भारत

स्वाभिमानाचे नव-किरण

0

स्थळ : पुण्यातील सुप्रसिद्ध बी. एम. सी. सी. कॉलेजचे टाटा सभागृह. सकाळची वेळ. खच्चून भरलेल्या सभागृहातील तरुण विद्यार्थिनींमध्ये उत्सुकता, कुतूहल व कार्यक्रम सुरू होण्याअगोदरची अस्वस्थ चुळबूळ. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते. पांढरे टी-शर्ट व निळ्या जीन्स या वेशातील तरतरीत कॉलेज कन्या मायक्रोफोनचा व मंचाचा ताबा घेतात. समोरील श्वेतपटावर सरकणार्‍या अतिशय नाजूक व संवेदनशील विषयावर आधारित चित्रांसोबत दिल्या जाणार्‍या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच सभागृहातील अस्वस्थ चुळबूळ थांबते व सार्‍या श्रोत्या तरुणी - स्त्रिया बघता बघता कार्यक्रमाच्या विषयात समरस होऊन जातात...

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन

वाढदिवस!!!

वर्षातले ३६३ दिवस एकीकडे! आणि *हा दिवस दुसरीकडे!
अशा तुलनेतही ज्याचे पारडे खाली जाईल, तो दिवस म्हणजे वाढदिवस!!

सकाळी बरोब्बर ६.१५ ला जाग आली. मोबाईलला गजर करण्याची गरजच पडली नाही. एका आवर्तनामधे उठलो. पांघरूणाची घडी केली. आवरलं. एक पेला भरून पाणी प्यालं. पुस्तकात वाचल्याप्रमाणे प्राणायाम केला. १२ सूर्यनमस्कार घातले. जॉगिंगला गेलो. साधारण अर्ध्या तासाने परत आलो. मनसोक्त व्यायाम झाल्यामुळे आनंद झाला. दिवसाची सुरुवात अशी छान झाली, म्हणजे दिवसही छानच जाणार! त्यातून आज माझा वाढदिवस! मग काय बोलता?

म्हणींच्या राज्यातील गमतीजमती

पूर्वापार चालत आलेल्या म्हणींची मजाच काही और असते! अनेकदा त्यांच्यामागे असलेले संदर्भ कालौघात मिटले तरी प्रत्येक म्हणीमागे दडलेले व्यावहारिक शहाणपण, अनुभव व त्यातून मिळणारे ज्ञान हे खणखणीत असते. पंचतंत्र, जातक कथा, रामायण - महाभारत यांसारख्या कथांमधून या म्हणी, त्यांचे उगम तर दिसतातच; शिवाय अनेक लोककथा - काव्यांच्या स्वरूपांत त्यांचे जतन झालेले आढळून येते.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०११-२०१२)

0

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्‍यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्‍यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.

भारताचा कसोटी संघ असा आहे -

The Shadow Of The Great Game: The Untold Story Of India's Partition: ले. नरेंद्र सिंग सरीला

0
Average: 8.5 (2 votes)

The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला

प्रथम एक खुलासा: येथील (मायबोलीवरील) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्‍या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे स्मित

हे राम!

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शेवटच्या क्षणी "हे राम!" असे उद्गार काढले होते का याबद्दल आजही वाद आहे. शाळेतील ईतीहासाच्या पुस्तकात तरी तसेच नमूद केले असल्याने माझ्या पुरता किंवा आमच्या पिढीपुरता तो वाद तिथेच संपला होता. बापूंच्या काळी मोबाईल रेकॉर्डींग नसल्याने तसा थेट पुरावा तरी ऊपलब्ध नाही त्यामूळे अनेक शंका, वाद आणि सोयीस्कर थियरीज सो कॉल्ड तज्ञांनी आजवर नाचवल्या आहेत. काळाच्या ओघात पुस्तके बदलली (निव्वळ पुढचे मागचे कव्हर नव्हे तर आतील मजकूर देखिल. बापूंचा अंत झाल्याची तारीख मात्र तीच आहे, हे नशीब!) त्याचबरोबर अनेक तथाकथीत गोष्टी आणि ईतीहासही बदलला?

मी मज हरपून ...

मी मज हरपून ...

"जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता ... " या ओळी कधीही कानावर पडल्या तरी चित्तवृत्ती उल्हसित होतात. एकटे-दुकटे फिरताना, दुरून जरी हे सूर कानावर पडले तरी आपण थबकतो, रस्त्यातच ५ मिनिटे उभे राह्तो, मायभूमीची आठवण काढतो, प्रफ़ुल्लित होतो आणि परत आपली वाट धरतो. हेच राष्ट्रगीत जेव्हा एक ४५००० लोकांचा समूह गातो, माझ्या देशाचा विजय व्हावा या साठी अंतिम क्षणापर्यन्त साथ देतो ... तेव्हा ’हरपून’ जाण्याशिवाय काही उरतच नाही !

भारतातील असुरक्षित शहरे आणि तेथील अनुभव

0

मी एक बातमी वाचली ज्यात लिहिले आहे की दिल्ली नंतर बंगलोर आणि मग मुंबई भारतातील असुरक्षित शहरे आहेत. भारतात तुम्हाला कुठल्या शहराचा कुठला वाईट अनुभव आला त्याबद्दल इथे चर्चा अपेक्षित आहे. चांगला अनुभव आला असेल तर तेही लिहा जेणेकरुन लोकांचे समज गैरसमज टळतील.

शर्यत

जवळजवळ पाच हजार वर्षेतरी उलटून गेली असतील. पण ससा आणि कासव मात्र तारुण्याने ओथंबून वहात होते. त्यातल्यात्यात ससा वयाने आणि आकारानेही मोठा होता. कासव लहान होत आणि त्याला सशाविषयी नितांत आदर होता. सशा कासवाची मैत्री साऱ्या जंगलाचं कुतूहल बनून राहीली होती. ससा आणि कासव जेव्हा भेटत तेव्हा कासव प्रेमापोटी ससा-कासव भाई भाईचे नारेही देत असे.