तर आज सकाळी मि उठलो तेंव्हा हात पाय हलत होते, माझेच! श्वास ही चालु होता.... म्हटले मी जिवंत आहे!.... संदर्भ- पु.लं.
पुण्यात स्फोट झाले (ते कुणी केले हे पण लगेच कळले) अन मग आमचे 'हात' कुठे गेले ते कळले नाही, पण 'दुसर्यांचे हात' आमच्या अंतर्वस्रांपर्यंत पोचले हे कळले.
मी मेलो नाही हे पाहुण आनंद वाटला.
***
भावनिक वाद उकरुन फुकाचा गोधळ घालणार्यांनी सुरक्षा यंत्रणेला त्यांचे काम करु दिले तर कदाचित मी अजुन बरीच वर्षे दररोज जिवंत राहील. पण कसले काय? धर्माच्या नावावर ते पेटवतात अन प्रांताच्या नावावर हे पेटवतात- शेवटी मरतो मीच! जिवंत असे पर्यंत!
एकदा मेलो कि सगळे प्रश्न सुटतील 