तिखट टाळावं. (जळजळ वाढते.)

एकाच वेळी खूप जेवण्यापेक्षा थोड्या थोड्या वेळानं बेताचं खावं.

Morning sickness जास्त होत असेल तर :

बहुतेक वेळा द्रव पदार्थ घेतल्याने उलट्या वाढतात, तेव्हा घन पदार्थ खावेत. बळेच दूध/फळान्चे रस पिण्याचा अट्टाहास करु नये.
काही जणीन्ना रात्री झोपण्यापुर्वी दूध पिववते, अशा वेळी चिमुट्भर सुन्ठ पावडर टाकुन, किन्चित कोमट्/गरम दूध प्यावे.
लाह्या (साळीच्या) अशा वेळी खूप उपयोगी पडतात, नुसत्या खाव्यात किन्वा चिवडा करुन ठेवता येतो. उलटी झाल्यानन्तर लगेच येणार्या अशक्तपणासाठी चान्गले.
दिवसभर सारखेच उलटुन पोटात काही राहत नसेल तर सुवर्णसूतशेखर, प्रवाळपन्चाम्रुत, कामदुधा यासारखी औषधे मोरावळ्याबरोबर घेउन उपयोग होतो.
खडीसाखर पाण्यात टाकुन पाणी उकळुन घ्यावे आणि त्यात वेलदोड्याची सालाशिवाय केलेली पुड चिमुट्भर घालुन ठेवावी, हे पाणी दिवसभर चमचा-चमचा प्यावे.
मलावरोध टाळण्यासाठी रात्री झोपताना काळ्या मनुकान्चा काढा/ गरम दूध तूप घालुन प्यावे. बालाजी ताम्बे यान्च्या "गर्भसन्स्कार " पुस्तकात त्रिफळा घेण्यास सुचवले आहे, परन्तु त्रिफळा मध्ये असणारा हिरडा (अतिशय उष्ण असल्याने) गर्भवतीन्ना वर्ज्य समजावा. तेव्हा त्रिफळा कटाक्षाने टाळावा.
जास्त ढेकर येत असतील्/पोट गुडगुड्ल्यासारखे वाटत असेल तर आवळा पावडर्/वेलदोड्याची पूड्/नारळाची शेन्डी यापैकी काहीतरी एक तव्यावर काळे होइपर्यन्त भाजुन खडीसाखरेबरोबर खावे.
सर्वात महत्वाचे, आवश्यक तेवढी विश्रान्ती घ्यावी.

मैत्रीणींनो ... तुमच्या बोलण्याने अन सल्ल्यांनी फार धैर्य आलंय मला . अजून एक गोष्ट शेअर करावीशी वाटतेय ती म्हणजे, मी गेल्या महीण्यात रामदेव बाबांच्या चिकित्सालय मधे गेले होते नवरा व मी दोघेही गेलो होतो . त्यांनी नवर्‍याला फक्त प्राणायाम अन आसने करायला सांगितले अन मला PCOD साठी काही औषधे व प्राणायाम्,आसने सांगितली , मी काटेकोर पणे ते सगळे केले अन काल सोनोग्राफी केली तर सिस्ट नाहीसे झालेत ! आम्हाला खरच खूप आनंद झाला.

शोनू ,अश्वीनी,दिपाली तुमचे खरच खूप आभार . दिपाली तुमच्या मेलला मी उत्तर दिले होते. Happy
-------------------------------------------------
देव करो अन सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ... माझ्याही Happy

मधुरानी
तुम्हाला त्यांनी कुठली औषधे दिली होती सांगाल का ?

रामदेव बाबांची औषधे एखाद्या वैद्यकीय (आयुर्वेद) तज्ञाला दाखवुन घ्यावी (असे माझे मत आहे). काही लोकांना विशेषतः लहान मुलांना त्यांची औषधे घेउन कायमचा काहीतरी probelm झाल्याचे वर्तमानपत्रात वाचले होते.

सिन्ड्रेला, बरोबर मलाही असेच वाटते. म्हणजे प्राणायाम्,आसने कुणालाही, कधीही उपयोगीच आहेत (नीट शिकुन योग्य पद्धतीने केली तर) पण औषधे घेताना जरा जास्त काळजी, तज्ञान्ची मते घ्यावीत.

शोनू ,

दशमुल क्वाथ - २००ग्राम व सर्वकल्प क्वाथ १०० ग्राम ह्याचे मिश्रण करुन ४०० ग्राम पाण्यात एक चमचा टाकून ते १०० ग्राम होइपर्यंत उकळून त्याचा काढा तयार करायचा व सकाळ ,संध्याकाळ जेवणापूर्वी अर्धा तास घ्यायचा .

वंग भस्म १० ग्राम
कहरवा पिष्टी १० ग्राम
वृध्दीवाटीका चुर्ण २० ग्राम
अमृतासव १० ग्राम
स्वर्णभस्म ५ ग्राम
प्रवाळ पंचामृत ५ ग्राम
रससिंदूर २ ग्राम
हे सगळे मिश्रण करुन रोज दोन वेळा एक एक चमचा मधासोबत घ्यायचे.

स्त्री रसायन वटी , अन मेदोहर वटी -ह्या दोन दोन गोळ्या दोन वेळा (सकाळ-संध्याकाळ) जेवणापूर्वी .
रज प्रवर्तीनी आणि चंद्रप्रभा वटी - ह्या दोन दोन गोळ्या दोन वेळा (सकाळ-संध्याकाळ) जेवणानंतर .

ह्या सोबत प्रणायाम भस्त्रीका - १० मिनिट , कपालभाती २० मिनिट आणि अनुलोम विलोम १५ मिनिट . मी त्यांची सीडी आणली आहे ती बघूनच हे प्राणायाम व आसने करते .
तसं बघता हे काटेकोर पाळणे फार अवघड आहे पण ते मी नियमीत केल्यानेच माझे रिझल्ट चांगले आले असे मला वाटते.

मला वाटले माझ्यासारख्या एखादीला हे उपयोगी पडेल म्हणून हे सगळं इथ सांगितलं पण हे डॉक्टरी सल्ल्याने केलेलेच चांगले Happy

-----------------------------------------
देवा, सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण कर ..... माझ्याही Happy

मनु२००६ तुम्ही माझ्या विचारपूस मधे तुम्हाला रामदेव बाबांच्या क्लीनीक चा पत्ता हवा आहे असं लिहिलय पण तुम्हाला उत्तर देताना 'हे पान हरवलेले आहे' अस येतय . म्हणून इथेच सांगते . रामदेव बाबांचे चिकित्सालय पुण्यात भरपूर ठीकाणी आहेत . तुम्ही कोठे राहता ? कँपात एक चिकिस्तालय आहे.

माझ्या एका मैत्रीणीला एक्टोपिक प्रेग्नंसी राहीली २-३ आठवड्यातच लक्षात आली म्हणून तो गर्भ काढून टाकण्यात आला. मी इथे नेटवर वाचले की पून्हा प्रेग्नंसी राहण्यासाठी अवघड अस्ते म्हणून.. कोणाला माहीती आहे का ? आणि राहीली तर ती व्यवस्थित राहते का ? तिचं पहिल्यांदा अ‍ॅबॉर्शन झाले होते अन हे दुसरे ...

क्रुपया मला मदत करा.
काही दिवसान्पूर्वी इथे 'भारतातून कोणी बाळ्न्तप्णा साठी येत असल्यास त्याना काय आणायला सान्गावे' हे वाचले होते. प्ण आत काही केल्या तो थ्रेड मिळत नाही आहे. क्रुपया मला कोणी त्या थ्रेड ची लीन्क द्याल का?

- मनप

<<<आणि कदाचित तुम्हाला आवडणार नाही पण मी खूप केसेस अश्या पाहिल्या आहेत की पाण्यासारखा पैसा खर्च केला, आयुष्यातली बहुमोल वर्षे वाट्टेल ते उपाय करण्यात घालवली आणि मग अडॉप्ट करायचे वयही निघून गेले.
>>> अश्विनी, 'अडॉप्ट करायचे वय' ह्याबद्दल जरा माहिती देणार का प्लिज...

-- अश्विनी

बाळाची नाळ खुप खाली आहे. अश्या परिस्थितीत काय काय काळजी घ्यावी.
प्लीज माहीती द्या.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

नमस्कार, माझी वहिनी बाळान्त होउन आथव्डा झाला. तिच्या सठी काय आहार असावा?

मनु २००९, बाळाची नाळ खुप खाली आहे. >>>>>>>> नाळ की वार (प्लॅसेंटा)?

कारण प्लॅसेंटा -3rd degree असेल तर कंप्लीट बेडरेस्ट आवश्यक आहे. 2nd degree असेल तर ७ व्या महिन्या पर्यंत बेडरेस्ट घ्यायला सांगतात.

-प्रिन्सेस...

शतावरी कल्प नक्की कधी पासुन घेतल तर चान्गल आणि त्याचा फायदा काय? आता मला ८ वा चालु आहे तर मी आतापासुन घेउ शकते का?

आता मला ८ वा चालु आहे तर मी आतापासुन घेउ शकते का?>> हो.
शतावरी कल्प दुधासाठी चांगले आहे .

शिल्पा,
शतावरी कल्प साधारणतः पाचव्या महिन्यापासून घ्यायला सुरूवात करतात. आणि बाळ स्तनपान करेपर्यंत (कधीपर्यंत ते तू ठरव) पण आयडिअली बाळ दोन वर्षाचे होईपर्यंत चालू ठेव.

धन्यवाद Ashwini & Aas,
मी आता एवड्या late चालु करतेय तर काही नुकसान नाहि ना होणार?
मला बाळ्याच्या movements बेन्बीच्या खालिच जाणवतात, is that ok? Dr. ne sangitla ki Placentra khali aahe manun asa asel ka?

नुकसान नाहीच होणार. कधीही सुरूवात केली तरी फायदाच होईल.
जोपर्यंत बाळाच्या हालचाली नियमीत होत आहेत तोपर्यंत काळजीचे कारण नाही. स्पॉटींग इ. झाले तर मात्र लगेच तपासून घे. आणि प्लसेंटा खाली असेल तर ultrasound मध्ये कळेलच.

BP जास्त असेल तर normal delievery होऊ शकेल का?

BP जास्त असेल तर normal delievery होऊ शकेल का?

शिल्पा कितवा महिना चालु आहे? आणि bp किती high आहे?
details सांगु शकशिल का? तसा bp high असणे आणि normal delivery याचा सबंध आहे पण आणि नाहि पण.

मला आता ९वा चालु आहे, BP ७व्या महिन्यापासुनच थोडा high आहे, सध्या १५०/१०० आहे. overweight पण आहे मी. तर माझी normal delivery होऊ शकेल का?
आणि एक 'वेदनारहीत प्रसुति' कोणी अनुभवली आहे का? ती किती फायदेशीर आणि आरोग्याला उपयोगी आहे? Risk Level किति आहे कोणि सांगु शकाल का?

शिल्पा, माझंही बीपी ७ व्या महिन्यापासून हाय होतं आणि मी रोज ते कंट्रोल होण्याकरता गोळ्या घेत होते. (मला वाटतं अल्फाडोपा. खात्री करुन घ्यावी डॉक्टरांकडून). नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते पण खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवलेलं चांगलं तसंच रोज जवळपास फिरायला तरी जावंचं. तुमचे डॉक्टर योग्य तो सल्ला देतीलच..

अनेक कहाण्या ऐकुन मला आता असं वाटायला लागलय की जिची नॉर्मल व्हायची ती होतेच. मी स्वतः एक दिवस व्यायाम केला नाही, माझं बीपी सातव्या महिन्यापासून हाय होतं पण तसूभर त्रास झाला नाही आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली.

माझ bp पन थोड high होत पण साधरण ३५ week पासुन पण जास्त high नव्हत. माझी normal delivery झाली. painless delivery झाली. तु कुठे असतेस? US मधे असशिल तर खूप common आहे painless delivery.

नाहि ग, मी भारतातच (मुंबई) आहे, painless delievery चा अंदाजे खर्च कोणी सांगेल का? आणि pls मुंबईतले specialist dr. पण कोणाला माहीती असेल तर जरा सांगा.

Pages