आमचा नातू लहान होता तेव्हां सारखा त्याच्या मम्मीच्या मागे मागे असायचा. सूनबाई त्यामुळं वैतागायची. माझा मुलगा कसा होता हे आता आठवत नाही. पण इतका मागं लागत नव्हता. मागे लागला लागला आणि मग जे बाहेर जायला लागला कि दरवाजाला फळी लावावी लागली. थोडा धरून चालायला लागल्यानंतर मग सतत बाहेरच असायचा.
पण त्या दिवसात त्याने सूनबाईंना नको नको केलं होतं. नंतर मुलगा म्हणजे त्याचा बाबा आला कि त्यालाही तसंच करायचा. माझ्याही मागे मागे असायचा. सगळे घाबरायचे त्याला. हाहा.
महापुरूष त्यांच्या जीवनीतून कमी, विचारातून जास्त उलगडतात.
ज्याच्या जगण्याने लाखो नाही करोडोंचे जिणं बदलतं त्याला महामानव म्हणायचं. स्थितीवादी असलेल्या समाजात बंड पुकारणे, आंदोलन करणे आणि त्यातून घाव घालून व्यवस्था बदलवणे हे साधारण काम नाही. हे हजारो वर्षातून एखादाच कुणी तरी करू शकतो. म्हणूनच महापुरूषांची बरोबरी कलाकार, उद्योजक, लेखक, कवी यांच्याशी होऊ शकत नाही. हे सगळे आपले जीवन समृद्ध करू शकतात पण महापुरूष?
काहींसाठी ते देवाच्याही पलिकडे असतात.
आमचे एक साहेब होते. अतिशय देखणे. सुंदर स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित व्हायच्या.
ते भलतेच रसिकही होते आणि सभ्यही होते. त्यांच्याकडे हेल्दी प्लर्टिंग म्हणजे काय हे शिकायला मिळालं.
त्यांनी एकदा विचारलं होतं कि " तरूण कुणाला म्हणायचं ?"
आम्ही सर्वांनी वपु स्टाईल पुस्तकी व्याख्या सांगितल्या. ते फक्त मिस्कील हसायचे, नाही नाही अशी मान हलवायचे. मग शेवटी आम्ही हरलो म्हटल्यावर ते म्हणाले
दुपारभर कडक उन्हाने तापलेली धरती.अचानक आभाळ दाटतं.वारा गंध घेऊन फिरतो.पहिला थेंब पडतो… आणि मातीचा सुगंध उसळतो.त्या क्षणी कुणी शेतात धाव घेतं,कुणी खिडकीत उभं राहतं,कुणी आठवणीत हरवतं,कुणाच्या छातीत जुनी जखम ठसठसते.
पाऊस तोच.पण मनं वेगळी.आणि तिथूनच कविता जन्माला येते.
माणूस ओळखणं हे साध्या डोळ्यांचं काम नाही हो, ते तर एक जबरदस्त 'सूक्ष्म निरीक्षणाचं' शास्त्र आहे. खोटं कशाला सांगू, आज आपण दररोज अशा असंख्य नातेसंबंधांच्या गोतावळ्यात जगतो, जे वरवर पाहता लोखंडासारखे मजबूत वाटतात; पण प्रत्यक्षात ते काचेसारखे ठिसूळ असतात. विश्वासाची गोष्ट तर सोडाच, तो आता बाजारात मिळणारी दुर्मिळ वस्तू झालीय. आपण आपली मौल्यवान भावनिक ऊर्जा आणि वेळ अशा लोकांमध्ये गुंतवत असतो, ज्यांचे खरे हेतू त्यांच्या सूक्ष्म हालचालींशिवाय कधीच स्पष्ट होत नाहीत.
शाहरूख खानची जीभ छाटणाऱ्यास एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. संगीत सोम यांचे नाव समोर आले होते.
पण आता देवेंद्र प्रसाद पाठक, अनिरुद्ध महाराज, मीरा आणि हिंदू महासभेच्या बऱ्याच जणांचे नाव पुढे येतेय.
प्रश्न हा नाही कि जीभ छाटली तर अभिनयाचै काय? सर्व मुक्यानेच कसे करणार?
कारण हाडाच्या कलाकारांना जुबान महत्वाची नसते. कोशिश मधे संजीव कुमार, पुष्पक मधे कमल हसन ने एकही संवाद न बोलता खुर्चीला खिळेवून ठेवले होते.
रेश्मा और शेरा मधे महानायक अमिताभ बच्चन सुद्धा मुके होते. दादा कोंडके पण मुका घ्या मुका मधे मुकेच होते.
धर्मेंद्र गेले ही बातमी विश्वास बसण्यासारखी नव्हती.
कारण चारच दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या. निधनाच्या अफवेने आयुष्य वाढतं असं म्हणतात. या म्हणीचं प्रत्यंतर सुद्धा आलेलं आहे. पण दुर्दैवाने धर्मेंद्र यांना तेव्हढे आयुष्य लाभले नाही.
आजच्या इंटरनेटच्या पिढीला राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद माहिती नाहीत. पण धर्मेंद्र माहीत आहेत. काळ किंचितसा अलिकडचा असेल. चित्रपट क्षेत्रात मात्र ती एक पिढी असते. आमच्या चित्रपटवेड्या घरात मात्र या कलाकारांबद्दला एका पिढीकडून दुसर्या पिढीला या कलाकारांचे किस्से, चित्रपट याबद्दल सांगितलं जातं.
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!