गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिल्पा तुम्हाला कुठलाहि सल्ला देण्याइतकि माहिति माझ्याजवळ नाहि. पण एक गोष्ट आवर्जुन सांगाविशि वाटते कि टेंशन येउ न देण्याचा प्रयत्न॑ जरूर करा. ह्या अवस्थेत तणावमुक्त रहाण खुप आवश्यक आहे. दीर्घ श्वसनाचा तणाव घालवण्यासाठि खुप उपयोग होतो पण डॉ. सल्ल्याशिवाय कुठलिहि गोष्ट करु नका.

सगळ काहि व्यवस्थित होइल.

बेस्ट लक!

मी १६ वीक्स्(आट्।वडे नाही लिहीता येत) प्रेग्नट आहे. माझी पाट खुप दुखते. काही उपाय आहे का? सॉफ्टवेअर ईजिनीअर असल्याने दिवस भर बसुन काम असत.

वैशाली

वैशाली,
मलापण अगदी असाच त्रास होता. ईतका की मी झोपून उठल्यावर ५ मिनीटे चालूही शकायचे नाही. थोड्या दिवसात कमी होतो हा त्रास. पण तोपर्यंत एक कर, एका जागी सलग १ तासापेक्षा जास्त वेळ बसू नको.
जाताजाता,
आठवडे aaThawaDe असे लिही.

वैशाली,

१६ व्या आणि १७व्या आठवड्यात मलाही पोट दुखीचा त्रास झाला होता. uterus stretching मुळे होते हे.
Take a small pillow to support your back while working in office. and mostly dont put your legs hanging
down. Use some footrest of height about your chairs height. Also pass the urine frequently (at least
every hr.) After 2-3 weeks, हा त्रास कमी होईल.

If you have any doubts consult your dr. just to consult that the pain is due to stretching of uterus and not
due to any contraction (Contraction is a sign of labor pains).

Dont worry! just enjoy the pain!! Your baby is growing.!!!

-- रूपाराणी.

Hello

I am 34 weeks pregnant. My amniotic fluid is very less. Is there any way to increase the fluid levels. I am taking coconut water, 3lits of water but it doesnot help it seems.

Thanks.

Hi. now my third month is going on ani mala khup manje khupach zop yete, on average me ardha divas trai zopunach aste uthali ki khup weakness asto kahich karana jamat nahi. tar maza prashna asa ki evdi zop changli aahe ka ya divsat( gele 4-5 divas pasun jastach zopte aahe adi thoda kami hota praman zopech) ani Lal Bhopla changla ka? means mi asa aikala hota ki lal bhopla khup garam asto he khara aahe ka?
ani calcium mala kasha kashatun milel ? pls mala madat kara.........

Congrats Shipla. Weakness mule zop yewu shakate. Tu Dr. la wicharun paha. Lal bhopala khane changala asat prgnancy madhe. Aani ho Milk is good for calcium. Cacium chya golya dr. ni sangitalya asatilach...

shilpa,

first congrats!! पहिले ३ महिने मल हि खूप झोप येत असे. i think you r having doxinate tablets. tyane khup zope yete. and nothing is wrong in it. Infact first 3 months you shd take maximum rest. 5th-6th months pasun be active. and abt calcium Dr. will tell you to start the calcium and iron tablets from 4th month.
And have milk daily (4 cups). At least start with 2 cups now.

--रूपरणी.

First thank to both kulk_arti & Ruparani for replying......
हो ग रुपराणी, Dr. ला विचारले मी Pregnidoxin च्या गोळ्या चालु आहेत. म्हणुन खुप झोप येते पण तरी बेचैन वाटत ग माझ्या घरी दुसर कोणी नाहि आम्हि दोघच असतो, त्यामुळे खाण्या-पिण्याचे खुप हाल होतात, जास्त वेळ झोपुन असते आणि उठली कि अशक्तपणा असतो, त्यामुळे चान्गला काहि बनवुन खाता येत नाहि, मग काहिहि असेल available ते खाते, आणि मग बाहेरच readymade खाण हि जास्त होत मला जरा कोणि पटकन होणारे आणि पौश्टिक असलेले पदार्थ सान्गाल का?
आणि calcium साठि दुध चान्गल माहित आहे, पण दुध पिल कि ना पोटात कस तरि होत, mild pain type, म्हणुन मग मि जास्त पित नाहि २ दिवसानि एकदा पिते. आन्खि कहि असेल तर सान्गा please calcium साठि other than tablets.
कारण माझे पाय खुप दुखतात, please reply fast.........

शिल्पा तु रोज पंचाम्रुत घेत जा...१ चमचा दहि,१ चमचा तुप,१ चमचा मध्,साखर आणि दुध हे सगळे रोज सकाळी साधारण एक भांडे भरुन पी..त्याने कैल्शियम आणि हिमोग्लोबिन खुप मस्त राहते...मी हा उपाय केला अणि माझे सगळे प्रोब्लेम सुटले...आणी भारतात असाल तर रोज एक भा़जी लोखंडाच्या कढई मधे करुन खा...कैल्शियम साठि दुधात घालुन नाचणी सत्व घे...

shilpag85,
१ ग्लास दुधात १/४ चमचा हळद, १/४ चमचा जिरे आणि थोडेसे आले टाकून चांगले उकळवून घेऊन पिल्यास फायदा होईल.
पण तरिहि दूध नकोच असेल तर दह्यातही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात्. त्यामुळे आहारात जर दही, ताक ठेवले तरि चालेल.
आणि पटकन होणार्‍या पौष्टिक पदार्थांबद्द म्हणशिल तर कोणत्याहि पालेभाजिचे सूप दोन्ही वेळेला जेवणात ठेव. उदा. पालकाचे सूप-
साहित्य:- १ वाटी चिरलेला पालक, ३/४ लसूण पाकळ्या बारिक कापलेल्या, १ मिरची चिर मारलेली, जिरे, मिठ, हिंग, तेल १ चमचा(भाजी परतली जाइल एवढे).
कृती:- कढईत तेल गरम झाल्यावर जिरे, मिरची, लसूण, हिंग आणि मग पालक टाकून तो चांगला नरम होउन शिजला कि गरम पाणी (अर्धा ग्लास), मीठ घालून चांगली उकळी येऊ दे.
असेच सूप मेथी, माठ भाजी, पोकळा, भेंडी यांचे आलटुन पालटुन करता येईल. साध्या खिचडी बरोबर जरि घेतले तरि आहारातिल पौष्टिकपणा टिकून राहील.
मोकळ्या वेळेत गुळ्-खोबरे, खारिक खाल्यानेहि फायदाच होईल.
तसेच वेळ आणि मूड असेल तेव्हा मक्याचा (सोजिचा, नाचणिचा मात्र बाजरिचा नाही तो गरम असतो असे म्हण्तात) रवा साजू़क तूपात भाजुन वेगळा भरून ठेव. भूक लागेल तेव्हा उकळ्त्या दूधात शिजवुन(म्हणजे तेवढेच दूध पोटात जाईल पण नसेल तर पाणीही चालेल), गूळ आणि गोड खाउन कंटाळा आला कि थोडेसे मीठ घालून खाता येईल (शिर्‍यासारखे). या अवस्थेत साखरेपेक्शा गूळ केव्हाहि चांगला.

आणि हो एक राहीलेच....
लाल भोपळा अजिबात गरम नसतो, मी माझ्या मुलाच्या वेळेसही मी खाल्ला आहे. उलट त्यात भरपूर पौष्टिकता असते. नक्कि खा.

उष्णता कमी होण्यासाठी नारळपाणी उत्तम पण डॉ. ला विचारून घे. गरोदरपणात तर रोज पिण्यास सांगतात. जास्तित जास्त (साधे) पाणी पी त्यामूळे उष्णताही कमी होईल आणि कसले ईन्फेक्शन हि होणार नाही.
डॉ. नी जर वाढणार्‍या वजनाबद्दल काही सांगितले नसेल तर उगाच काळजी करु नकोस.

vkudtarkar,

पाठदुखी साठी सध्या तरि तुम्ही गरम पाण्याचा शेक धेणे एव्हडेच करू शकता, त्याने थोडा फायदा होइल.

लाल भोपळ्यामधे भरमसाठ अ जीवनसत्व असते. गर्भारपणात अ जीवनसत्वाच्या अतीसेवनाने birth defects आणि liver toxicity होण्याच्या शक्यता निर्माण होतात. एरवी देखील एखादी गोष्ट पौष्टीक आहे म्हणुन अती खाणे टाळावे, गर्भारपणात तर जास्त काळजी घ्यावी असे मला वाटते.

रवा भाजुन ठेवण्याबरोबरच instant wheatmeal (सातुचे पीठ Wink ) करुन ठेवता येइल. त्यात दुध अथवा पाणी आणि गूळ घालुन छान लागते.

cinderella,
भरपूर म्हणजे रोज अर्धा किलो खाणे नव्हे. वर्ज करण्यापेक्शा आठवड्यातून १/२ वेळा पुरे. कारण अ जीवनसत्व कमी असण्याचे हि दुष्परिणाम बाळावर होतातच.

मी अ जीवनसत्व वर्ज्य करायला नाही गं सांगितले, अती सेवन करु नका असा धोक्याचा इशारा दिला. तुझा सल्ला चूक आहे असेही नाही म्हणाले किंवा मीनले Wink

अगं हो पण ती गरम आहे असे म्हणत होती म्हणून त्याने काही होत नाही असे मला म्हणायचे होते. बाकी काही नाही.

धन्यवाद mrinish, cindrella & snehal, खरच खुप मदत होतेय तुमची.
सध्या मी झोपेवर खुप control करत आहे, दिवसाची झोप शक्यतो घेतच नाही, तरिहि रात्रीची शान्त झोप लागतच नाही. आणि वजन already जास्त असल्यामुळे पाउदुखी चा त्रास पण खुपच होतो. leg cramps cha pan tras hoto. त्यामुळे रात्रभर नुसति मि तळमळत असते या कुशीवरुन त्या कुशीवर, एकाच position मधे जास्त वेळ झोपायला जमतच नाही. सारख्या हालचालीमुळे काहि त्रास होणार नाहि ना बाळाला? झोपण्यासाठि best position कोणती? आणि दुसर म्हणजे मला चित्रविचित्र स्वप्न पड्त असतात ज्यान्चा कशाशीच सम्बन्ध नसतो यामुळेही नीट झोप मिळत नाही तर यावर काही उपाय आहे का?

आणि एक नाचणी सत्व कसे असत means तयार मिळत कि कराव लागत , कुठे मिळेल? आणि कराव लागत तर कसे करतात ते सान्गा please......

तु कुठे आहेस सध्या ? भारतात केप्र आणि एक्-दोन उत्पादकांचे नाचणी सत्व तयार मिळते. नुसते सत्व किंवा साखर्-वेलदोडा घातलेले. उकळत्या दुधात ते घातले की छान खीर तयार होते. (छान म्हणजे पौष्टीक ह्या अर्थाने, चवीला माहिती नाही बरका Wink )

स्वप्नं बर्‍याच जणांना कमी-जास्त प्रमाणात पडतात असे माझ्या डॉक्टरने मला सांगितले होते. मला देखील पडायची. तेव्हा घाबरु नकोस. झोपेच म्हणशील तर मला पाचवा महिना लागल्यानंतर एकही महिना heart burns मूळे शांत झोप लागली नाही. मग बाळ आल्यावर तर झोपेचं नित्य खोबरं. तेव्हा आत्ता जेव्हा येते झोप तेव्हा झोपुन घे Wink

babycenter.com ही एक चांगली संकेत स्थळ आहे. इथे तुला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सापडतील.

शक्यतो तुझ्या शंका डॉक्टरला विचारलेले बरे.

Thnks Cindrella & all
तुमच्या सगळ्यान्चा सल्ल्यान्चा मी नक्कि उपयोग करीन, खरच खुपच मदत होत आहे तुम्हा सगळ्यान्चि. धन्यवाद सर्वाना.

नमस्कार मंडळी , मी बरेच दिवस झाले विचार करत होते की माझा प्रश्न इथे लिहावा की नाही , पण इथे बर्‍याच भगीनी अशा आहेत की ज्यांच्या सल्ल्याचा आम्हा उभयंताना उपयोग होउ शकतो . माझ्या लग्नाला ४ वर्ष होत आलीयेत अजून आम्हाला मूल नाही अन आम्ही त्याची फार आतुरतेने वाट पहात आहोत. मी चार महिन्यांपूर्वी (डॉ.ची ट्रीटमेंट बंद केल्यावर) प्रेग्नंट होते (४ वीक्स) पण आम्च्या काही लक्षात याय्च्या आधीच माझं इनकंप्लीट ऍबॉर्शन झालय अस डॉ. नी सांगितलं Sad आणि नंतर मला दीड महिना खूप त्रास झाला . आता माझ वजन ही वाढलय. नवर्‍याचा काउंट कमी होता तो आता ट्रीटमेंट नी सुधारला आहे पण आम्ही दोघही खूप टेंन्शन मधे आहोत काहीच समजत नाहीये , आणि लोकांचे इतके विचित्र अनुभव येतायेत की बस्स.. नवरा फार डीप्रेस झालाय Sad

असा प्रश्न विचारणे कितपत बरोबर आहे माहीत नाही पण माझ मन मला इथे हलकं करावस वाटल म्हणून करतेय . इतके दिवस मी इथे फक्त वाचत होते लिहित काहीच नव्हते . पहिल्यांदाच इथे काही लिहितेय . दैव असा का आमचा अंत बघत असेल ? एक दीड लाख आत्ता पर्यंत खर्च झाले आहेत ट्रीट्मेंट मधे Sad
गेले दोन वर्ष झाले ट्रीटमेंट चालू आहे .

आता ऍबॉर्शन नंतर मला पॉलिसिस्टीक ओव्हरी डीटेक्ट झालंय .. ते कितपत सिरियस आहे ? नेट वर बघितली आहे माहिती . डॉ. नी सांगितलय की स्त्री बीज तयारच होत नाहीये Sad

मला काही माहीती/सल्ला मिळू शकेल का तुमच्या अनुभवावरून ? मी पुण्यात असते. दोन वर्‍शात आम्ही २-३ डॉ.बदलले आहेत .

???

मधुराणी,
तुम्हांला मी मेल केले आहे डिटेल मध्ये..चेक करा....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!

२६ जानेवारीला ग्रहण आहे, तर ग्रहण खरोखरच पाळायच असत का? असेल तर नक्कि काय काय करायच आणि काय नाही ते कुणि सान्गेल का? मला आता ५ वा महीना चालु आहे. तर मि काय काय करु कशी कोणति काळजी घेउ ते please सान्गाल का? please answer me before 26th Jan.

आणि माझी एक मैत्रीण ७ व्या महीन्यात झालेली आहे, ती पण pregnant(६ mnth) आहे, तर जुन्या बायका तीला सान्गतात कि तिला पण बाळ ७व्या महिन्यातच होईल म्हणुन हे खर आहे का? अस घडु शकत का?

शिल्पा, तुम्ही विचारलेल्या दुसर्‍या प्रश्नासंदर्भात- माझी डॉ असे काही विचारले की सांगायची Every woman's every preganancy and every baby is unique. तेव्हा जर तुमच्या मैत्रिणीला सातव्या महिन्यातच बाळ झाले तर तो निव्वळ योगायोग समजा. तसेच तिच्या आईला सातव्या महिन्यात बाळ होण्याचे कारण जर गर्भाशय पातळ वगैरे असते असे काही असेल आणि तुमच्या मैत्रिणीचे गर्भाशय देखिल तसेच असेल तर शक्यता आहे. पण तसे काही असते तर तिच्या डाँ. नी एव्हाना सांगितले असते.

मला कोणी काहीच माहीती देउ शकणार नाही का ? Sad

Madhurani,
गरवारे कॉलेजच्या समोर Dabake Nursing Home आहे. तिथल्या डॉ. सुमेधा दाबके यांना भेटून बघा. खूप छान आहेत त्या!
~साक्षी

डॉ दाबकेंबद्दल अगदी सहमत! छान आहेत त्या बोलायला सुद्धा. अजून डॉ वैजयन्ती खानविलकर (नीलायम टॉकिज जवळ दवाखाना होता त्यांचा, आता तिथेच आहे कि काय माहित नही) यापण या विषयातल्या तज्ज्ञ समजल्या जातात.

Pages