योग यांचे रंगीबेरंगी पान

ऑल ईज वेल

मटा ऑनलाईन मध्ये "आमची शिफारस" या सदरात प्रकाशित झालेला लेखः
"ऑल ईज वेल" (३० ऑगस्ट, २०११)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9796864.cms

गण गण गणात गणपती- श्री गणारायांच्या कृपेने एक सुरुवात!

गण गण गणात गणपती- श्री गणारायांच्या कृपेने एक सुरुवात!

३ ऑगस्ट २०१० रोजी मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळाला एक विनंतीपर ईमेल केली:

संयोजक मंडळी,
यंदा मायबोली गणेशोत्सवात रोज एक, याप्रमाणे मायबोलीकरांनी रचलेल्या आरती/ गीतें संगीतबद्ध करून ऑडिओ स्वरूपात इथे द्यायचा मानस आहे. यात इथे इतरही उत्सुक मंडळी सामावून, तसा चार -पाच जणांचा छोटा समूह बनवून किंवा वैयक्तिक स्वरूपात हे करता येईल. तुमची परवानगी असेल तर इतर इच्छुकांना संपर्क करून तसे काम चालू करतो. नाही तर वैयक्तिक स्वरुपात नक्कीच ऑडिओ पाठवायला आवडेल. कृपया विनंतीचा आग्रहपूर्वक विचार केला जावा.
धन्यवाद!
योग

जावे त्याच्या वंशा (लेखमालिका) ४ : पहिलं प्रेम

जावे त्याच्या वंशा (४): पहिलं प्रेम
ऑगस्ट ३, २०११

असं म्हणतात, भारतात त्यातही मुंबईत जन्मलेलं प्रत्येक मूल रांगायला, चालायला शिकतं त्याचबरोबर एखादी खेळायची पहिली वस्तू हातात कुठली धरत असेल तर बॅट आणि बॉल. घरात "लकडी की काठी" चा घोडा नसला तरी कुठला तरी बॉल आणि एकतरी बॅट असतेच. याला कुणीही अपवाद नाही, मी ही त्यातलाच.

हे राम!

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेवटच्या क्षणी "हे राम!" असे उद्गार काढले होते का याबद्दल आजही वाद आहे. शाळेतील ईतीहासाच्या पुस्तकात तरी तसेच नमूद केले असल्याने माझ्या पुरता किंवा आमच्या पिढीपुरता तो वाद तिथेच संपला होता. बापूंच्या काळी मोबाईल रेकॉर्डींग नसल्याने तसा थेट पुरावा तरी ऊपलब्ध नाही त्यामूळे अनेक शंका, वाद आणि सोयीस्कर थियरीज सो कॉल्ड तज्ञांनी आजवर नाचवल्या आहेत. काळाच्या ओघात पुस्तके बदलली (निव्वळ पुढचे मागचे कव्हर नव्हे तर आतील मजकूर देखिल. बापूंचा अंत झाल्याची तारीख मात्र तीच आहे, हे नशीब!) त्याचबरोबर अनेक तथाकथीत गोष्टी आणि ईतीहासही बदलला?

अशीही तशीही (कविता/गझल)

अशीही तशीही

ओठांनी वाचतो शब्द मौनाचे
"कळतेस" तू अशीही तशीही

भास आभास हा खेळ कल्पनांचा?
"दिसतेस" तू अशीही तशीही

एकच खळी परि लागते जिव्हारी
"रुजतेस" तू अशीही तशीही

डाव मोडून पुन: मांडतो नव्याने
"जिंकतेस" तू अशीही तशीही

मिळते पत्र जरी पत्ता चुकलेले
"भेटतेस" तू अशीही तशीही

सावल्यांच्या छत्र्या घेवून फिरतो
"जाळतेस" तू अशीही तशीही

डोळ्यात जागतो गाव चांदण्यांचा
"स्मरतेस" तू अशीही तशीही

बहाणा

आज पुन्हा भरून आलीस
वाटलं बरसशील अवीरत..
ऊसन्या हातांनी अडविले
म्हणून अडखळलीस सरीगत.. ?

आज काय बहाणा?
प्रश्ण जुनाच आहे.

तसे जुनेच बरेच काही आहे-

कोरड्या क्षणांचे डोह तुडूंब करून
श्वासांवर ओलेतीच निजायचीस
ओसंडलेले, ओथंबलेले,
सुरकुत्यांवर स्पर्श काही झिंगलेले..
तो एकच पसारा तुझ्या खास आवडीचा
बाकी सारे कसे "आवरून" ठेवायचीस.

तसे जुनेच बरेच काही आहे-

आलेच जरा "आवरून"..
त्या ऊत्तरावर मग अनेक युगे घुटमळायची
त्यांचे सांत्वन करायला ही गर्दी जमायची
मग लाँग ड्राईव्ह वर तुझ्या नजरेतून रस्ता शोधायचा
गाडीच्या आरशांची अगदी अडगळ वाटायची
तो एकच रस्ता तुझ्या खास आठवणीतला

प्रचीती

प्रचीती

पहिली भेट आणि पहिला स्पर्श..
आठवणींच्या गाभार्‍यात अजूनही तेवत आहे, स्पष्ट.
देवत्वाची अनामिक प्रचितीच जणू.
अनेक आयुष्यांची ओळख असल्यागत
तुझे मला पहाणे, माझ्या कुशीत बिलगणे.
मुलायम शहाराच पण निशःब्द करणारा, समाधिस्त करणारा.

आपण त्या आधी कधी पूर्वीही भेटलो होतो- स्वप्नात, कल्पनेत, कुठेतरी नक्कीच.
तुझे ते हसणे आणि खळी, कायमची हृदयपटलावर कोरलेली.

आणि मग सुरू झाला ऊत्कट प्रवास-
पावलागणीक माझ्या आधारावर,
वेळी अवेळी जागण्यावर,
छोट्या छोट्या गोष्टींत जगण्यावर,
एकही शब्द न बोलता खूप काही गप्पांवर,
व्यावहारीक चौकट्या मोडून, स्त्री पुरूष भेद सोडून निव्वळ सोबतीवर,

अंतिम सत्य!

नुकतेच श्री सत्य साई बाबा यांचे निधन झाले. देव त्यांना सद्गती देवो!

टु द लास्ट बुलेट

टु द लास्ट बुलेट
अशोक कामटे यांची जीवनकहाणी
२६/११ अतीरेकी हल्ला, लोकेशनः कामा हॉस्पिटल परिसर.. एक शोधयात्रा..

लेखकः विनीता कामटे, विनीता देशमुख
मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादः भगवान दातार
अमेय प्रकाशन, पुणे.
पहिली आवृत्ती: २२ डिसेंबर २००९.

हवा तसा लवासा ?

पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्ती ईत्यादी विषय हे अलिकडे ग्लोबल वॉर्मिंग च्या अनुशंगाने पुन्हा नव्याने चर्चिले जात आहेत. त्यातही सुनामी, अवेळी पाऊस, वादळे, ज्वालामुखी, ऋतूंची कोसळललेली दिनदर्शिका, वाढते तापमान या अवती भोवती घडणार्‍या गोष्टी पाहता कुठेतरी काहीतरी गडबडलय ईतपत शंका सामान्य माणसाला येत रहाते. त्यात मग ऐन सणासुदिच्या दिवसात अचानक h1n1 सारखे साथीचे आजार, कधी कुठेही ऊपटणारे विषमज्वर, किंव्वा ईतर ज्ञात नसलेले विषाणू संसर्ग, ईत्यादि अनुभवातून बेजार होणार्‍या सामान्य माणसाच्या मनात "निसर्गाचं संतुलन निश्चीत काहितरी बिघडलय" ही भिती अधिक बळकट होते.